शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कृती दल बैठकीचा अभाव

By admin | Updated: September 7, 2015 04:30 IST

कामगार उपायुक्त कार्यालयातर्फे दर महिन्यास बालकामगार निर्मूलन कृती दलाची बैठक होते. मात्र, गेली दोन महिने ती आयोजित केली गेली नाही

मिलिंद कांबळे पिंपरीकामगार उपायुक्त कार्यालयातर्फे दर महिन्यास बालकामगार निर्मूलन कृती दलाची बैठक होते. मात्र, गेली दोन महिने ती आयोजित केली गेली नाही. त्यामुळे बालकामगारांकडून पिळवणूक होत असलेल्या आस्थापनांवर गेली तीन महिने कोणतीही कारवाई झाली नाही. परिणामी, एकही धाडसत्र झाले नाही. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार बालकामगारांचे निर्मूलन करण्यासाठी कामगार कार्यालयाने पुणे जिल्हा बालकामगार कृती दल समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचे सदस्य आहेत. जिल्हाधिकारी सौरभ राव हे अध्यक्ष असून, अप्पर कामगार आयुक्त रत्नदीप हेंद्रे सचिव आहेत. समितीची दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी बैठक होते. त्यात कारवाईसंदर्भात अहवाल सादर केला जातो. सर्व्हेत ज्या आस्थापनांमध्ये बालकामगार आहेत, त्यांची माहिती दिली जाते. एका विभागातील (पॉकेट) आस्थापनांची सविस्तर माहिती घेऊन आखणी केली जाते. त्यावर चर्चा करून धाडसत्राचे नियोजन केले जाते. पोलीस बंदोबस्त आणि आवश्यकतेनुसार वाहने घेऊन कारवाई केली जाते. बालकामगारांची सुटका करून, त्यांना बालसुधारगृहात पाठविले जाते. संबंधित मालकांवर गुन्हे दाखल केले जातात. अप्पर कामगार आयुक्त रत्नदीप हेंद्रे यांनी सांगितले, ‘‘ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जुलै व आॅगस्ट महिन्यात बैठक झाली नाही. मात्र, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत संवाद सुरू होता. येत्या बैठकीत चर्चा करून होईल.’’बाल श्रम कायदा १९८६ व २०१२नुसार १४ वर्षांखालील मुले व मुलींना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही बेकरी, टपरी, अमृततुल्य, हॉटेल्स, गॅरेज, वीटभट्टी, लघु व घरगुती उद्योग, रस्ते व इमारत बांधकाम, शिलाईकाम, किराणा आदी आस्थापनांमध्ये लहान मुलांना कामावर ठेवले जाते. कामाला लावून त्यांची शारीरिक व मानसिक पिळवणूकही केली जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अशा प्रकारे असंख्य बालकांना राबवून घेतले जात आहे. ‘लोकमत’ने पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही बाब प्रकर्षाने पुढे आली. बालकामगार मोठ्या प्रमाणात राबत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आहे. ९ मालकांवर गुन्हे दाखल गेली दोन महिने बैठकच न झाल्याने कारवाई केली गेली नाही. त्यामुळे जुलै आणि आॅगस्ट महिन्यात एकही धाडसत्र घेतले गेले नाही. परिणामी, अनेक आस्थापनांमध्ये बालकामगारांची पिळवणूक सुरू आहे. या वर्षात जानेवारी ते जूनपर्यंत २० धाडसत्रे झाली. त्यात ८९ आस्थापनांवर कारवाई करून, १५ बालकामगारांना मुक्त करण्यात आले. एकूण ९ मालकांवर गुन्हे दाखल केले गेले.