शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

डिजिटल युगातही पालिकेकडून दवंडी, जनजागृतीवर वाढीव खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 04:33 IST

महापालिकेचे कामकाज हायटेक झाले असले तरी जनजागृतीसाठी महापालिका पारंपरिक पद्धतीचा अवलंब करीत आहे. रिक्षा, अथवा टेम्पोवर ध्वनिक्षेपक लावून नागरिकांना प्लॅस्टिक बंदीचे महत्त्व पटवून देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने दवंडी पिटण्याची महापालिकेची ही जनजागृती खर्चिक ठरू लागली आहे.

पिंपरी : महापालिकेचे कामकाज हायटेक झाले असले तरी जनजागृतीसाठी महापालिका पारंपरिक पद्धतीचा अवलंब करीत आहे. रिक्षा, अथवा टेम्पोवर ध्वनिक्षेपक लावून नागरिकांना प्लॅस्टिक बंदीचे महत्त्व पटवून देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने दवंडी पिटण्याची महापालिकेची ही जनजागृती खर्चिक ठरू लागली आहे.शासनाच्या विविध योजनांची जनजागृती सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. तसेच मल्टीप्लेक्स चित्रपटपटगृहांमध्ये मध्यांतरावेळी अथवा चित्रपट सुरू होण्यापूर्वी अशा जाहिराती जनहितार्थ प्रसारित केल्या जातात. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मात्र रिक्षा अथवा टेम्पोचा अधिकाधिक वापर केला जात आहे. चार महिन्यांपूर्वी महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानासंबंधी जनजागृती करण्यात येत होती. मार्च अखेर मिळकतकर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहरात काही भागात रिक्षा फिरविण्यात आल्या. सद्या प्लॅस्टिक बंदी संदर्भात जनजागृती करण्यासाठी महापालिकेतर्फे रिक्षा आणि टेम्पो फिरविण्यात येत आहेत. अशा पद्धतीने रिक्षाला ध्वनिक्षेपक लावून केलेल्या जनजागृतीसाठी कोट्यवधींचा खर्च केला आहे.याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी मनोज लोणकर म्हणाले, ‘‘प्लॅस्टिक बंदीचा निर्णय शासनाने अचानक जाहीर केला़ त्यामुळे जनजागृतीसाठी लागणाऱ्या वाहनांकरिता निविदा मागविणे शक्य नाही. नेहमीच्या कचरा उचलणाºया वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती केली जात आहे. कचरा उचलण्याबरोबर जनजागृतीचे काम त्यांच्यावर सोपविले आहे.महापालिकेची संकेतस्थळ कोरडेमहापालिकेच्या संकेतस्थळास नागरिक भेट देत असतात. आॅनलाइन कर भरणाºयांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संकेत स्थळाचा जनजागृतीसाठी चांगला उपयोग होऊ शकतो. महापालिकेचे अधिकारी, तसेच जनसंपर्क विभाग यांच्यामार्फत असे कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. रिक्षा, टेम्पोच्या माध्यमातूनच जनजागृती करण्यावर अधिक भर दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा पद्धतीच्या जनजागृतीवर यापूर्वी कोट्यवधींचा खर्च झालेला आहे़ प्रत्यक्षात संपूर्ण जनजागृती होईल, अशी सक्षम यंत्रणा राबवली जात नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड