शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आळंदीमधील भूसंपादन लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:57 IST

१५० कोटींचा भरीव निधी : शासन निर्णयाचे स्वागत; रस्ते विकासाला निधी मिळणार

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी तत्कालीन आघाडी सरकारने सुमारे सव्वा दोनशे कोटी रुपयांचा निधी विकास आराखड्याच्या माध्यमातून जाहीर करून आळंदीत येणाऱ्या राज्य परिसरातील भाविकांसाठी विविध सेवा-सुविधा देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकासाचा मार्ग मोकळा होणार होता. मात्र गेल्या चार वर्षांत भूसंपादनासाठी फारसा निधी उपलब्ध न झाल्याने आळंदीसह राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांतील विकास जागांचे भूसंपादनाअभावी विकास खुंटला होता.

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध विकासकामांचा आढावा घेत सुमारे १५० कोटी रुपयांचा भरीव निधी भूसंपादनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत जाहीर केला. यामुळे देवाच्या आळंदीतील नागरिकांसह भाविकांना विविध सेवा- सुविधा मिळण्याचा मार्ग आता प्रशस्त होणार आहे. या निर्णयाने राज्यातील इतर तीर्थक्षेत्र विकासासह आळंदी विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी लागलेले विलंबाचे ग्रहण सुटणार आहे. या शासन निर्णयाचे आळंदीत स्वागत केले आहे.आळंदीत शासन निर्णयाचे जोरदार स्वागत...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आराखड्यातील विविध विकासकामांच्या जागांसाठीच्या भूसंपादनाला सुमारे १५० कोटी रुपये भरीव निधी देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे राज्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांना लागलेले विलंबाचे ग्रहण सुटणार आहे. यामुळे त्यांनी घेतलेल्या शासन निर्णयाचे आळंदी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक सागर भोसले, नगरसेविका प्रमिला रहाणे आदींनीस्वागत केले आहे.तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासाला गती मिळणारराज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून तीर्थक्षेत्र आळंदीत विविध विकासकामे सुरु आहेत. यातील विविध विकासकामांतील जागांच्या भूसंपादनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आळंदीलादेखील निधी उपलब्ध होणार असल्याने आळंदीतील भूसंपादनाच्या जागा विकासाला उपलब्ध होऊन विकासकामांना गती मिळणार असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदी