शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

मुर्दाड राज्यकर्ते गुडघे टेकतील

By admin | Updated: May 23, 2017 05:04 IST

शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू, जय जवान जय किसान असे वातावरण देशात तयार करू, असे आश्वासन भाजपाने निवडणुकीवेळी दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू, जय जवान जय किसान असे वातावरण देशात तयार करू, असे आश्वासन भाजपाने निवडणुकीवेळी दिले होते. मात्र, सध्याची स्थिती मर जवान, मर किसान अशी झाली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पिंपरीत आत्मक्लेश पदयात्रेदरम्यान सत्ताधाऱ्यांवर केली. निवडणुकीवेळी देण्यात आलेल्या आश्वासनांना शेतकऱ्यांसह आमच्यासारखे शेतकरी नेते भुलले. त्यामुळे आम्ही निघालो होतो देवाच्या आळंदीला, पण चोराच्या आळंदीला आलो की काय असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, समाजाच्या विविध घटकांतील व्यक्तींच्या नैतिक पाठबळावर मुर्दाड राज्यकर्त्यांना एक दिवस गुडघे टेकायला लावू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. पुणे येथून सोमवारी सुरु झालेली आत्मक्लेश पदयात्रा ३० मेला मुंबईतील राजभवन येथे पोहोचणार आहे. दरम्यान, ही पदयात्रा सोमवारी दुपारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली. या वेळी खासदार राजू शेट्टी यांनी येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते रालोआला साथ दिल्यास शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू. यास आमच्यासारखे शेतकरी नेते भुलले. मात्र, आश्वासन हवेत विरले. आता केंद्र सरकार हात वर करीत आहे.’’ सध्या शेतकऱ्यांची पोरं सीमेवर मरताहेत आणि शेतकरीही मरताहेत. सध्या मर जवान, मर किसान अशी अवस्था आहे. डॉ. स्वामीनाथन यांनी सरकारला उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली. स्वामीनाथन यांच्या सूत्रांनुसार हमीभाव देण्याऐवजी शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू, असे सांगण्यात आले. मात्र, उत्पन्नाऐवजी कर्ज दुप्पट झाले. आत्महत्या वाढायला लागल्या आहेत. दरम्यान, स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार हमीभाव देणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्रही सरकारने न्यायालयात सादर केले आहे. दरम्यान, मोदींनी निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन अज्ञानातून दिले असल्याचे कबूल करावे किंवा भाजपाने शेतकऱ्यांना फसविण्यासाठी आश्वासन दिले होते हे कबूल करावे, असेही शेट्टी यांनी नमूद केले. शेतकऱ्यांनी सत्तांतर घडवून आणले. त्यासाठी आम्हीही जबाबदार आहोत. त्याचप्रमाणे सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसदेखील जबाबदार असून, याचे प्रायश्चित्त म्हणून ही पदयात्रा असल्याचे ते म्हणाले. आम्ही निघालो होतो देवाच्या आळंदीला पण आम्ही चोराच्या आळंदीला आलो की काय असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, समाजाच्या विविध घटकातील व्यक्तींच्या नैतिक पाठबळावर मुर्दाड राज्यकर्त्यांना एक दिवस गुडघे टेकायला लावू. अरविंद सुब्रह्मण्यम्, ऊर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी व्यथित झाला आहे. शेतकरी इतके किरकोळ व नगण्य आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे.