शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दुर्धर आजारांच्या औषधांचा अभाव

By admin | Updated: November 26, 2015 00:51 IST

अल्प दरात जेनेरिक औषधविक्रीचे ‘जन औषधी’ स्टोअर येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) कंपनीने सुरू केले आहे.

पिंपरी : अल्प दरात जेनेरिक औषधविक्रीचे ‘जन औषधी’ स्टोअर येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) कंपनीने सुरू केले आहे. मात्र तेथे कर्करोग, मूत्रपिंडाचे विकार, थायरॉईड, मनोविकार अशा दुर्धर आजारांवर औषधेच नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. येथे येऊन रिकाम्या हातांनी फिरावे लागते. तसेच, इतर आजारांवरील औषधांचा पुरवठा अनियमित असल्याने वारंवार हेलपाटे मारावे लागतात. बाजारातील महागडी औषधे खरेदी करणे परवडत नसल्याने गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना औषधांअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. ऐपत नसल्याने औषधांअभावी अनेकांचा मृत्यू ओढविल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे रोखण्यासाठी गरीब, गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी केंद्र शासनाने येथील एचए कंपनी कॉलनीच्या प्रवेशद्वारावर गेल्या वर्षी जनऔषधी स्टोअर सुरू केले. स्टोअरमध्ये बाजारातील औषधांपेक्षा ५० ते ७० टक्के कमी किमतीने औषधे मिळतात. रक्तदाब, हृदयविकार, पोटाचे विकार, मधुमेह, तसेच सर्दी, खोकला, थंडी, ताप आणि टॉनिकची औषधे उपलब्ध आहेत. मात्र कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, थायरॉईड, मनोविकार अशा दुर्धर आजारावरील औषधे उपलब्ध नाहीत. ही औषधे मिळतील म्हणून राज्यभरातून रुग्णांचे नातेवाईक मोठ्या आशेने येथे येतात. गेल्या महिन्यात उस्मानाबाद येथील २० वर्षांच्या तरुणीसाठी कर्करोगाच्या औषधांसाठी तिचे पालक आले होते. तसेच, मराठवाड्यातून मूत्रपिंड विकारग्रस्त तरुणांचे वडील आले होते. येथे ती औषधे न मिळाल्याने ते बराच वेळ तेथे रडत बसले होते.स्टोअरमध्ये उपलब्ध औषधांचा साठा लवकर संपत असल्याने तो वेळेवर पुरविला जात नाही. त्यामुळे यादीतील औषधांसाठीही अनेकदा चकरा माराव्या लागतात. ‘लोकमत’ प्रतिनिधीसमोरच चिंचवड येथून एक जण वडिलांच्या मधुमेह आणि रक्तदाबाच्या औषधाची यादी घेऊन आला. स्क्रिप्टमधील ७ पैकी एकही औषध शिल्लक नव्हते. त्यांना माघारी जावे लागले.(प्रतिनिधी)केंद्र शासनाच्या एचएएल, आयडीपीएल, केएपीएल, आरएपीएल, बंगाल केमिकल या कंपन्या औषधांचे उत्पादन करतात. तेथील औषधे येथे उपलब्ध आहेत. कर्करोग, मूत्रपिंडाचे विकार, थॉयरॉईड, मनोविकार या आजारावरील औषधे उत्पादित केले जात नसल्याने त्यांचा पुरवठायादीत समावेश नाही. खासगी कंपन्यांनी २० टक्के प्रमाणात जेनेरिक औषधे बनविण्याचा नियम आहे. मात्र, त्यांची अंमलबजावणी होत नाही. तसे झाल्यास नागरिकांना २० ते ३० टक्के स्वस्त दराने ती औषधे उपलब्ध होतील. सरकारच्या काही कंपन्यांत उत्पादन पुरेशा प्रमाणात होत नसल्याने पुरवठा मर्यादित आहे.- हेबती कांबळे, स्टोअर समन्वयक