शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

विजयापेक्षा लढत महत्त्वाची

By admin | Updated: February 15, 2017 01:59 IST

धाडसी खेळांमधील तळेगावातील मुलींची चमकदार कामगिरी उद्याच्या विजयाची नांदी देणारी आहे. लढत देणे हे महत्त्वाचे आहे.

तळेगाव दाभाडे : धाडसी खेळांमधील तळेगावातील मुलींची चमकदार कामगिरी उद्याच्या विजयाची नांदी देणारी आहे. लढत देणे हे महत्त्वाचे आहे. विजयी होणे हा सोपस्कार आहे. म्हणूनच आॅलिम्पिकचे ब्रीद स्पर्धेत विजयी होणे महत्त्वाचे नाही तर सहभागी होणे जास्त महत्त्वाचे आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी येथे व्यक्त केले.नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत येथील गणेश काकडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या ऋतुजा सुर्वे हिने सुवर्णपदक पटकाविले. त्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात काकडे बोलत होते. ऋतुजाचे यश हे अभिमानास्पद आहे. परंतु ज्यांना विजयी होता आले नाही त्यांनी खचून जाण्याचे कारण नाही, असे सांगून काकडे म्हणाले, आयुष्यात अनेक संधी येत असतात. त्यात यशापयशही येते. यशाने जे हुरळून जात नाहीत आणि अपयशाने खचून जात नाहीत तेच खरे खिलाडूवृत्तीचे असतात. जनमाणसात अशांना आदराचे स्थान कायम असते. ऋतुजाने तळेगावची शान राखली आहे.या वेळी क्रीडा प्रशिक्षक सुभाष दाभाडे यांनाही सन्मानित करण्यात आले. या वेळी पालक खेळाडू, फाउंडेशनचे सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांबरोबर पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विजेत्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)