शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कृती दल बैठकीचा अभाव

By admin | Updated: September 7, 2015 04:30 IST

कामगार उपायुक्त कार्यालयातर्फे दर महिन्यास बालकामगार निर्मूलन कृती दलाची बैठक होते. मात्र, गेली दोन महिने ती आयोजित केली गेली नाही

मिलिंद कांबळे पिंपरीकामगार उपायुक्त कार्यालयातर्फे दर महिन्यास बालकामगार निर्मूलन कृती दलाची बैठक होते. मात्र, गेली दोन महिने ती आयोजित केली गेली नाही. त्यामुळे बालकामगारांकडून पिळवणूक होत असलेल्या आस्थापनांवर गेली तीन महिने कोणतीही कारवाई झाली नाही. परिणामी, एकही धाडसत्र झाले नाही. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार बालकामगारांचे निर्मूलन करण्यासाठी कामगार कार्यालयाने पुणे जिल्हा बालकामगार कृती दल समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचे सदस्य आहेत. जिल्हाधिकारी सौरभ राव हे अध्यक्ष असून, अप्पर कामगार आयुक्त रत्नदीप हेंद्रे सचिव आहेत. समितीची दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी बैठक होते. त्यात कारवाईसंदर्भात अहवाल सादर केला जातो. सर्व्हेत ज्या आस्थापनांमध्ये बालकामगार आहेत, त्यांची माहिती दिली जाते. एका विभागातील (पॉकेट) आस्थापनांची सविस्तर माहिती घेऊन आखणी केली जाते. त्यावर चर्चा करून धाडसत्राचे नियोजन केले जाते. पोलीस बंदोबस्त आणि आवश्यकतेनुसार वाहने घेऊन कारवाई केली जाते. बालकामगारांची सुटका करून, त्यांना बालसुधारगृहात पाठविले जाते. संबंधित मालकांवर गुन्हे दाखल केले जातात. अप्पर कामगार आयुक्त रत्नदीप हेंद्रे यांनी सांगितले, ‘‘ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जुलै व आॅगस्ट महिन्यात बैठक झाली नाही. मात्र, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत संवाद सुरू होता. येत्या बैठकीत चर्चा करून होईल.’’बाल श्रम कायदा १९८६ व २०१२नुसार १४ वर्षांखालील मुले व मुलींना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही बेकरी, टपरी, अमृततुल्य, हॉटेल्स, गॅरेज, वीटभट्टी, लघु व घरगुती उद्योग, रस्ते व इमारत बांधकाम, शिलाईकाम, किराणा आदी आस्थापनांमध्ये लहान मुलांना कामावर ठेवले जाते. कामाला लावून त्यांची शारीरिक व मानसिक पिळवणूकही केली जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अशा प्रकारे असंख्य बालकांना राबवून घेतले जात आहे. ‘लोकमत’ने पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही बाब प्रकर्षाने पुढे आली. बालकामगार मोठ्या प्रमाणात राबत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आहे. ९ मालकांवर गुन्हे दाखल गेली दोन महिने बैठकच न झाल्याने कारवाई केली गेली नाही. त्यामुळे जुलै आणि आॅगस्ट महिन्यात एकही धाडसत्र घेतले गेले नाही. परिणामी, अनेक आस्थापनांमध्ये बालकामगारांची पिळवणूक सुरू आहे. या वर्षात जानेवारी ते जूनपर्यंत २० धाडसत्रे झाली. त्यात ८९ आस्थापनांवर कारवाई करून, १५ बालकामगारांना मुक्त करण्यात आले. एकूण ९ मालकांवर गुन्हे दाखल केले गेले.