शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

मावळात कोट्यवधींचा चुराडा

By admin | Updated: August 3, 2015 04:20 IST

तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी सहाला संपला. गेल्या आठवडाभरात प्रचाराची राळ उडाली होती.

उर्से : तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी सहाला संपला. गेल्या आठवडाभरात प्रचाराची राळ उडाली होती. लाखो रुपये उमेदवारांनी खर्च केले. मावळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. जिल्ह्यातील ६१२ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (४ आॅगस्ट) मतदान होत आहे. त्याची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. याशिवाय ७ पोटनिवडणुकांसाठीही मतदान होत आहे़ शहरातील निवडणुकीप्रमाणे या वेळी ग्रामपंचायत निवडणूक लढली जाणार आहे. एका ग्रामपंचायतीसाठी जवळपास २५ ते ३०-३२ उमेदवार रिंगणात असल्याने तालुक्यात जवळपास १२०० उमेदवार भविष्य आजमावत आहेत. कोणी जागा विकून, कोणी कर्ज घेऊन, कोणी उधार पैसे घेऊन, तर कोणी आपल्या नात्यागोत्यातून लाखो रुपये घेऊन मतदारांवर उधळीत आहेत.२५ हजारांची खर्चमर्यादा कित्येक पटींत ओलांडणाऱ्या काही उमेदवारांमुळे मतदारराजा खुशीत आहे. एक उमेदवार ४ ते ५ लाखांपर्यंत खर्च करीत असल्याने एका गावातून एक ते दीड कोटी रुपये खर्च होत आहे. तालुक्यातील सर्व उमेदवारांचा ५० कोटींच्या आसपास हा खर्च होत आहे.मतदारांना रोख पैसे वाटण्यापासून आकर्षक वस्तू वाटण्यावर वारेमाप खर्च केला जात आहे. हॉटेल, ढाबे यांचा दररोजचा लाखो रुपयांचा गल्ला होत आहे. दारूचा धंदाही तेजीत आहे. लाखो रुपये खर्च होत आहे. (वार्ताहर)