शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

शहरातील सायबर कॅफेंना रेशन दुकानाचे स्वरूप

By admin | Updated: July 28, 2016 03:59 IST

प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांसाठी घरे (शहरी) या अंतर्गत घरांची मागणी लक्षात घेण्यासाठी म्हाडातर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे, असे जाहीर केल्यानंतर इंटरनेटवरून मागणी

पिंपरी : प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांसाठी घरे (शहरी) या अंतर्गत घरांची मागणी लक्षात घेण्यासाठी म्हाडातर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे, असे जाहीर केल्यानंतर इंटरनेटवरून मागणी अर्ज घेण्यासाठी शहराच्या विविध भागांतील सायबर कॅफेमध्ये दिवसभर गर्दी उसळली. रेशनिंग दुकानात स्वस्त धान्य घेण्यासाठी जशा रांगा लागतात, तशा रांगा सायबर कॅफेजवळ लागल्याचे दिसून आले. दिवसभर सायबर कॅफेजवळ झोपडपट्टीतील रहिवाशांची झुंबड उडाली होती. प्रत्येकाकडून अर्जासाठी शंभर रुपये मिळत असल्याने सायबर कॅफेवाल्यांची चांदी झाली. गल्ला भरू लागल्याने रांगा, गर्दी, झुंबड याचा त्रास सायबर कॅफेचालकांनी सहन केला. देशातील कोणीही नागरिक बेघर राहू नये, कोठे तरी त्याला हक्काचे पक्के घर असावे, या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येणार आहे. वार्षिक उत्पन्न ज्यांचे ३ लाखांपेक्षा कमी आहे, अशांना प्राधान्य दिले जाणार आहे. शिवाय, आर्थिक दुर्बल घटकांसाठी अनुदान दिले जाणार आहे. ३०० चौरस फुटांच्या सदनिका दहा लाखांत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे म्हाडाने जाहीर केले आहे. गांधीनगरमधील अनेक झोपडपट्टीवासीयांनी पिंपरीतील सायबर कॅफेमध्ये रांगा लावून योजनेत घर मिळण्यास इच्छुक असल्यासंदर्भातील मागणी अर्ज मिळविला. गांधीनगरमधून घोळक्याने येणाऱ्या लोकांना विचारले असता, या योजनेची नेमकी काहीच माहिती नाही. परिसरातील रहिवासी सायबर कॅफेत धाव घेऊ लागले, म्हणून आम्हीसुद्धा आलो, असे त्यातील बहुतांशी लोकांनी सांगितले. म्हाडाने कोणताही विकसक, खासगी, निमशासकीय संस्था नेमलेली नाही. कोणीही प्रतिनिधी, सल्लागार, एजंट नेमलेला नाही. त्यामुळे परस्पर कोणीही व्यवहार करू नयेत, अशा व्यवहार आणि फसवणुकीला म्हाडा जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)घरकुल प्रकल्प कोणताही असो, नागरिकांची फसवणूक करणारे अनेक ठग शहरात आहेत. महापालिकेच्या घरकुल प्रकल्पात घरे मिळवून देतो, असे सांगून काहींनी पैसे उकळले आहेत. तशाच पद्धतीने नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उठविला जात आहे. म्हाडाच्या गृहप्रकल्पांच्या सोडतसुद्धा जाहीर झाल्या आहेत. सोडतीसाठी आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. एकाच वेळी घरांच्या मागणीसाठी सर्वेक्षण आणि म्हाडाची सोडत जाहीर झाली असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. झोपडपट्टीतील नागरिकांना तर कशाचा अर्ज भरला, याबद्दल काहीच लक्षात येत नाही.