शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मावळ परिसर : बदलत्या वातावरणामुळे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:39 IST

वातावरणातील सततचा बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. पाऊस व थंड वातावरणामुळे सरकारी रुग्णालयासह लहान मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

करंजगाव - वातावरणातील सततचा बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. पाऊस व थंड वातावरणामुळे सरकारी रुग्णालयासह लहान मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.वातावरणातील या बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर जाणवू लागला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.नाने मावळात मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी थेट ग्रामपंचायतच्या मोटारीद्वारे घरोघरी जाते. परंतु घरोघरी जाणारे पाणी फिल्टर होत नसल्यामुळे दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला इतर अजारांचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती कोंडिवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष विष्णू गायकवाड यांनी दिली.मावळातील अनेक गावांमध्ये आठवडे बाजार भरतो. या बाजारात अनेकदा उरलेला भाजीपालारस्त्यावर टाकला जातो. हा भाजीपाला वेळेत न उचलल्याने त्यावर पावसाचे पाणी पडल्यास दुर्गंधीसह रोगराई पसरण्यास मदत होते. त्यामुळे बाजारातील भाजीपाला व कचरा प्रशासनाने तातडीने उचलावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.पावसाळ्यात दूषित पाणी पिऊ नये. उकळून पाणी प्यावे. अन्यथा अतिसार, जुलाब असे जलजन्य आजार होण्याची शक्यता असते. बाहेरील उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. यासह आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक आहे.- डॉ. किशोर यादव,वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र देहू.जंतुनाशक फवारणीची गरजपंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीने गावोगावी जंतुनाशक फवारणी करावी जेणे करून नागरिकांचे आरोग्य सुधारले जाईल, असे उद्योजक अशोक कांबळे म्हणाले.नागरिकांनी सडका भाजीपाला, उरलेले अन्न, इतर पदार्थ थेट घराच्या आजू बाजूला न टाकता थेट शेनकई (शोष खड्ड्यात) मध्ये टाकावेत, अशी माहिती कृष्णा ठाकर यांनी दिली.जोरदार पावसामुळे खेडेगावमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर शाळांच्या पटांगणामध्ये डबके साचलेले आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे़

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnewsबातम्या