शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

गहुंजे-शिरगाव रस्त्यावर शंभरहून अधिक खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:34 IST

रस्त्याची झाली दुरवस्था : प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थ त्रस्त

गहुंजे : गहुंजे ते शिरगाव या वर्दळीच्या रस्त्यावर विविध ठिकाणी पडलेल्या लहान मोठ्या शंभरहून अधिक खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, विविध ठिकाणी वाहने घसरून अपघात होत आहेत. वाहनांचे नुकसान होत असून, खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. स्थानिक ग्रामस्थ, कामगार, विद्यार्थी व परिसरातील वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

गहुंजे-शिरगाव या रस्त्याची दुरवस्था झाल्याने जिल्हा परिषदेच्या उत्तर विभाग बांधकाम विभागाने तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून या लेखाशीर्षानुसार दि. ११ सप्टेंबर २०१४ रोजी दिलेल्या कामाच्या आदेशानुसार सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात २२ लाख ३३ हजार ९४४ रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षांत पावसाळ्यात पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली असल्याचे चित्र दिसत आहे. गहुंजे व सांगवडे ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना सोमाटणे फाटामार्गे बाजार हाट करण्यासाठी तळेगाव तसेच तालुक्याचे मुख्यालय वडगाव मावळ येथे शेतीविषयक व इतर कामांकरिता सातत्याने जावे लागते. गहुंजे, सांगवडे भागातील विद्यार्थ्यांना शिरगाव, सोमाटणे, तळेगाव परिसरातील शाळा व महाविद्यालयांत दररोज ये-जा करण्यासाठी गहुंजे-शिरगाव रस्त्याचा वापर करावा लागतो. तळेगाव औद्योगिक विभागात कामावर जाणाºया कामगारांनाही याच रस्त्याचा वापर करावालागतो. तसेच सोमाटणे येथील टोल चुकाविण्यासाठी इतर व्यावसायिक वाहने याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने वर्दळ सर्वाधिक आहे. मात्र रस्त्यावर गहुंजे हद्दीत मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कामगारांना कसरत करावी लागते.निकृष्ट काम : दर्जेदार कामे करासन २०१४-१५ या आर्थिक वर्षात डांबरीकरण झालेले असून, या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सतत वाढत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरणासह दुरुस्ती व डांबरीकरण काम दर्जेदार होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. तातडीने सर्व धोकादायक खड्डे बुजाविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.तळेगाव औद्योगिक विभागात कामावर जाणाºया कामगारांनाही याच रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच सोमाटणे येथील टोल चुकाविण्यासाठी इतर व्यावसायिक वाहने याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने वर्दळ सर्वाधिक आहे. मात्र रस्त्यावर गहुंजे हद्दीत मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कामगारांना कसरत करावी लागते.त्याना कंपनीत वेळेवर पोचता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पगारातून कपात होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड