शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांचा पदपथावर कब्जा

By admin | Updated: October 28, 2015 01:26 IST

सांगवी, पिंपळे गुरव व दापोडी परिसरातील प्रमुख रस्त्याच्या पदपथावर खासगी व्यावसायिकांनी व उद्योजकांनी पदपथावर वस्तू विक्रीसाठी मांडल्या आहेत.

बलभीम भोसले, पिंपळे गुरवसांगवी, पिंपळे गुरव व दापोडी परिसरातील प्रमुख रस्त्याच्या पदपथावर खासगी व्यावसायिकांनी व उद्योजकांनी पदपथावर वस्तू विक्रीसाठी मांडल्या आहेत. त्यामुळे पादचारी मार्गाची दुर्दशा झाली असून, पदपथ असून अडचण, नसून खोळंबा याप्रमाणे स्थिती बनली आहे. या पदपथावर खासगी व्यावसायिकांची मक्तेदारी वाढत आहे. या पदपथांचा वापर पादचाऱ्यांसाठी न होता व्यवसायासाठी होत आहे. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या म्हणीप्रमाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा रहिवाशांमध्ये आहे. जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, सुदर्शननगर व दापोडी परिसरातील प्रमुख रस्त्यावर रहिवाशांसाठी सहजगत्या ये-जा करण्यासाठी पदपथ तयार करण्यात आले. यासाठी महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र या पदपथावर पादचाऱ्यांचा हक्क न राहता, खासगी व्यावसायिक व उद्योजकांनी जणू आपला सातबारा कोरला आहे. या पदपथांचा वापर वाहनतळ, बांधकामाचे साहित्य, दुकानाचे फलक व विक्रीसाठी असलेले साहित्य ठेवण्यासाठी उपयोग होत आहे. या पदपथावर नागरिकांना चालता येत नाही कारण दुकानदार सकाळीच आपल्या दुकानातील साहित्य पदपथावर आणून मांडतात. यामुळे पादचाऱ्यांनी चालायचे कोठून, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय नाही. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी रस्ता वाहनांच्या गर्दीने तुडुंब भरला जातो. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. जुनी सांगवीतील शिताळे मार्केट चौक, नवी सांगवीतील कृष्णा चौक, फेमस चौक, शिवनेरी चौक, पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, नवीन ६० फुटी रस्ता, सुदर्शननगर येथील सृष्टी चौक आदी ठिकाणचे पदपथ व्यावसायिकांनी बळकावल्याने पादचाऱ्यांना वर्दळीच्या मार्गावरून प्रवास करावा लागतो. सुरेश जाधवर म्हणाले, ‘‘सांगवी, पिंपळे गुरवमधील मुख्य चौकामध्ये बाजारपेठ आहे. या चौकांमध्ये खासगी व्यावसायिकांनी साहित्य पदपथावर मांडल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकांसह शाळकरी मुलांना रत्यावरून चालावे लागते. वाहनांमुळे अपघात झाले आहेत.’’दुकानदारांनी आपले साहित्य पदपथावर मांडत असताना स्थानिक रहिवासी पदपथावरून ये-जा करतात. या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. चार पैसे मिळवण्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचे काम दुकादारांनी करू नये. आपल्या दुकानाचा त्रास इतरांना होणार नाही, या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. अतिक्रमण विभागाकडून कारवाई होते. मात्र ती ठरावीक वेळेपुरतीच होते. ही कारवाई अखंडपणे सुरु राहणे गरजेचे आहे. - राजेंद्र जगताप, नगरसेवक