शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘क्लीन चिट’ असताना नवीन निविदेचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 06:58 IST

घरोघरचा कचरा संकलन व कचरा वहन कामासाठी काढलेली निविदा योग्य असल्याचा अहवाल राज्य शासनाच्या समितीने दिला असून

पिंपरी : घरोघरचा कचरा संकलन व कचरा वहन कामासाठी काढलेली निविदा योग्य असल्याचा अहवाल राज्य शासनाच्या समितीने दिला असून, हा अहवाल महापालिकेच्या बुधवारच्या स्थायी समितीसमोर ठेवला होता. अहवालावरून सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. ‘एक कलमी कारभार चालू देणार नाही, अशी टीका केली. चर्चेनंतर कचरा निविदेला राज्य सरकारने क्लीन चिट दिलेला अहवाल फेटाळत नवीन चार विभागासाठी निविदा काढण्याचा घाट घालण्यात आला आहे.घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत नेऊन टाकण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया महापालिकेने राबविली होती. आठ प्रभाग क्षेत्रातील कचरा गोळा करणे, त्याची मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे काम पालिकेने दोन कंपन्यांना दिले होते. यासाठी वार्षिक ५६ कोटींचा खर्च येणार होता. तसेच हे काम आठ वर्षांच्या कालावधीसाठी होते. ठेकेदाराला दर वर्षी निश्चित स्वरूपात दरवाढ देण्यात येणार होती. पुणे-मुंबई महामार्गाचे दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागांत विभाजन केले होते. दरम्यान, यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. त्यामुळे संबंधित प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशीही झाली. चौकशी अहवाल येण्याच्या एक दिवस अगोदर स्थायी समितीत सदस्यांनी प्रस्ताव करून हा ठराव रद्द केला.दरम्यान, पूर्वीच्या निविदेला क्लीन चिटचा शासनाने अहवाल दिला. त्यामुळे ठेका रद्द करणारे तोंडघशी पडले होते. अहवाल अवलोकनासाठी आजच्या स्थायी समितीसमोर आला होता. त्यावर सत्ताधारी सदस्यांमध्ये निविदेवरून दोन गट पडले होते. याबाबत काय निर्णय होणार हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता होती.कचरा निविदेवरून गटबाजी१ भाजपाचे सदस्य विकास डोळस यांनी अहवाल काय आहे, निविदा काय आहे, अशी मागणी केली. दोन तीन वेळा मागणी करूनही माहिती न मिळाल्याने चिडलेले डोळस म्हणाले, ‘‘आम्हीही सदस्य आहोत. एककलमी कारभार चालू देणार नाही. सर्वांना विश्वासात घ्या. कचºयावर गटबाजी करू नये. शहराचा प्रश्न आहे. या अहवालावर किंवा नवीन निविदा हा विषय सर्वसाधारण सभेसमोर आणावा.’’ त्यानंतर सदस्य विलास मडिगेरी यांनी विषयाची माहिती दिली. मडिगेरी म्हणाले, ‘‘अहवालावर निर्णय दिल्याशिवाय नवीन प्रक्रिया होणार नव्हती. त्यामुळे याप्रकरणी आरोप झाल्याने ही निविदा रद्द केली. प्रशासनाने समितीसमोर अहवाल मांडला. तो फेटाळला आहे. त्यामुळे नवीन निविदा प्रक्रिया करणे सोपे जाईल.’’तज्ज्ञाकडून केला अहवाल२स्थायी समितीसमोर दाखल केलेला अहवाल राज्य सरकारचा नाही. त्यावर सरकारचा कोणताही शिक्का नाही. एका तज्ज्ञाकडून याची तपासणी केली आहे. त्यामुळे अहवाल आम्ही फेटाळल्याचे स्थायी समितीने माध्यमांशी पत्रकार परिषदेत सांगितले. विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘यापूर्वी आठ प्रभागनिहाय निविदा प्रक्रिया राबविण्याचा घेतलेल्या निर्णयामध्ये बदल केला आहे. आठ निविदा राबविल्यास छोटे ठेकेदार येऊन अडचण येईल. आता चार निविदा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे.