शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मंत्रिपदाची आवई सोशल मीडियावर, पक्षश्रेष्ठींनी शहरातील स्थानिक नेत्यांना ठेवले झुलवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:27 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रथमच आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी पिंपरीला मंत्रिपद देण्यात येणार आहे, अशी चर्चा तीन वर्षांपासून सुरू आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रथमच आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी पिंपरीला मंत्रिपद देण्यात येणार आहे, अशी चर्चा तीन वर्षांपासून सुरू आहे. मंत्रिपद मिळाले, अशी आवईही शहरातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर उठविली जात आहे. त्यामुळे शहरवासीयांचे मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होणार, की नेत्यांकडून गाजर मिळणार याबाबतची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले आणि राष्टÑवादीतील प्रमुख मोहरे भाजपात घेतले. महापालिका निवडणुकीत शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासह भाजपातील सर्व नेत्यांच्या मदतीने भाजपाची नगरसेवक संख्या तीनवरून ७७ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचे नेतृत्व जगताप आणि लांडगे करतील, त्यांनी पारदर्शक कारभार करावा, असे निर्देश भोसरीतील कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले होेते. राष्ट्रवादीची निम्मी टीम भाजपात दाखल झाल्याने महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकाविणे सोपे झाले.जगताप की लांडगे; संधी कोणाला?महापालिकेत यश मिळाल्यानंतर या शहराला मंत्रिपद मिळणार आहे, अशी चर्चा दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यावर जगताप-लांडगे यांच्यापैकी कोणास संधी मिळणार, ही चर्चाही रंगू लागली आहे. दसरा, दिवाळीपासून ही चर्चा अधिक रंगली आहे. सोशल मीडियावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दिवाळीचाही मुहूर्त हुकला. लांडगे यांना क्रीडा मंत्रालय आणि जगतापांना राज्यमंत्रिपद मिळणार अशीही चर्चा आहे. जगतापांना मंत्रिपद दिले, तर लांडगे नाराज होतील, लांडगेंना दिले तर जगताप. त्यामुळे नाराजी ओढवून न घेण्याची दक्षता भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या आझम पानसरे यांनाही महामंडळ मिळणार ही चर्चा आहे. मात्र, निर्णय झालेला नाही.पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद मिळावे, यासाठी सर्वच भाजपाचे नेते आग्रही आहेत.