शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

जनाईचे पाणी पोहोचले खोरला

By admin | Updated: May 4, 2015 02:55 IST

परिसरातील पद्मावती तलावात जनाई उपसा सिंचन योजनेच्या वितरिका टप्पा क्र. ३ मधून रविवारी पाणी सोडण्यात आले आहे.

खोर : परिसरातील पद्मावती तलावात जनाई उपसा सिंचन योजनेच्या वितरिका टप्पा क्र. ३ मधून रविवारी पाणी सोडण्यात आले आहे.जनाई उपसा सिंचन योजनेच्या पुरंदर शाखेच्या सिंचन योजनेवरती २ हजार ८५0 हेक्टर क्षेत्र सध्या अवलंबून आहे. त्यापैकी बारामती तालुक्यामधील ८५0 हेक्टर, तर पुरंदर तालुक्यामधील २ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. बारामती तालुक्यामधील वढाणे, बोरकरवाडी, आंबी ही गावे सिंचन योजनेच्या क्षेत्रामध्ये येत असून, पुरंदर तालुक्यामधील रिसे, पिसे, खोपडेवाडी, राजुरी, राघु भगतवाडी, खोसेवाडी, नायगाव, पांडेश्वर ही गावे या सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये येत आहे. मात्र, दौंड तालुक्याच्या उशाशी ही सिंचन योजना कार्यान्वित असूनदेखील या योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये दौंड तालुक्यामधील एकही गाव घेण्यात आलेले नाही.लोकवर्गणीच्या माध्यमातून खोर परिसरामधील असलेल्या हरिबाचीवाडी येथील पद्मावती तलावात ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामधून व आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांमधून पाणी सोडण्यात आले असल्याचे ग्रामस्थ नाना चौधरी यांनी सांगितले आहे. दौंड तालुक्यामधील गावांचा लाभक्षेत्रामध्ये सामाविष्ट नसल्याने पाणी आणण्यामध्ये शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे. लोकवर्गणीच्या माध्यामातून पाणी घेऊन शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनी उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पिकांकरिता टिकून ठेवण्याची वेळ येत आहे. खोरच्या पद्मावती तलावात जनाईच्या वितरिका क्र. ३ मधून पाणी सोडण्यात आले. या वेळी नाना चौधरी, बाळासाहेब चौधरी, तात्या चौधरी, रामभाऊ कोलते, दत्तात्रय चौधरी, श्रीरंग चौधरी, महादेव चौधरी, संतोष चौधरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या आधीदेखील गेल्या काही महिन्यांपूर्वी आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यामधून पाणी सोडण्यात आले होते. पद्मावती तलाव ते वितरिका क्र. ३ हे अंतर दीड किलोमीटर असून, शेतकऱ्यांनी पाइपलाइनच्या साहाय्याने तसेच पाट करून हे पाणी घेतलेले आहे. पद्मावती तलावाबरोबरच फडतरेवस्ती तलावातदेखील वितरिकेचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी डोंबेवाडी ग्रामस्थांनी केली आहे. जनाई योजनेचे पाणी शेतीला लाभदायक व स्वच्छ असून, सध्या हे पाणी शेतीबरोबरच वन्यप्राण्यांना देखील लाभदायक ठरत आहे.