शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाहतूक कोंडीतून आयटीयन्सना मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:15 IST

आयटीनगरीत एकेरी चक्राकार वाहतूक बदलाचा चांगलाच परिणाम जाणवला आहे.

हिंजवडी : येथील आयटीनगरीत एकेरी चक्राकार वाहतूक बदलाचा चांगलाच परिणाम जाणवला आहे. सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे त्रस्त असलेल्या आयटी अभियंत्यांना वाहतूक विभागाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे मोकळा श्वास घेणे शक्य झाले आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत आयटी अभियंत्यांनी समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानले.पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी हिंजवडी आयटी असोशिएशनच्या (एचआयए) पदाधिकाºयांसोबत मंगळवारी आढावा बैठक घेतली. अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त नम्रता पाटील, विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, हिंजवडी विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे, वाहतूक निरीक्षक किशोर म्हसवडे, एचआयएचे पदाधिकारी कर्नल भोगल, योगेश जोशी, टीसीएचे सचिन रत्नपारखी उपस्थित होते. आयुक्त पद्मनाभन यांनी ३ सप्टेंबरपासून हिंजवडी, वाकड परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी पाहणी केली. त्यानंतर अभियंते व स्थानिकांशी चर्चा करून एकेरी वाहतुकीचा निर्णय घेतला. यामुळे काय बदल घडून आला, हे जाणून घेण्याचा आयुक्तांनी प्रयत्न केला. स्थानिक ग्रामस्थ आणि आयटी अभियंत्यांच्या वाहतूक बदलाबाबत आणखी काही सूचना आहेत का, याचीही विचारणा बैठकीत केली.>आठ दिवसांत जाणवला फरकहिंजवडीत ३ सप्टेंबरपासून शिवाजी चौक ते विप्रो सर्कल, फेज १, फेज २ या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर चक्राकार एकेरी वाहतूक सुरू केली आहे. जागोजागी असलेले दुभाजक पंक्चर बंद केले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. नागरिकांच्या सूचनांची दखल घेऊन हा तात्पुरता बदल करण्यात आला. हिंजवडीतून वाकडकडे आणि वाकडहून हिंजवडीकडे जाणाºया मार्गावर होणाºया वाहतूककोंडीत आठ दिवसांत बराच फरक जाणवला आहे, अशा प्रतिक्रिया अभियंत्यांनी व्यक्त केल्या. अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे म्हणाले, शहरात हिंजवडी हे देशातील महत्त्वाचे उद्योग केंद्र आहे. या आयटी हबमुळे पुण्याचे नाव जगाच्या पटलावर झळकत आहे. आयुक्तांनी या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे. बदल व्हावा ही फक्त पोलिसांची इच्छा असून उपयोग नाही, नागरिकांचे सहकार्य हवे आहे.’’