शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सोडतीसाठी अवलंबणार नवी पद्धती

By admin | Updated: September 23, 2016 02:10 IST

महापालिका निवडणुकीच्या आरक्षणांची सोडत सात आॅक्टोबरला होणार आहे. सर्वच महापालिकांतील आरक्षण सोडतीबाबत एकसूत्रता राहावी, म्हणून निवडणूक आयोगाने प्रक्रियेत बदल केले

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या आरक्षणांची सोडत सात आॅक्टोबरला होणार आहे. सर्वच महापालिकांतील आरक्षण सोडतीबाबत एकसूत्रता राहावी, म्हणून निवडणूक आयोगाने प्रक्रियेत बदल केले आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत चक्रानुक्रमे फिरविताना रंगीत बॉलऐवजी चिठ्ठी वापरण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम २० आॅगस्टला जाहीर केला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून आदेश मिळताच रचना करून त्याचा आराखडा जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिकेचे आयुक्त यांच्या समितीकडे मंजुरीसाठी पाठविला होता. समितीकडून १२ सप्टेंबरला हा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला. हा आराखडा आयोगाकडून अंतिम होऊन २३ सप्टेंबरला महापालिकेच्या कस्टडीत येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवक संख्या १२८ कायम राहणार असून, प्रभागांची संख्या ३२ असणार आहे. ५० टक्के जागा महिलांसाठी आहेत. निवडणुकीसाठी प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करण्याची आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत नगरविकास विभागाने निश्चित केली आहे. लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार जागांचे आरक्षण ठरणार असून, अनुसूचित जातींसाठी २०, अनुसूचित जमातींसाठी ३, तर इतर मागासवर्गीयांसाठी ३५ जागा असतील, असा अंदाज आहे. काही ठिकाणी बॉल, तर काही ठिकाणी चिठ्ठीचा वापर केला होता. आरक्षणांची सोडतीसाठी चिठ्ठी रंगीत बॉलमध्ये टाकून ते बॉल चक़्रानुक्रमे फिरविण्यात आले होते. यात राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. सर्व महापालिकांसाठी एकच पद्धत अवलंबली जाणार आहे. चिंचवड येथील प्रा. मोरे प्रेक्षागृहात आरक्षणांची सोडत होणार आहे. ही सोडत आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या नियंत्रणाखाली होणार आहे. सोडतीची रंगीत तालीम चार दिवस अगोदर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सोडतीसाठी पारदर्शक ड्रम वापरण्यात येणार आहे. ड्रममध्ये टाकावयाच्या चिठ्ठीच्या कागदाचा आकार ए फोर साइजचा असावा. चिठ्ठी रोल करून त्यावर लावण्यात येणारे रबरबँड हे एकाच रंगाचे असावे. ते बँडही रोलच्या मध्यभागी लावलेले असावे. सोडतीच्या वेळी सर्व प्रभाग दर्शविणारा नकाशा, तसेच प्रत्येक प्रभागाच्या हद्दी दर्शविणारा नकाशा ठळकपणे दिसेल, अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रभागाच्या सीमा सोडतीच्या वेळी स्पष्ट कराव्यात. सोडत शालेय विद्यार्थ्यांच्या हातून काढण्यात यावी.(प्रतिनिधी)