शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जलपर्णीने कोंडतोय श्वास

By admin | Updated: April 26, 2017 03:52 IST

इंद्रायणी नदीचे पाणी हवेली आणि खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी या पुण्यभूमीमध्ये असलेल्या चिखली, तळवडे, मोई, मोशी

प्रमोद सस्ते / मोशी इंद्रायणी नदीचे पाणी हवेली आणि खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी या पुण्यभूमीमध्ये असलेल्या चिखली, तळवडे, मोई, मोशी, चिंबळी, डुडुळगाव, केळगाव, चऱ्होली, गोलेगाव, मरकळ आदी ठिकाणच्या गावातील शेतकरीवर्गांना शेतीसाठी व पिण्यासाठी तसेच जनावरांना पिण्यासाठी या पाण्याचा फायदा व्हावा म्हणून जलसंपदा विभाग महाराष्ट्रा शासनाने इंद्रायणी नदीवर देहू ते मरकळ या ठिकाणी जवळपास सहा ते सात बंधारे बांधले आहेत. या परिसरात उन्हाळ्यात शेतीला व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून शासनाच्या वतीने दर वर्षी उन्हाळा सुरू झाला की बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी आडविले जाते़ परंतु, त्या अगोदरपासूनच जलपर्णीने वेढले जाते. त्यामुळे संपूर्ण नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे.जलपर्णी बरोबरच पिंपरी-चिंचवड हद्दीतील तळवडे, चिखली, एमआयडीसीचे साडपांणी व आॅइल मिश्रित रासायनिक पाणी थेट या इंद्रायणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी पूर्णपणे दूषित होत आहे़ त्यामुळे जलपर्णी कुजली असल्याने माशांसह इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.महापालिका प्रशासन व अधिकारी यांच्याकडून अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे इंद्रायणी नदीत रसायन मिश्रित पाणी सोडण्यात येणाऱ्या कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे अशा कंपनीधारकांना कोणत्याही प्रकारचा वचक राहिला नसून, ते बिनदिक्कतपणे असे रसायन मिश्रित पाणी नदीत सोडत आहेत. याबाबत वेळीच दखल घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.जलपर्णीमुळे बांधण्यात आलेल्या सहाही बंधाऱ्यात पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने शेतकरीही त्रस्त झाले आहेत.