शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

माऊलींचे पालखी प्रस्थान ६ जुलैला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:05 IST

श्री संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे ६ जुलैला आळंदीतून प्रस्थान होत आहे.

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे ६ जुलैला आळंदीतून प्रस्थान होत आहे. ‘श्रीं’च्या पालखी सोहळाप्रमुखपदी अ‍ॅड. विकास ढगे-पाटील यांची निवड झाल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी दिली.श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीच्या पुणे कार्यालयात या निवडीसाठी प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत मासिक सभा झाली. या सभेत उपस्थित विश्वस्त मंडळांच्या चर्चेनंतर अ‍ॅड. पाटील यांची पालखी सोहळाप्रमुखपदी निवड झाली.अलंकापुरीतून ६ जुलैला पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. आळंदी ते पंढरपूर या मार्गावर प्रस्थानानंतर ठिकठिकाणी १६ मुक्काम होतील. ६ जुलैला पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर हरिनाम गजरात पायी वारीतून प्रवास करीत १७व्या दिवशी ‘श्रीं’चा पालखी सोहळा २२ जुलैला वाखरी मार्गे पंढरीला येईल. २३ जुलैला आषाढी एकादशी सोहळ्यात साजरी होईल.सोहळ्यातील पायी वारी प्रवासात भाविक, वारकरी, नागरिक आणि प्रवासात सेवासाधने असणारी वाहनव्यवस्था प्रभावी ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाला दक्षता घेण्याचे दृष्टीने संस्थान कमिटीने सेवासुविधांसाठी मागण्यांचे निवेदन दिले आहे.पायी वारी काळात भाविकांना सुलभ दर्शनव्यवस्था, पालखी विसावे, मुक्कामाचे ठिकाणी आरोग्य, स्वच्छता, पालखीतळ परिसरात सेवासुविधा मिळण्यासाठी संस्थानाने प्राधान्य दिले आहे. यासाठी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, सेवक बाळासाहेब चोपदार रणदिवे, राजाभाऊ चोपदार रंधवे, पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे, आळंदी देवस्थानाचे विश्वस्त पदाधिकारी यांनी पालखी मार्गावरील तळांची संयुक्त पाहणी केली. दरम्यान, पाहणीत सेवासुविधांसाठी तसेच स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, इंधन व्यवस्था आदींबाबत समस्या जाणून घेतल्या. अधिक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आळंदी संस्थान मासिक सभेत चर्चा करून पुणे विभागीय आयुक्त, पुणे, सातारा, सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तळावरील सोयीसुविधांसाठी साकडे घालण्यात आले आहे. यासाठी प्रमुख विश्वस्त टिळक यांनी निवेदन दिले असल्याचे सांगितले.पालखीतळाला संरक्षक भिंतीचे बांधकाम, तळांचे सपाटीकरण, मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात यावे, श्रींची पालखी विसावण्यासाठी ७ फूट लांब, ४ फूट रुंद व २ फूट उंच मजबूत कट्टा ओटा विकसित करावा, या ओट्यासमोर कीर्तन, जागर धार्मिक कार्यक्रमासाठी ७० फूट लांब आणि ३० फूट रुंद जागेत सिमेंटीकरणाचे काम करण्यात यावे, श्रींचे भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्थेसाठी दर्शनबारी, तळ परिसरात चारही बाजूंनीपिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, स्वच्छतागृहे तसेच विद्युत व्यवस्था अखंड ठेवण्याची दक्षता घेतली जावी अशी मागणी डॉ. अभय टिळक यांनी केली आहे.