शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रात्र निवारा केंद्राच्या दुरवस्थेची होणार आज पाहणी

By admin | Updated: September 18, 2015 01:56 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू केलेले रात्र निवारा केंद्र हे समस्यांचा आगार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू केलेले रात्र निवारा केंद्र हे समस्यांचा आगार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून मंगळवार, दि. १५ रोजी प्रकाशित झाल्यानंतर या वृत्ताची गंभीर दखल घेऊन, राष्ट्रवादीच्या गटनेत्या मंगला कदम यांनी महापालिकेचे सहायक आयुक्तांना धारेवर धरून ताबडतोब तेथील समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते शुक्रवारी निवारा केंद्राची पाहणी करणार आहेत.शहरातील बेघर व निराश्रित व्यक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने जानेवारी २०१२ पासून मंडईजवळील व्यंकटेश मार्केटच्या तळमजल्यावर प्रशस्त आवारात रात्र निवारा केंद्र सुरूकेले आहे. सर्व प्राथमिक सुविधा उत्तम प्रकारे मिळणार असल्याचा सूचनाफलकही महापालिकेने लावला आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता, या ठिकाणी कोणत्याही सुविधा योग्य नसून, निवारा केंद्राची दुरवस्था दिसून आली. पाण्याची सोय नाही, दुर्गंधी पसरलेली, गळणारे छत, अंथरुणाची दुरवस्था, पथदिवे नाहीत. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर या वृत्ताची महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निवारा केंद्राच्या देखरेखीसाठी महापालिका प्रशासन एकता प्रतिष्ठान या संस्थेला दरमहा ५० हजार रुपये मोजत असतानासुद्धा निवारा केंद्राची दुरवस्था का झाली आहे, पाण्याची व्यवस्था अद्याप का झाली नाही. बेघरांचा अल्प प्रतिसाद असतानाही प्रतिसाद वाढविण्याकडे प्रशासनाने का दुर्लक्ष केले, असे विविध प्रश्न कदम यांनी सहायक आयुक्तांना विचारले. तसेच निवारा केंद्राच्या अधिक माहितीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी पाठवून अहवाल मागविला आहे. तसेच निवारा केंद्र हे बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, वायसीएम हॉस्पिटल येथील परिसरामध्ये सुरू करण्यासाठी स्वत: जागेचा शोध घेणार आहेत. या संदर्भात दंडवते निवारा केंद्राची पाहणी करणार आहेत. एकता प्रतिष्ठान या संस्थेच्या संचालकांची बैठकही घेणार आहेत. (प्रतिनिधी)