शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

रात्र निवारा केंद्राच्या दुरवस्थेची होणार आज पाहणी

By admin | Updated: September 18, 2015 01:56 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू केलेले रात्र निवारा केंद्र हे समस्यांचा आगार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू केलेले रात्र निवारा केंद्र हे समस्यांचा आगार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून मंगळवार, दि. १५ रोजी प्रकाशित झाल्यानंतर या वृत्ताची गंभीर दखल घेऊन, राष्ट्रवादीच्या गटनेत्या मंगला कदम यांनी महापालिकेचे सहायक आयुक्तांना धारेवर धरून ताबडतोब तेथील समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते शुक्रवारी निवारा केंद्राची पाहणी करणार आहेत.शहरातील बेघर व निराश्रित व्यक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने जानेवारी २०१२ पासून मंडईजवळील व्यंकटेश मार्केटच्या तळमजल्यावर प्रशस्त आवारात रात्र निवारा केंद्र सुरूकेले आहे. सर्व प्राथमिक सुविधा उत्तम प्रकारे मिळणार असल्याचा सूचनाफलकही महापालिकेने लावला आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता, या ठिकाणी कोणत्याही सुविधा योग्य नसून, निवारा केंद्राची दुरवस्था दिसून आली. पाण्याची सोय नाही, दुर्गंधी पसरलेली, गळणारे छत, अंथरुणाची दुरवस्था, पथदिवे नाहीत. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर या वृत्ताची महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निवारा केंद्राच्या देखरेखीसाठी महापालिका प्रशासन एकता प्रतिष्ठान या संस्थेला दरमहा ५० हजार रुपये मोजत असतानासुद्धा निवारा केंद्राची दुरवस्था का झाली आहे, पाण्याची व्यवस्था अद्याप का झाली नाही. बेघरांचा अल्प प्रतिसाद असतानाही प्रतिसाद वाढविण्याकडे प्रशासनाने का दुर्लक्ष केले, असे विविध प्रश्न कदम यांनी सहायक आयुक्तांना विचारले. तसेच निवारा केंद्राच्या अधिक माहितीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी पाठवून अहवाल मागविला आहे. तसेच निवारा केंद्र हे बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, वायसीएम हॉस्पिटल येथील परिसरामध्ये सुरू करण्यासाठी स्वत: जागेचा शोध घेणार आहेत. या संदर्भात दंडवते निवारा केंद्राची पाहणी करणार आहेत. एकता प्रतिष्ठान या संस्थेच्या संचालकांची बैठकही घेणार आहेत. (प्रतिनिधी)