शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रात्र निवारा केंद्राच्या दुरवस्थेची होणार आज पाहणी

By admin | Updated: September 18, 2015 01:56 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू केलेले रात्र निवारा केंद्र हे समस्यांचा आगार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू केलेले रात्र निवारा केंद्र हे समस्यांचा आगार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून मंगळवार, दि. १५ रोजी प्रकाशित झाल्यानंतर या वृत्ताची गंभीर दखल घेऊन, राष्ट्रवादीच्या गटनेत्या मंगला कदम यांनी महापालिकेचे सहायक आयुक्तांना धारेवर धरून ताबडतोब तेथील समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते शुक्रवारी निवारा केंद्राची पाहणी करणार आहेत.शहरातील बेघर व निराश्रित व्यक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने जानेवारी २०१२ पासून मंडईजवळील व्यंकटेश मार्केटच्या तळमजल्यावर प्रशस्त आवारात रात्र निवारा केंद्र सुरूकेले आहे. सर्व प्राथमिक सुविधा उत्तम प्रकारे मिळणार असल्याचा सूचनाफलकही महापालिकेने लावला आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता, या ठिकाणी कोणत्याही सुविधा योग्य नसून, निवारा केंद्राची दुरवस्था दिसून आली. पाण्याची सोय नाही, दुर्गंधी पसरलेली, गळणारे छत, अंथरुणाची दुरवस्था, पथदिवे नाहीत. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर या वृत्ताची महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निवारा केंद्राच्या देखरेखीसाठी महापालिका प्रशासन एकता प्रतिष्ठान या संस्थेला दरमहा ५० हजार रुपये मोजत असतानासुद्धा निवारा केंद्राची दुरवस्था का झाली आहे, पाण्याची व्यवस्था अद्याप का झाली नाही. बेघरांचा अल्प प्रतिसाद असतानाही प्रतिसाद वाढविण्याकडे प्रशासनाने का दुर्लक्ष केले, असे विविध प्रश्न कदम यांनी सहायक आयुक्तांना विचारले. तसेच निवारा केंद्राच्या अधिक माहितीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी पाठवून अहवाल मागविला आहे. तसेच निवारा केंद्र हे बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, वायसीएम हॉस्पिटल येथील परिसरामध्ये सुरू करण्यासाठी स्वत: जागेचा शोध घेणार आहेत. या संदर्भात दंडवते निवारा केंद्राची पाहणी करणार आहेत. एकता प्रतिष्ठान या संस्थेच्या संचालकांची बैठकही घेणार आहेत. (प्रतिनिधी)