शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

यंत्रणा आहे; मनुष्यबळ कमी!

By admin | Updated: February 29, 2016 00:56 IST

महापालिकेच्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहनांसह इतर यंत्रणा असली, तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे त्या यंत्रणेचा उपयोग होत नाही.

पिंपरी : महापालिकेच्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहनांसह इतर यंत्रणा असली, तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे त्या यंत्रणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी निर्माण होत आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ १७७ चौरस किलोमीटर असून, शहराची लोकसंख्या २० लाखांवर पोहोचली आहे, तर शहरात सुमारे सात हजार उद्योग-धंदे आहेत. कुदळवाडी, भोसरी, चिंंचवडसह शहराच्या विविध भागांत छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. या परिसरात वारंवार आगीच्या घटना घडत असतात. त्यामुळे महापालिकेची अग्निशामक यंत्रणाही तितकीच सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र, इतक्या मोठ्या शहरात आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी केवळ चार अग्निशामक केंदे्रआहेत. त्यामुळे केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त अवधी लागतो. यामुळे घटनेची गांभीर्यता वाढू शकते. त्यामुळे केंद्रांचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. दरम्यान, आणखी आठ केंद्र उभारण्याची मागणी होत आहे. यासह मनुष्यबळही अपुरे पडत आहे. सध्या अधिकारी व कर्मचारी मिळून १३० जण आहेत. यासह आणखी दीडशे कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे. मात्र, त्या तुलनेत कर्मचारी नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहनचालक निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत; तर अनेक कर्मचारी असे आहेत की, वयोमानानुसार घटनेच्या वेळी त्यांना धावपळ करणेही शक्य होत नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर वाहनांसह सर्व यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचते. मात्र, आगीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जागा अपुरी असल्यास अथवा उंच इमारतीवर आग असल्यास अधिकाधिक कर्मचाऱ्यांची गरज भासते. त्यामुळे इतर यंत्रणा असूनही त्याचा उपयोग होत नाही. मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार मागणी होत असतानाही अद्याप उपलब्ध करून दिले जात नाही. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. (प्रतिनिधी)