शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मतदान न करणाऱ्यांची नावे जाहीर करावीत

By admin | Updated: February 26, 2017 03:42 IST

महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात वाढली असली, तरी अद्यापही सरासरी ३२ टक्के

किवळे : महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात वाढली असली, तरी अद्यापही सरासरी ३२ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे. मतदान करणाऱ्या सर्वच मतदारांची नावे निवडणूक आयोगाकडे आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी मतदान न करणाऱ्या सर्व मतदारांची नावे निवडणूक आयोगाने त्यांच्या व संबंधित महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करावीत. तसेच, मतदान न करण्याच्या कारणांची चर्चा होऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जागरूक नागरिकांतून होऊ लागली आहे. महापालिका निवडणुकीत ६८ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच ३२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही. गेल्या निवडणुकीत ५४.८४ टक्के मतदान झाले होते. यंदा १४ टक्क्यांनी मतदान वाढले असले, तरी मतदान न करणाऱ्या मतदारांची नावे केंद्रनिहाय यादी आयोग, महापालिकेचे संकेस्थळ तसेच संबंधित मतदान केंद्रावर आयोगाने जाहीर करावीत. त्यामुळे कोणी मतदान केले नाही ही बाब इतरांना समजू शकेल. महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेवर आयोगामार्फत मोठी रक्कम खर्च होत आहे. मतदारसंख्येचा विचार करून तसेच मतदार यादीतील सर्व मतदार मतदान करतील, अशा पद्धतीने सर्व नियोजन करण्यात येत असते. निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली जाते. तरीही सर्व मतदार मतदानासाठी केंद्रापर्यंत येत नाहीत. परिणामी त्याकरिता केलेला बहुतांशी खर्च वाया जात आहे. २०१४ पासून झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून मतदारांना उमेदवार पसंत नसेल, तर नकाराधिकार (नोटा) बजाविण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा खर्च करून मतदान यंत्रांवर तशी सोयही उपलब्ध करून दिली होती. (वार्ताहर) राज्याच्या व देशाच्या विविध भागातून नोकरी-धंद्यानिमित्त, तसेच शिक्षणासाठी आलेल्या अनेकांनी येथील मतदार यादीत नावे नोंदविलेली नाहीत. अर्ध्या व एक दिवसाच्या सुटीत नाशिक, अहमदनगर, लातूर, जालना, नागपूर आदी दूर अंतरावरील मूळ गावाकडे जाऊन जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीसाठी मतदान करता आले नाही, अशा मतदारांची संख्याही मोठी आहे. फक्त मतदानासाठी गावी जाणे वेळ व खर्चाच्या दृष्टीने अवघड असल्याने अशा मतदारांचे मतदान झाले नसल्याची चर्चा होत आहे. यात हिंजवडी व तळवडे येथील आयटी कंपन्यांत काम करणारे आघाडीवर आहेत. त्यामुळे अशा मतदारांसाठी निवडणूक आयोगाने पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे.