शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरी भारावली

By admin | Updated: August 10, 2015 02:52 IST

साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडला होणार की बारामतीला, या चर्चेवर रविवारी सायंकाळी पडदा पडला. सांस्कृतिकनगरीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड

पिंपरी : साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडला होणार की बारामतीला, या चर्चेवर रविवारी सायंकाळी पडदा पडला. सांस्कृतिकनगरीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराला ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळाला आहे. शारदेचा उत्सव पिंपरी-चिंचवडमध्ये, अशी घोषणा होताच साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. साहित्य महामंडळाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. न भूतो न भविष्यती असे संमेलन करू, असा आत्मविश्वास शहरातील विविध संस्थांचे प्रमुख आणि साहित्यविश्वातील मान्यवरांनी व्यक्त केला.गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमधील सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था साहित्य संमेलन घेण्यास इच्छुक होत्या. मात्र, साहित्य महामंडळापुढे योग्य भूमिका मांडली न गेल्याने दोन वर्षांपूर्वी हे संमेलन आचार्य अत्रेंच्या भूमीत गेले होते. त्यानंतर गेल्या वर्षी संत नामदेवमहाराजांच्या भूमीत घुमान येथे संमेलन झाले. त्यानंतर आगामी ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार, याबाबत उत्सुकता होती. राज्यभरातून सातारा, उस्मानाबाद, नर्सी (नामदेव), जि. हिंगोली, श्रीगोंदा, उस्मानाबाद, पिंपरी-चिंचवड अशी ११ निमंत्रणे आली होती. त्यात बारामती की पिंपरी-चिंचवड ही दोन शहरे प्रबळ इच्छुक असल्याचे दिसून आले. त्यामुळे बारामती की पिंपरी, अशी चर्चा रविवारी दिवसभर होती. याबाबतचा निर्णय सायंकाळच्या बैठकीत होणार असल्याने कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याबाबत उत्सुकता होती. संमेलनासाठी केवळ आर्थिक निकषपुणे : ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्यातून १२ निमंत्रणे आली, तरी केवळ तीन संस्थास्थळांची महामंडळाने पाहणी केली. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी मोजक्याच संमेलन स्थळांना भेटी देऊन इतर संस्थांवर अन्याय केल्याची भावना उमटू लागली असून, महामंडळाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजीचा सूर आहे. संमेलनाच्या आयोजनासंदर्भात मराठवाडा साहित्य परिषद, उस्मानाबाद, एज्युकेशन सोसायटी, नायगाव बाजार, नांदेड, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहुपुरी, सातारा, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, चिंचवड, कर्नाटक राज्य मराठी परिषद, भालकी, गुलबर्गा, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, आकुर्डी, चिंचवड, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पिंपरी, महाराष्ट्र साहित्य परिषद, बारामती, मराठवाडा साहित्य परिषद, हिंगोली, आग्री युथ फोरम, डोंबिवली, अक्षरमानव संघटना, श्रीगोंदा, अहमदनगर, मराठी वाङ्मय मंडळ, अंमळनेर या ठिकाणांचा समावेश होता. परंतु महामंडळाकडून या १२ ठिकाणांमधील केवळ श्रीगोंदा, डोंबिवली आणि पिंपरी येथील डी. वाय. पाटील या तीन ठिकाणांचीच पाहणी झाली करण्यात आली. त्यावरुनच संमेलनाचे ठिकाण निश्चित करण्यात आले. अशा प्रकारे इतर ठिकाणांची पाहणी न करता केवळ तीन स्थळांची पाहणी करुन संमेलन स्थळ निश्चित करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा साहित्य वर्तुळातून उपस्थित करण्यात आला आहे.दर वर्षी अशा प्रकारे ठरावीक ठिकाणांची पाहणी करुन एखादे ठिकाण निश्चित करण्यात येते. यामध्ये कोणते निकष लक्षात घेतले जातात, याविषयी शंका उपस्थित होताना दिसत आहे. या वेळी इतर ठिकाणे नाकारण्यामागे वेगवेगळी कारणे असून, ती सांगणे शक्य नसल्याचे अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकार परिदेत सांगितले. केवळ आर्थिक सक्षमता हेच संमेलन स्थळ ठरविताना केंद्रस्थानी आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शरद पवार अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याने बारामतीमध्ये साहित्य संमेलन व्हावे, अशी बारामतीकरांची इच्छा होती. परंतु बारामतीला नुकतेच युवा साहित्य संमेलन झाल्याने पर्याय नाकारण्यात आल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. डी. वाय. पाटील संस्थेकडे संमेलनाचा मान गेल्याने आर्थिक गणिते सोपी होण्याची शक्यता असल्याचे चिन्ह साहित्य वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)