शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

विकासाला माफियांचा खोडा

By admin | Updated: December 9, 2015 00:15 IST

स्वर्गीय राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरी हिंजवडीतील विकासातील प्रमुख अडसर सदोष भूसंपादन कारवाई आहे. स्थानिक माफिया आणि एमआयडीसीचे अधिकारी यांच्या संगनमतामुळे

विश्वास मोरे,  पिंपरीस्वर्गीय राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरी हिंजवडीतील विकासातील प्रमुख अडसर सदोष भूसंपादन कारवाई आहे. स्थानिक माफिया आणि एमआयडीसीचे अधिकारी यांच्या संगनमतामुळे विकासात अडचण येत आहे. माहिती-तंत्रज्ञाननगरीसाठीचे बस टर्मिनस, वाहनतळ, हिंजवडीस जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची आरक्षणे अजूनही विकसित झालेली नाहीत. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने हिंजवडी, माण, मारुंजी आयटी पार्कची निर्मिती केली. मात्र, पायाभूत सुविधांचा कमालीचा अभाव येथे दिसून येतो. आयटी पार्कमध्ये येण्यासाठी केवळ तीन रस्ते आहेत. मात्र, बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नाही. एकाच रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. पायाभूत सुविधांचा अभाव, याबरोबरच रस्ते, आरक्षणे विकसित झालेली नाहीत. बहुतांश रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. त्या कामांना मुहूर्त लागणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हाळुंगे ते हिंजवडी रस्ता बासनात हिंजवडीतील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी म्हाळुंगे ते हिंजवडी आयटी पार्क टप्पा दोनला जोडणाऱ्या रस्त्याचा पर्याय सुचविण्यात आला होता. २००८ मध्ये याबाबतची भूसंपादन कारवाईही सुरू केली होती. नोटिफिकेशनही झाले होते. सदानंद हॉटेल ते टप्पा दोन असे नियोजन केले होते. मुळा नदीवर पूल उभारण्याचे नियोजन केले होते. मात्र, भूसंपादनात अन्याय झाल्याने शेतकऱ्यांनी हे काम थांबविले होते. बिल्डर आणि भूमाफियांच्या मदतीने शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याने न्यायालयात धाव घेतली होती. भूसंपादन कारवाईसाठी सुमारे ३२ कोटींचा निधी मंजूर केला होता. भूसंपादन कारवाई संशयास्पद असल्याने वाकड-हिंजवडीतील अनेक शेतकऱ्यांनी न्यायालयात दावे दाखले केले आहेत. त्यामुळे हे काम बंद आहे.गावांना जोडणारे रस्ते बंद माहिती-तंत्रज्ञाननगरी विकसित करताना जुन्या गाव रस्त्याचा विचार न करता विकास केल्याचे दिसून येते. नेरे, कासारसाई, मारुंजी ते माणगावला जाण्यासाठी मारूंजीच्या शेजारून पाणंद रस्ता होता. तसेच जुन्या कॅनॉलच्या कडेनेही रस्ता निर्माण केला होता. मात्र, मारुंजी गावातून फेज दोनमार्गे माणला जाणारा रस्ता जड वाहनांना बंद केला आहे. आयटी पार्क ते गाव हा केवळ ७०० मी.चा रस्ता बंद केल्याने या भागातील नागरिकांना १० कि.मी.चा वळसा घालून जावे लागते.