पिंपरी : विविध क्षेत्रांत महिला नावलौकीक कमावत आहेत, कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. महिलांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केले.उत्कर्ष शिक्षण कला संस्थेच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमदिरात आयोजित केलेल्या रणरागिणी आणि यशवंत पुरस्कार वितरण सोहळयात त्या बोलत होत्या. या वेळी संस्थापिका शारदा चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अभय जबडे, राजेंद्र मेंडगे, राजेंद्र म्हेत्रे, रमेश इंगवले, भगवंत इंगवले, दिलीप आसवले, नगरसेवक विकास दांगट, हरिश्चंद्र दांगट, अंजिक्य चव्हाण, ऐश्वर्या चव्हाण, अपर्णा धुपकर, शीतल गुंजाळ आदी उपस्थित होते. गुन्हे शाखेच्या प्रतिभा जोशी, उद्योजिका पीनल वानखेडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, अॅड. प्रतिभा घोरपडे, गायिका कविता टिकेकर, सौंदर्यतज्ज्ञ नेहा खरे, खेळाडू पूर्वा दीक्षित यांना रणरागिणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच अशोक चांदगुडे यांना यशवंत पुरस्कार, चित्रकार चिंतामणी हसबनीस, प्रभाकर भावे, आनंद पिंपळकर, डॉ. श्रीकांत वाघ, नितीन घोरपडे, विजयसिंह भोसले यांचाही गौरव करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. शारदा चव्हाण यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
कलागुणांना वाव देण्याची गरज
By admin | Updated: February 20, 2016 00:44 IST