शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

अनास्थेमुळे महापालिकेची पिछाडी

By admin | Updated: May 5, 2017 02:51 IST

तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे आणि प्रशासकीय अनास्थेमुळे देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड

पिंपरी : तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे आणि प्रशासकीय अनास्थेमुळे देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका पिछाडीवर गेले आहे. गेल्या वर्षी देशात नवव्या आणि राज्यात पहिल्या असणाऱ्या शहराला देशात ७२ वा आणि राज्यात पाचवा क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिलेला आहे. स्वच्छ शहरांना प्रोत्साहान देण्यासाठी टॉप टेनमध्ये आलेल्या पालिकांचा गौरव करण्यात येतो. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या यादीतील टॉप टेनमध्ये शहराचा देशात नववा क्रमांक आला होता. त्यामुळे स्वच्छतेबाबतच्या पिंपरी-चिंचवड पॅटर्नचा अभ्यास इतर शहरांनी केला होता. या स्पर्धेत एकूण साडेचारशे शहरे सहभागी झाली होती. स्वच्छ भारत आभियानात स्वच्छ भारत पुरस्कार सोहळ्याचे गुरुवारी नवी दिल्लीत वितरण झाले. यामध्ये महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकावर नवी मुंबई शहर आले असून, पिंपरी-चिंचवड पिछाडीवर गेले आहे. महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी गेल्या वर्षी योग्य नियोजन केल्याने स्वच्छ शहरासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडने राज्यात मुसंडी मारली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी या अभियानाचे पथक आले. त्या वेळी महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. प्रभागरचना आणि निवडणूक कामात व्यस्त असणाऱ्या महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि प्रशासनाने याविषयी गांभीर्याने नियोजन केले नाही. परिणामी हागणदारी मुक्त आणि नागरिकांच्या तक्रारींसाठी तयार केलेल्या ‘अ‍ॅप’कडे दुर्लक्ष झाल्याने गुण कमी मिळाले. दरम्यानच्या कालखंडात डॉ. यशवंत माने यांच्यावर निवडणुकीसह आरोग्य विभागाची जबाबदारी होती. स्वच्छता विभागासाठी स्वतंत्र अधिकारी नव्हता. परिणामी गुणांमध्ये घट झाली. (प्रतिनिधी)गुणांक झाले कमी स्वच्छ स्पर्धेबाबत लक्ष न दिल्याने गुणांकनात शहर पिछाडीवर गेले आहे. त्यामुळे देशातील टॉप टेनची पंरपरा खंडित झाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत दोन हजार गुणांपैकी १७०० गुण मिळवून महापालिकेचा देशात पहिल्या नऊ शहरांमध्ये नंबर आला होता. या वर्षी झालेल्या स्पर्धेत १३२० गुण मिळाले आहेत. ३८० गुणांनी शहर पिछाडीवर गेले आहे. हागणदारी मुक्त आणि उपाययोजनांसाठी दीडशे गुण होते. तसेच स्वच्छतेविषयीच्या राबविण्यात येणाऱ्या अ‍ॅप संदर्भातील उपाययोजना यासही गुण होते. या दोन्ही गोष्टीत महापालिकेला गुण मिळालेले नाहीत.