शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीच्या विकासासाठी दुवा

By admin | Updated: July 4, 2017 03:42 IST

येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात रमजान ईदनिमित्त सर्वधर्मीयांकडून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम बांधवांनी उद्योगनगरीतील

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात रमजान ईदनिमित्त सर्वधर्मीयांकडून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम बांधवांनी उद्योगनगरीतील शांतता, सलोखा, समृद्धी आणि विकासासाठी दुवा मागितली. ‘रमजान हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मागितलेली दुवा मान्य होते. या पवित्र महिन्यात उपवास करून अल्लाहचा आशीर्वाद प्राप्त होतो. देशाच्या प्रगतीसाठी, तसेच सर्वांच्या कल्याणासाठी मुस्लिम बांधवांनी शिक्षणात प्रगती केली पाहिजे. उद्योगनगरीच्या सर्वांगीण विकासाची दुवा मागण्याची गरज आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात जश्न-ए-ईद-मिलनचा दिमाखदार कार्यक्रम झाला. या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी महापौर आझम पानसरे, सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते. भाईजान काझी यांनी संयोजन केले. या वेळी सुलतान नाझॉं कव्वाल यांच्या कव्वालीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सामिष भोजनासह शिरखुर्म्याचा बेतही आखला होता.या वेळी संयोजक भाईजान काझी म्हणाले, ‘‘पुण्यात सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्याची ताकद असलेला लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री गिरीश बापट यांनी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता पिंपरी-चिंचवडमधील विविध विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत. शहरातील पायाभूत सोयी-सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांची जाण असलेला नेता लाभला आहे.’’पालकमंत्री बापट म्हणाले, ‘‘रमजान हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मागितलेली ‘दुवा’ मान्य होते. या पवित्र महिन्यात उपवास करून अल्लाहचा आशीर्वाद प्राप्त होतो. देशाच्या प्रगतीसाठी, तसेच सर्वांच्या कल्याणासाठी मुस्लिम बांधवांनी शिक्षणात प्रगती केली पाहिजे. जाती-धर्माच्या अगोदर आपण माणूस आहोत, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आपल्या सर्वांनी केलेली ‘दुवा’ कबूल होऊन देशाची उत्तमोत्तम प्रगती होत राहील.