शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मतदान न करणाऱ्यांची नावे जाहीर करावीत

By admin | Updated: February 26, 2017 03:42 IST

महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात वाढली असली, तरी अद्यापही सरासरी ३२ टक्के

किवळे : महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात वाढली असली, तरी अद्यापही सरासरी ३२ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे. मतदान करणाऱ्या सर्वच मतदारांची नावे निवडणूक आयोगाकडे आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी मतदान न करणाऱ्या सर्व मतदारांची नावे निवडणूक आयोगाने त्यांच्या व संबंधित महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करावीत. तसेच, मतदान न करण्याच्या कारणांची चर्चा होऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जागरूक नागरिकांतून होऊ लागली आहे. महापालिका निवडणुकीत ६८ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच ३२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही. गेल्या निवडणुकीत ५४.८४ टक्के मतदान झाले होते. यंदा १४ टक्क्यांनी मतदान वाढले असले, तरी मतदान न करणाऱ्या मतदारांची नावे केंद्रनिहाय यादी आयोग, महापालिकेचे संकेस्थळ तसेच संबंधित मतदान केंद्रावर आयोगाने जाहीर करावीत. त्यामुळे कोणी मतदान केले नाही ही बाब इतरांना समजू शकेल. महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेवर आयोगामार्फत मोठी रक्कम खर्च होत आहे. मतदारसंख्येचा विचार करून तसेच मतदार यादीतील सर्व मतदार मतदान करतील, अशा पद्धतीने सर्व नियोजन करण्यात येत असते. निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली जाते. तरीही सर्व मतदार मतदानासाठी केंद्रापर्यंत येत नाहीत. परिणामी त्याकरिता केलेला बहुतांशी खर्च वाया जात आहे. २०१४ पासून झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून मतदारांना उमेदवार पसंत नसेल, तर नकाराधिकार (नोटा) बजाविण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा खर्च करून मतदान यंत्रांवर तशी सोयही उपलब्ध करून दिली होती. (वार्ताहर) राज्याच्या व देशाच्या विविध भागातून नोकरी-धंद्यानिमित्त, तसेच शिक्षणासाठी आलेल्या अनेकांनी येथील मतदार यादीत नावे नोंदविलेली नाहीत. अर्ध्या व एक दिवसाच्या सुटीत नाशिक, अहमदनगर, लातूर, जालना, नागपूर आदी दूर अंतरावरील मूळ गावाकडे जाऊन जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीसाठी मतदान करता आले नाही, अशा मतदारांची संख्याही मोठी आहे. फक्त मतदानासाठी गावी जाणे वेळ व खर्चाच्या दृष्टीने अवघड असल्याने अशा मतदारांचे मतदान झाले नसल्याची चर्चा होत आहे. यात हिंजवडी व तळवडे येथील आयटी कंपन्यांत काम करणारे आघाडीवर आहेत. त्यामुळे अशा मतदारांसाठी निवडणूक आयोगाने पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे.