शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुर्दाड राज्यकर्ते गुडघे टेकतील

By admin | Updated: May 23, 2017 05:04 IST

शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू, जय जवान जय किसान असे वातावरण देशात तयार करू, असे आश्वासन भाजपाने निवडणुकीवेळी दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू, जय जवान जय किसान असे वातावरण देशात तयार करू, असे आश्वासन भाजपाने निवडणुकीवेळी दिले होते. मात्र, सध्याची स्थिती मर जवान, मर किसान अशी झाली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पिंपरीत आत्मक्लेश पदयात्रेदरम्यान सत्ताधाऱ्यांवर केली. निवडणुकीवेळी देण्यात आलेल्या आश्वासनांना शेतकऱ्यांसह आमच्यासारखे शेतकरी नेते भुलले. त्यामुळे आम्ही निघालो होतो देवाच्या आळंदीला, पण चोराच्या आळंदीला आलो की काय असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, समाजाच्या विविध घटकांतील व्यक्तींच्या नैतिक पाठबळावर मुर्दाड राज्यकर्त्यांना एक दिवस गुडघे टेकायला लावू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. पुणे येथून सोमवारी सुरु झालेली आत्मक्लेश पदयात्रा ३० मेला मुंबईतील राजभवन येथे पोहोचणार आहे. दरम्यान, ही पदयात्रा सोमवारी दुपारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली. या वेळी खासदार राजू शेट्टी यांनी येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते रालोआला साथ दिल्यास शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू. यास आमच्यासारखे शेतकरी नेते भुलले. मात्र, आश्वासन हवेत विरले. आता केंद्र सरकार हात वर करीत आहे.’’ सध्या शेतकऱ्यांची पोरं सीमेवर मरताहेत आणि शेतकरीही मरताहेत. सध्या मर जवान, मर किसान अशी अवस्था आहे. डॉ. स्वामीनाथन यांनी सरकारला उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली. स्वामीनाथन यांच्या सूत्रांनुसार हमीभाव देण्याऐवजी शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू, असे सांगण्यात आले. मात्र, उत्पन्नाऐवजी कर्ज दुप्पट झाले. आत्महत्या वाढायला लागल्या आहेत. दरम्यान, स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार हमीभाव देणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्रही सरकारने न्यायालयात सादर केले आहे. दरम्यान, मोदींनी निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन अज्ञानातून दिले असल्याचे कबूल करावे किंवा भाजपाने शेतकऱ्यांना फसविण्यासाठी आश्वासन दिले होते हे कबूल करावे, असेही शेट्टी यांनी नमूद केले. शेतकऱ्यांनी सत्तांतर घडवून आणले. त्यासाठी आम्हीही जबाबदार आहोत. त्याचप्रमाणे सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसदेखील जबाबदार असून, याचे प्रायश्चित्त म्हणून ही पदयात्रा असल्याचे ते म्हणाले. आम्ही निघालो होतो देवाच्या आळंदीला पण आम्ही चोराच्या आळंदीला आलो की काय असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, समाजाच्या विविध घटकातील व्यक्तींच्या नैतिक पाठबळावर मुर्दाड राज्यकर्त्यांना एक दिवस गुडघे टेकायला लावू. अरविंद सुब्रह्मण्यम्, ऊर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी व्यथित झाला आहे. शेतकरी इतके किरकोळ व नगण्य आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे.