शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

मराठी कलाकारांना नाही राज्यात न्याय

By admin | Updated: June 30, 2017 03:40 IST

ज्याचा महाराष्ट्राच्या मातीशी कधी संबंध आला नाही, अशा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन मोठ्या होतात. मात्र, मराठी कलाकारांना म्हणावा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : ज्याचा महाराष्ट्राच्या मातीशी कधी संबंध आला नाही, अशा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन मोठ्या होतात. मात्र, मराठी कलाकारांना म्हणावा तसा न्याय मिळत नाही. असेच चालत राहिले तर मराठीत कलाकार तयार होणार नाहीत, अशी खंत आता ज्येष्ठ कलाकरांमध्येही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा मराठी कलाकार जिवंत राहणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते गुुरुवारी सिनेकलाकारांना नटवर्य श्रीरामजी गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, आमदार संजय केळकर, प्राचार्य नितीन बानगुडे पाटील, महापौर नितीन काळजे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक अमित ढाके, नामदेव ढाके, अमित गावडे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, अनिता दाते, जयवंत वाडकर, सिद्धेश्वर झाडबुके, दिग्दर्शक विवेक वाघ, राहुल वडगावे आदी उपस्थित होते.संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्रात आज सिनेसृष्टीला पूरक असे वातावरण असूनही मराठी कलाकारांना वाव मिळत नाही, रजनीकांत हा मराठी माणूस असून दक्षिण भारतात जाऊन मोठा झाला. ज्येष्ठ मराठी कलाकरांनाही भविष्यात मराठी चित्रपट व त्या कलाकरांच्या स्थिती बिकट दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी व मराठी जनतेनेच मराठी कलाकार जिवंत ठेवला पाहिजे. तरच गोजमगुंडे यांनी रोवलेली अभिनयाची मुहूर्तमेढ शिखरापर्यंत जाईल.अभिनेते मकरंद अनासपुरे, अनिता दाते, जयवंत वाडकर, सिद्धेश्वर झाडबुके, दिग्दर्शक विवेक वाघ यांना नटवर्य श्रीरामजी गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनासपुरे म्हणाले की, तब्बल ३ तपापूर्वी बीडमध्ये निखारे या चित्रपटाचे शुटींग चालू होते. या चित्रपटाचे हिरो होत़े श्रीराम गोजमगुंडे. त्या वेळी मी शाळा बुडवून शुटींगला जायचो व मलाही या चित्रपटात काम करावे असे वाटायचे, ती इच्छा किंवा माझे परिश्रम या पुरस्कारामुळे तीन तपांनी एक वर्तुळ पूर्ण झाले. या वेळी ही दौलत महाराष्ट्राची हा विशेष कार्यक्रम ही सादर करण्यात आला.