शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सायबर कॅफेंना रेशन दुकानाचे स्वरूप

By admin | Updated: July 28, 2016 03:59 IST

प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांसाठी घरे (शहरी) या अंतर्गत घरांची मागणी लक्षात घेण्यासाठी म्हाडातर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे, असे जाहीर केल्यानंतर इंटरनेटवरून मागणी

पिंपरी : प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांसाठी घरे (शहरी) या अंतर्गत घरांची मागणी लक्षात घेण्यासाठी म्हाडातर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे, असे जाहीर केल्यानंतर इंटरनेटवरून मागणी अर्ज घेण्यासाठी शहराच्या विविध भागांतील सायबर कॅफेमध्ये दिवसभर गर्दी उसळली. रेशनिंग दुकानात स्वस्त धान्य घेण्यासाठी जशा रांगा लागतात, तशा रांगा सायबर कॅफेजवळ लागल्याचे दिसून आले. दिवसभर सायबर कॅफेजवळ झोपडपट्टीतील रहिवाशांची झुंबड उडाली होती. प्रत्येकाकडून अर्जासाठी शंभर रुपये मिळत असल्याने सायबर कॅफेवाल्यांची चांदी झाली. गल्ला भरू लागल्याने रांगा, गर्दी, झुंबड याचा त्रास सायबर कॅफेचालकांनी सहन केला. देशातील कोणीही नागरिक बेघर राहू नये, कोठे तरी त्याला हक्काचे पक्के घर असावे, या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येणार आहे. वार्षिक उत्पन्न ज्यांचे ३ लाखांपेक्षा कमी आहे, अशांना प्राधान्य दिले जाणार आहे. शिवाय, आर्थिक दुर्बल घटकांसाठी अनुदान दिले जाणार आहे. ३०० चौरस फुटांच्या सदनिका दहा लाखांत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे म्हाडाने जाहीर केले आहे. गांधीनगरमधील अनेक झोपडपट्टीवासीयांनी पिंपरीतील सायबर कॅफेमध्ये रांगा लावून योजनेत घर मिळण्यास इच्छुक असल्यासंदर्भातील मागणी अर्ज मिळविला. गांधीनगरमधून घोळक्याने येणाऱ्या लोकांना विचारले असता, या योजनेची नेमकी काहीच माहिती नाही. परिसरातील रहिवासी सायबर कॅफेत धाव घेऊ लागले, म्हणून आम्हीसुद्धा आलो, असे त्यातील बहुतांशी लोकांनी सांगितले. म्हाडाने कोणताही विकसक, खासगी, निमशासकीय संस्था नेमलेली नाही. कोणीही प्रतिनिधी, सल्लागार, एजंट नेमलेला नाही. त्यामुळे परस्पर कोणीही व्यवहार करू नयेत, अशा व्यवहार आणि फसवणुकीला म्हाडा जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)घरकुल प्रकल्प कोणताही असो, नागरिकांची फसवणूक करणारे अनेक ठग शहरात आहेत. महापालिकेच्या घरकुल प्रकल्पात घरे मिळवून देतो, असे सांगून काहींनी पैसे उकळले आहेत. तशाच पद्धतीने नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उठविला जात आहे. म्हाडाच्या गृहप्रकल्पांच्या सोडतसुद्धा जाहीर झाल्या आहेत. सोडतीसाठी आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. एकाच वेळी घरांच्या मागणीसाठी सर्वेक्षण आणि म्हाडाची सोडत जाहीर झाली असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. झोपडपट्टीतील नागरिकांना तर कशाचा अर्ज भरला, याबद्दल काहीच लक्षात येत नाही.