शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जयंती महोत्सवात प्रबोधनावर भर हवा

By admin | Updated: March 28, 2017 02:26 IST

महापालिका आयोजित करीत असलेल्या जयंती महोत्सवात महामानवांच्या जीवनकार्याशी सुसंगत अशा प्रबोधनपर

पिंपरी : महापालिका आयोजित करीत असलेल्या जयंती महोत्सवात महामानवांच्या जीवनकार्याशी सुसंगत अशा प्रबोधनपर कार्यक्रमावर भर द्यावा, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.याही वर्षी महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दि. ११ ते १४ एप्रिल असा म्हणजे राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असा संपन्न होत असतो. या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यात मनोरंजनावर अधिक भर असतो. ‘विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले’ असा संदेश देणारे महात्मा फुले आणि ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश देणारे बाबासाहेब यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करीत असताना या दोन्ही महामानवांच्या या संदेशाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे वाटते. या महामानवांनी आपल्या जीवनकाळात सामाजिक समानतेचा घेतलेला ध्यास, स्त्री-पुरुष समानतेसाठी केलेले कार्य, शिक्षण प्रसाराची धरलेली कास, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व धार्मिक विषमतेविरुद्ध केलेला संघर्ष या सर्वांचा प्रभावी व परिणामकारक प्रसार होईल, असे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. (प्रतिनिधी)सामाजिक प्रबोधनाच्या, विषमता निर्मूलनाच्या क्षेत्रात, तसेच सामाजिक क्षेत्रात प्रभावी व नि:स्वार्थपणे कार्य करीत असलेल्या शहरातील कार्यकर्त्यास डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे. या दोन्ही महामानवांच्या नावाने मागासवर्गीय विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरू करण्यात यावी. समाजातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात किमान एक अद्ययावत अभ्यासिका सुरू करण्यात यावी. प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करणे त्यांना बऱ्याचदा अशक्य होते. अशा विद्यार्थ्यांसाठी अर्थसाहाय्य योजना सुरू करण्यात यावी.