शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

जलपर्णीने कोंडतोय श्वास

By admin | Updated: April 26, 2017 03:52 IST

इंद्रायणी नदीचे पाणी हवेली आणि खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी या पुण्यभूमीमध्ये असलेल्या चिखली, तळवडे, मोई, मोशी

प्रमोद सस्ते / मोशी इंद्रायणी नदीचे पाणी हवेली आणि खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी या पुण्यभूमीमध्ये असलेल्या चिखली, तळवडे, मोई, मोशी, चिंबळी, डुडुळगाव, केळगाव, चऱ्होली, गोलेगाव, मरकळ आदी ठिकाणच्या गावातील शेतकरीवर्गांना शेतीसाठी व पिण्यासाठी तसेच जनावरांना पिण्यासाठी या पाण्याचा फायदा व्हावा म्हणून जलसंपदा विभाग महाराष्ट्रा शासनाने इंद्रायणी नदीवर देहू ते मरकळ या ठिकाणी जवळपास सहा ते सात बंधारे बांधले आहेत. या परिसरात उन्हाळ्यात शेतीला व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून शासनाच्या वतीने दर वर्षी उन्हाळा सुरू झाला की बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी आडविले जाते़ परंतु, त्या अगोदरपासूनच जलपर्णीने वेढले जाते. त्यामुळे संपूर्ण नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे.जलपर्णी बरोबरच पिंपरी-चिंचवड हद्दीतील तळवडे, चिखली, एमआयडीसीचे साडपांणी व आॅइल मिश्रित रासायनिक पाणी थेट या इंद्रायणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी पूर्णपणे दूषित होत आहे़ त्यामुळे जलपर्णी कुजली असल्याने माशांसह इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.महापालिका प्रशासन व अधिकारी यांच्याकडून अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे इंद्रायणी नदीत रसायन मिश्रित पाणी सोडण्यात येणाऱ्या कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे अशा कंपनीधारकांना कोणत्याही प्रकारचा वचक राहिला नसून, ते बिनदिक्कतपणे असे रसायन मिश्रित पाणी नदीत सोडत आहेत. याबाबत वेळीच दखल घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.जलपर्णीमुळे बांधण्यात आलेल्या सहाही बंधाऱ्यात पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने शेतकरीही त्रस्त झाले आहेत.