शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

लघुउद्योजक हैराण

By admin | Updated: July 24, 2015 04:29 IST

एमआयडीसी भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने लघुउद्योजक वैतागले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वीजवितरण कंपनीचा हा खेळखंडोबा सुरू आहे

पिंपरी : एमआयडीसी भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने लघुउद्योजक वैतागले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वीजवितरण कंपनीचा हा खेळखंडोबा सुरू आहे. वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वेळेत दखल घेतली जात नाही. समस्या निवारणासाठी सुरू केलेल्या ‘टोल फ्री’ क्रमांकामुळे समस्येत अधिक भर पडली आहे. टोल फ्री क्रमांकावरुन एसएमएस आल्याशिवाय दुरुस्ती करता येत नसल्याचे उत्तर देऊन वीज कर्मचारी हात झटकतात. त्यामुळे टोल फ्री क्रमांकाने समस्येत अधिक भर पडली आहे. वीज केंद्रास फोन केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जाते. अनेकदा फोनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवला जातो. त्यामुळे संपर्कच करता येत नाही. टोल फ्रीचे केंद्र मुंबईत आहे. तो क्रमांक सतत बंद असतो. अनेकदा कॉल केल्यानंतर संपर्क होतो. कॉल सेंटरवरून संबंधित वीज केंद्राला एसएमएसद्वारे कळविले जाते. मात्र, अनेकदा त्यावर ठोस कारवार्ई केली जात नाही. या पद्धतीमुळे वेळ भरपूर जातो. जवळच केंद्र असताना टोल फ्रीला संपर्क करण्याची सक्ती केली जात असल्याने समस्या निवारणास अधिक वेळ जात आहे. त्यात येथील वीजजोडणी यंत्रणा आणि साहित्य ७ वर्षांपूर्वीचे आहे. ते कालबाह्य झाल्याने वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे.मनुष्यबळ कमी आहे. त्यातही कर्मचारी कंत्राटी असल्याने त्यांना कामाचे गांभीर्य आणि जबाबदारीची जाणीव नाही. या संदर्भात मुख्य कार्यालय, मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांकडे वारंवार तक्रार करूनही विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे लघुउद्योजक हैराण आहेत. वीज का केली, कधी येणार हे विचारल्यास ब्रेक डाऊन आहे. ट्रान्सफॉर्मर जळाला आहे. केबल दुरुस्ती सुरू आहे. दुरुस्ती काम सुरू आहे, अशी उत्तरे देऊन टोलवाटोलवी केली जाते. जबाबदारी टाळण्यासाठी टोल फ्री क्रमांकाचा आधार कर्मचारी आणि अधिकारी वर्ग घेत असल्याने दुरुस्ती वेळेत होत नाही. त्यामुळे उद्योजकांना वीज खंडित होण्याचा फटका सहन करावा लागत आहे. भोसरी, चिंचवड, तळवडे, चिखली, कुदळवाडी, लांडेवाडी, थेरगाव, पिंपरी या भागात सुमारे ८ हजार लहान-मोठे लघुउद्योग आहेत. यावर लाखो जण अवलंबून आहेत. या भागात दोन महिन्यांपासून अचानक वीज गायब होत आहे. दिवसांतून २ ते ४ वेळा वीज ये-जा होण्याचा लपंडावच सुरू आहे. एकदा वीज गेल्यास ती ५ मिनिटांत येते किंवा २ ते ३ तासांनी येते. कधी कधी दुसरा दिवस उजाडतो. अचानक वीज गेल्याने यंत्रे बंद पडतात. त्यामुळे कामगारांना कामाविना बसून राहावे लागते. या संदर्भात पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष नितीन बनकर यांनी सांगितले, ‘‘एमआयडीसी भागातील विजेची यंत्रणा जुनाट झाली आहे. त्यामुळे वारंवार वीज जाते. त्याचा फॉल्ट लवकर समजत नसल्याने दुरुस्ती वेळेत होत नाही. मनुष्यबळ कमी असल्याचे रडगाणे कायम सांगितले जाते. टोल फ्री क्रमांक देऊन या समस्येत भर घातली आहे. नेहमीच वीज जात असल्याने कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. उत्पादनात घट होत आहे. नाईलाजास्तव हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.’’तळवडे येथील लघुउद्योजक नीरज मंत्री यांनी सांगितले, ‘‘वीज कधी जाते, तर कधी जात नाही. वीज गेल्यास ती परत कधी येईल, हे सांगता येत नाही. वीज दिवसातून ५ ते ६ वेळा जाते. वीज केंद्राकडे तक्रार केल्यास कोणी जबाबदारी घेत नाही. अनेकदा रिसिव्हर बाजूला काढून ठेवला जातो. वारंवार वीज जात असल्याने वैताग आला आहे.’’भोसरी व तळवडे येथील लघुउद्योजक शिवाजी साखरे यांनी सांगितले, ‘‘वीज सतत जात असल्याने कंपन्यांचे आॅर्डर वेळेत पूर्ण करता येत नाही. त्यामुळे कंपन्यांचा दबाव वाढत आहे. त्यात कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. भरमसाट बिल न चुकता येते. मंदीच्या काळात तग धरून, कर्ज काढून उद्योग चालवीत आहेत. कामगारांचा पगार देणेही अनेकदा अवघड होऊन बसते. लघुउद्योजक डबघाईला आला आहे.’’ (प्रतिनिधी)