शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांचा पदपथावर कब्जा

By admin | Updated: October 28, 2015 01:26 IST

सांगवी, पिंपळे गुरव व दापोडी परिसरातील प्रमुख रस्त्याच्या पदपथावर खासगी व्यावसायिकांनी व उद्योजकांनी पदपथावर वस्तू विक्रीसाठी मांडल्या आहेत.

बलभीम भोसले, पिंपळे गुरवसांगवी, पिंपळे गुरव व दापोडी परिसरातील प्रमुख रस्त्याच्या पदपथावर खासगी व्यावसायिकांनी व उद्योजकांनी पदपथावर वस्तू विक्रीसाठी मांडल्या आहेत. त्यामुळे पादचारी मार्गाची दुर्दशा झाली असून, पदपथ असून अडचण, नसून खोळंबा याप्रमाणे स्थिती बनली आहे. या पदपथावर खासगी व्यावसायिकांची मक्तेदारी वाढत आहे. या पदपथांचा वापर पादचाऱ्यांसाठी न होता व्यवसायासाठी होत आहे. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या म्हणीप्रमाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा रहिवाशांमध्ये आहे. जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, सुदर्शननगर व दापोडी परिसरातील प्रमुख रस्त्यावर रहिवाशांसाठी सहजगत्या ये-जा करण्यासाठी पदपथ तयार करण्यात आले. यासाठी महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र या पदपथावर पादचाऱ्यांचा हक्क न राहता, खासगी व्यावसायिक व उद्योजकांनी जणू आपला सातबारा कोरला आहे. या पदपथांचा वापर वाहनतळ, बांधकामाचे साहित्य, दुकानाचे फलक व विक्रीसाठी असलेले साहित्य ठेवण्यासाठी उपयोग होत आहे. या पदपथावर नागरिकांना चालता येत नाही कारण दुकानदार सकाळीच आपल्या दुकानातील साहित्य पदपथावर आणून मांडतात. यामुळे पादचाऱ्यांनी चालायचे कोठून, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय नाही. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी रस्ता वाहनांच्या गर्दीने तुडुंब भरला जातो. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. जुनी सांगवीतील शिताळे मार्केट चौक, नवी सांगवीतील कृष्णा चौक, फेमस चौक, शिवनेरी चौक, पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, नवीन ६० फुटी रस्ता, सुदर्शननगर येथील सृष्टी चौक आदी ठिकाणचे पदपथ व्यावसायिकांनी बळकावल्याने पादचाऱ्यांना वर्दळीच्या मार्गावरून प्रवास करावा लागतो. सुरेश जाधवर म्हणाले, ‘‘सांगवी, पिंपळे गुरवमधील मुख्य चौकामध्ये बाजारपेठ आहे. या चौकांमध्ये खासगी व्यावसायिकांनी साहित्य पदपथावर मांडल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकांसह शाळकरी मुलांना रत्यावरून चालावे लागते. वाहनांमुळे अपघात झाले आहेत.’’दुकानदारांनी आपले साहित्य पदपथावर मांडत असताना स्थानिक रहिवासी पदपथावरून ये-जा करतात. या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. चार पैसे मिळवण्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचे काम दुकादारांनी करू नये. आपल्या दुकानाचा त्रास इतरांना होणार नाही, या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. अतिक्रमण विभागाकडून कारवाई होते. मात्र ती ठरावीक वेळेपुरतीच होते. ही कारवाई अखंडपणे सुरु राहणे गरजेचे आहे. - राजेंद्र जगताप, नगरसेवक