शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

विजयापेक्षा लढत महत्त्वाची

By admin | Updated: February 15, 2017 01:59 IST

धाडसी खेळांमधील तळेगावातील मुलींची चमकदार कामगिरी उद्याच्या विजयाची नांदी देणारी आहे. लढत देणे हे महत्त्वाचे आहे.

तळेगाव दाभाडे : धाडसी खेळांमधील तळेगावातील मुलींची चमकदार कामगिरी उद्याच्या विजयाची नांदी देणारी आहे. लढत देणे हे महत्त्वाचे आहे. विजयी होणे हा सोपस्कार आहे. म्हणूनच आॅलिम्पिकचे ब्रीद स्पर्धेत विजयी होणे महत्त्वाचे नाही तर सहभागी होणे जास्त महत्त्वाचे आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी येथे व्यक्त केले.नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत येथील गणेश काकडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या ऋतुजा सुर्वे हिने सुवर्णपदक पटकाविले. त्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात काकडे बोलत होते. ऋतुजाचे यश हे अभिमानास्पद आहे. परंतु ज्यांना विजयी होता आले नाही त्यांनी खचून जाण्याचे कारण नाही, असे सांगून काकडे म्हणाले, आयुष्यात अनेक संधी येत असतात. त्यात यशापयशही येते. यशाने जे हुरळून जात नाहीत आणि अपयशाने खचून जात नाहीत तेच खरे खिलाडूवृत्तीचे असतात. जनमाणसात अशांना आदराचे स्थान कायम असते. ऋतुजाने तळेगावची शान राखली आहे.या वेळी क्रीडा प्रशिक्षक सुभाष दाभाडे यांनाही सन्मानित करण्यात आले. या वेळी पालक खेळाडू, फाउंडेशनचे सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांबरोबर पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विजेत्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)