शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीमधील भूसंपादन लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:57 IST

१५० कोटींचा भरीव निधी : शासन निर्णयाचे स्वागत; रस्ते विकासाला निधी मिळणार

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी तत्कालीन आघाडी सरकारने सुमारे सव्वा दोनशे कोटी रुपयांचा निधी विकास आराखड्याच्या माध्यमातून जाहीर करून आळंदीत येणाऱ्या राज्य परिसरातील भाविकांसाठी विविध सेवा-सुविधा देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकासाचा मार्ग मोकळा होणार होता. मात्र गेल्या चार वर्षांत भूसंपादनासाठी फारसा निधी उपलब्ध न झाल्याने आळंदीसह राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांतील विकास जागांचे भूसंपादनाअभावी विकास खुंटला होता.

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध विकासकामांचा आढावा घेत सुमारे १५० कोटी रुपयांचा भरीव निधी भूसंपादनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत जाहीर केला. यामुळे देवाच्या आळंदीतील नागरिकांसह भाविकांना विविध सेवा- सुविधा मिळण्याचा मार्ग आता प्रशस्त होणार आहे. या निर्णयाने राज्यातील इतर तीर्थक्षेत्र विकासासह आळंदी विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी लागलेले विलंबाचे ग्रहण सुटणार आहे. या शासन निर्णयाचे आळंदीत स्वागत केले आहे.आळंदीत शासन निर्णयाचे जोरदार स्वागत...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आराखड्यातील विविध विकासकामांच्या जागांसाठीच्या भूसंपादनाला सुमारे १५० कोटी रुपये भरीव निधी देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे राज्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांना लागलेले विलंबाचे ग्रहण सुटणार आहे. यामुळे त्यांनी घेतलेल्या शासन निर्णयाचे आळंदी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक सागर भोसले, नगरसेविका प्रमिला रहाणे आदींनीस्वागत केले आहे.तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासाला गती मिळणारराज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून तीर्थक्षेत्र आळंदीत विविध विकासकामे सुरु आहेत. यातील विविध विकासकामांतील जागांच्या भूसंपादनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आळंदीलादेखील निधी उपलब्ध होणार असल्याने आळंदीतील भूसंपादनाच्या जागा विकासाला उपलब्ध होऊन विकासकामांना गती मिळणार असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदी