शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

वाहतूक कोंडीतून आयटीयन्सना मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:15 IST

आयटीनगरीत एकेरी चक्राकार वाहतूक बदलाचा चांगलाच परिणाम जाणवला आहे.

हिंजवडी : येथील आयटीनगरीत एकेरी चक्राकार वाहतूक बदलाचा चांगलाच परिणाम जाणवला आहे. सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे त्रस्त असलेल्या आयटी अभियंत्यांना वाहतूक विभागाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे मोकळा श्वास घेणे शक्य झाले आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत आयटी अभियंत्यांनी समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानले.पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी हिंजवडी आयटी असोशिएशनच्या (एचआयए) पदाधिकाºयांसोबत मंगळवारी आढावा बैठक घेतली. अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त नम्रता पाटील, विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, हिंजवडी विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे, वाहतूक निरीक्षक किशोर म्हसवडे, एचआयएचे पदाधिकारी कर्नल भोगल, योगेश जोशी, टीसीएचे सचिन रत्नपारखी उपस्थित होते. आयुक्त पद्मनाभन यांनी ३ सप्टेंबरपासून हिंजवडी, वाकड परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी पाहणी केली. त्यानंतर अभियंते व स्थानिकांशी चर्चा करून एकेरी वाहतुकीचा निर्णय घेतला. यामुळे काय बदल घडून आला, हे जाणून घेण्याचा आयुक्तांनी प्रयत्न केला. स्थानिक ग्रामस्थ आणि आयटी अभियंत्यांच्या वाहतूक बदलाबाबत आणखी काही सूचना आहेत का, याचीही विचारणा बैठकीत केली.>आठ दिवसांत जाणवला फरकहिंजवडीत ३ सप्टेंबरपासून शिवाजी चौक ते विप्रो सर्कल, फेज १, फेज २ या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर चक्राकार एकेरी वाहतूक सुरू केली आहे. जागोजागी असलेले दुभाजक पंक्चर बंद केले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. नागरिकांच्या सूचनांची दखल घेऊन हा तात्पुरता बदल करण्यात आला. हिंजवडीतून वाकडकडे आणि वाकडहून हिंजवडीकडे जाणाºया मार्गावर होणाºया वाहतूककोंडीत आठ दिवसांत बराच फरक जाणवला आहे, अशा प्रतिक्रिया अभियंत्यांनी व्यक्त केल्या. अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे म्हणाले, शहरात हिंजवडी हे देशातील महत्त्वाचे उद्योग केंद्र आहे. या आयटी हबमुळे पुण्याचे नाव जगाच्या पटलावर झळकत आहे. आयुक्तांनी या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे. बदल व्हावा ही फक्त पोलिसांची इच्छा असून उपयोग नाही, नागरिकांचे सहकार्य हवे आहे.’’