शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

आळंदीमधील भूसंपादन लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:57 IST

१५० कोटींचा भरीव निधी : शासन निर्णयाचे स्वागत; रस्ते विकासाला निधी मिळणार

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी तत्कालीन आघाडी सरकारने सुमारे सव्वा दोनशे कोटी रुपयांचा निधी विकास आराखड्याच्या माध्यमातून जाहीर करून आळंदीत येणाऱ्या राज्य परिसरातील भाविकांसाठी विविध सेवा-सुविधा देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकासाचा मार्ग मोकळा होणार होता. मात्र गेल्या चार वर्षांत भूसंपादनासाठी फारसा निधी उपलब्ध न झाल्याने आळंदीसह राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांतील विकास जागांचे भूसंपादनाअभावी विकास खुंटला होता.

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध विकासकामांचा आढावा घेत सुमारे १५० कोटी रुपयांचा भरीव निधी भूसंपादनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत जाहीर केला. यामुळे देवाच्या आळंदीतील नागरिकांसह भाविकांना विविध सेवा- सुविधा मिळण्याचा मार्ग आता प्रशस्त होणार आहे. या निर्णयाने राज्यातील इतर तीर्थक्षेत्र विकासासह आळंदी विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी लागलेले विलंबाचे ग्रहण सुटणार आहे. या शासन निर्णयाचे आळंदीत स्वागत केले आहे.आळंदीत शासन निर्णयाचे जोरदार स्वागत...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आराखड्यातील विविध विकासकामांच्या जागांसाठीच्या भूसंपादनाला सुमारे १५० कोटी रुपये भरीव निधी देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे राज्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांना लागलेले विलंबाचे ग्रहण सुटणार आहे. यामुळे त्यांनी घेतलेल्या शासन निर्णयाचे आळंदी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक सागर भोसले, नगरसेविका प्रमिला रहाणे आदींनीस्वागत केले आहे.तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासाला गती मिळणारराज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून तीर्थक्षेत्र आळंदीत विविध विकासकामे सुरु आहेत. यातील विविध विकासकामांतील जागांच्या भूसंपादनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आळंदीलादेखील निधी उपलब्ध होणार असल्याने आळंदीतील भूसंपादनाच्या जागा विकासाला उपलब्ध होऊन विकासकामांना गती मिळणार असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदी