शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र जिवंत

By admin | Updated: April 29, 2017 04:05 IST

जोपर्यंत वारकरी संप्रदाय जिवंत आहे, तोपर्यंत महाराष्ट्र जिवंत राहील, असे प्रतिपादन भारूडसम्राट हभप लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी

पिंपरी : जोपर्यंत वारकरी संप्रदाय जिवंत आहे, तोपर्यंत महाराष्ट्र जिवंत राहील, असे प्रतिपादन भारूडसम्राट हभप लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी काळभोरनगर, चिंचवड येथे केले. पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत तीन दिवसीय सुबोध व्याख्यानमालेत ‘मानवी जीवनाचे सत्य’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना लक्ष्मणमहाराज बोलत होते. या प्रसंगी नगरसेवक जावेद शेख, नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक मारुती भापकर, शंकर पांढरकर, दामोदर येवले, कवी अशोक कोठारी, अरविंद वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य संयोजक शंकर काळभोर यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानमालेच्या पंधरा वर्षे वाटचालीची माहिती दिली. राजगुरू म्हणाले, ‘‘आज समाजाला संतविचारांची अत्यंत गरज आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनींनंतर अतिशय दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त होतो; परंतु आयुष्याचा एक क्षणही समाज, देश आणि अध्यात्माकरिता खर्च न करता माणूस जन्म वाया घालवतो. नाशवंत प्रपंचाची ओढ मरणघटिका जवळ आली तरी कमी होत नाही. प्रपंचात राहूनदेखील नरदेहाचे सार्थक करता येते; परंतु दिवसेंदिवस घराघरांतील संस्कृती बिघडत चालली आहे. व्यसन हीच तरुणांची फॅशन झाली आहे. व्यसनाधीनतेने स्वत:चे आणि पर्यायाने देशाचे नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)