शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

मुर्दाड राज्यकर्ते गुडघे टेकतील

By admin | Updated: May 23, 2017 05:04 IST

शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू, जय जवान जय किसान असे वातावरण देशात तयार करू, असे आश्वासन भाजपाने निवडणुकीवेळी दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू, जय जवान जय किसान असे वातावरण देशात तयार करू, असे आश्वासन भाजपाने निवडणुकीवेळी दिले होते. मात्र, सध्याची स्थिती मर जवान, मर किसान अशी झाली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पिंपरीत आत्मक्लेश पदयात्रेदरम्यान सत्ताधाऱ्यांवर केली. निवडणुकीवेळी देण्यात आलेल्या आश्वासनांना शेतकऱ्यांसह आमच्यासारखे शेतकरी नेते भुलले. त्यामुळे आम्ही निघालो होतो देवाच्या आळंदीला, पण चोराच्या आळंदीला आलो की काय असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, समाजाच्या विविध घटकांतील व्यक्तींच्या नैतिक पाठबळावर मुर्दाड राज्यकर्त्यांना एक दिवस गुडघे टेकायला लावू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. पुणे येथून सोमवारी सुरु झालेली आत्मक्लेश पदयात्रा ३० मेला मुंबईतील राजभवन येथे पोहोचणार आहे. दरम्यान, ही पदयात्रा सोमवारी दुपारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली. या वेळी खासदार राजू शेट्टी यांनी येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते रालोआला साथ दिल्यास शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू. यास आमच्यासारखे शेतकरी नेते भुलले. मात्र, आश्वासन हवेत विरले. आता केंद्र सरकार हात वर करीत आहे.’’ सध्या शेतकऱ्यांची पोरं सीमेवर मरताहेत आणि शेतकरीही मरताहेत. सध्या मर जवान, मर किसान अशी अवस्था आहे. डॉ. स्वामीनाथन यांनी सरकारला उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली. स्वामीनाथन यांच्या सूत्रांनुसार हमीभाव देण्याऐवजी शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू, असे सांगण्यात आले. मात्र, उत्पन्नाऐवजी कर्ज दुप्पट झाले. आत्महत्या वाढायला लागल्या आहेत. दरम्यान, स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार हमीभाव देणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्रही सरकारने न्यायालयात सादर केले आहे. दरम्यान, मोदींनी निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन अज्ञानातून दिले असल्याचे कबूल करावे किंवा भाजपाने शेतकऱ्यांना फसविण्यासाठी आश्वासन दिले होते हे कबूल करावे, असेही शेट्टी यांनी नमूद केले. शेतकऱ्यांनी सत्तांतर घडवून आणले. त्यासाठी आम्हीही जबाबदार आहोत. त्याचप्रमाणे सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसदेखील जबाबदार असून, याचे प्रायश्चित्त म्हणून ही पदयात्रा असल्याचे ते म्हणाले. आम्ही निघालो होतो देवाच्या आळंदीला पण आम्ही चोराच्या आळंदीला आलो की काय असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, समाजाच्या विविध घटकातील व्यक्तींच्या नैतिक पाठबळावर मुर्दाड राज्यकर्त्यांना एक दिवस गुडघे टेकायला लावू. अरविंद सुब्रह्मण्यम्, ऊर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी व्यथित झाला आहे. शेतकरी इतके किरकोळ व नगण्य आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे.