शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

गहुंजे-शिरगाव रस्त्यावर शंभरहून अधिक खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:34 IST

रस्त्याची झाली दुरवस्था : प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थ त्रस्त

गहुंजे : गहुंजे ते शिरगाव या वर्दळीच्या रस्त्यावर विविध ठिकाणी पडलेल्या लहान मोठ्या शंभरहून अधिक खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, विविध ठिकाणी वाहने घसरून अपघात होत आहेत. वाहनांचे नुकसान होत असून, खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. स्थानिक ग्रामस्थ, कामगार, विद्यार्थी व परिसरातील वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

गहुंजे-शिरगाव या रस्त्याची दुरवस्था झाल्याने जिल्हा परिषदेच्या उत्तर विभाग बांधकाम विभागाने तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून या लेखाशीर्षानुसार दि. ११ सप्टेंबर २०१४ रोजी दिलेल्या कामाच्या आदेशानुसार सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात २२ लाख ३३ हजार ९४४ रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षांत पावसाळ्यात पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली असल्याचे चित्र दिसत आहे. गहुंजे व सांगवडे ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना सोमाटणे फाटामार्गे बाजार हाट करण्यासाठी तळेगाव तसेच तालुक्याचे मुख्यालय वडगाव मावळ येथे शेतीविषयक व इतर कामांकरिता सातत्याने जावे लागते. गहुंजे, सांगवडे भागातील विद्यार्थ्यांना शिरगाव, सोमाटणे, तळेगाव परिसरातील शाळा व महाविद्यालयांत दररोज ये-जा करण्यासाठी गहुंजे-शिरगाव रस्त्याचा वापर करावा लागतो. तळेगाव औद्योगिक विभागात कामावर जाणाºया कामगारांनाही याच रस्त्याचा वापर करावालागतो. तसेच सोमाटणे येथील टोल चुकाविण्यासाठी इतर व्यावसायिक वाहने याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने वर्दळ सर्वाधिक आहे. मात्र रस्त्यावर गहुंजे हद्दीत मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कामगारांना कसरत करावी लागते.निकृष्ट काम : दर्जेदार कामे करासन २०१४-१५ या आर्थिक वर्षात डांबरीकरण झालेले असून, या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सतत वाढत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरणासह दुरुस्ती व डांबरीकरण काम दर्जेदार होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. तातडीने सर्व धोकादायक खड्डे बुजाविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.तळेगाव औद्योगिक विभागात कामावर जाणाºया कामगारांनाही याच रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच सोमाटणे येथील टोल चुकाविण्यासाठी इतर व्यावसायिक वाहने याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने वर्दळ सर्वाधिक आहे. मात्र रस्त्यावर गहुंजे हद्दीत मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कामगारांना कसरत करावी लागते.त्याना कंपनीत वेळेवर पोचता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पगारातून कपात होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड