शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

डिजिटल युगातही पालिकेकडून दवंडी, जनजागृतीवर वाढीव खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 04:33 IST

महापालिकेचे कामकाज हायटेक झाले असले तरी जनजागृतीसाठी महापालिका पारंपरिक पद्धतीचा अवलंब करीत आहे. रिक्षा, अथवा टेम्पोवर ध्वनिक्षेपक लावून नागरिकांना प्लॅस्टिक बंदीचे महत्त्व पटवून देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने दवंडी पिटण्याची महापालिकेची ही जनजागृती खर्चिक ठरू लागली आहे.

पिंपरी : महापालिकेचे कामकाज हायटेक झाले असले तरी जनजागृतीसाठी महापालिका पारंपरिक पद्धतीचा अवलंब करीत आहे. रिक्षा, अथवा टेम्पोवर ध्वनिक्षेपक लावून नागरिकांना प्लॅस्टिक बंदीचे महत्त्व पटवून देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने दवंडी पिटण्याची महापालिकेची ही जनजागृती खर्चिक ठरू लागली आहे.शासनाच्या विविध योजनांची जनजागृती सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. तसेच मल्टीप्लेक्स चित्रपटपटगृहांमध्ये मध्यांतरावेळी अथवा चित्रपट सुरू होण्यापूर्वी अशा जाहिराती जनहितार्थ प्रसारित केल्या जातात. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मात्र रिक्षा अथवा टेम्पोचा अधिकाधिक वापर केला जात आहे. चार महिन्यांपूर्वी महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानासंबंधी जनजागृती करण्यात येत होती. मार्च अखेर मिळकतकर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहरात काही भागात रिक्षा फिरविण्यात आल्या. सद्या प्लॅस्टिक बंदी संदर्भात जनजागृती करण्यासाठी महापालिकेतर्फे रिक्षा आणि टेम्पो फिरविण्यात येत आहेत. अशा पद्धतीने रिक्षाला ध्वनिक्षेपक लावून केलेल्या जनजागृतीसाठी कोट्यवधींचा खर्च केला आहे.याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी मनोज लोणकर म्हणाले, ‘‘प्लॅस्टिक बंदीचा निर्णय शासनाने अचानक जाहीर केला़ त्यामुळे जनजागृतीसाठी लागणाऱ्या वाहनांकरिता निविदा मागविणे शक्य नाही. नेहमीच्या कचरा उचलणाºया वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती केली जात आहे. कचरा उचलण्याबरोबर जनजागृतीचे काम त्यांच्यावर सोपविले आहे.महापालिकेची संकेतस्थळ कोरडेमहापालिकेच्या संकेतस्थळास नागरिक भेट देत असतात. आॅनलाइन कर भरणाºयांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संकेत स्थळाचा जनजागृतीसाठी चांगला उपयोग होऊ शकतो. महापालिकेचे अधिकारी, तसेच जनसंपर्क विभाग यांच्यामार्फत असे कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. रिक्षा, टेम्पोच्या माध्यमातूनच जनजागृती करण्यावर अधिक भर दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा पद्धतीच्या जनजागृतीवर यापूर्वी कोट्यवधींचा खर्च झालेला आहे़ प्रत्यक्षात संपूर्ण जनजागृती होईल, अशी सक्षम यंत्रणा राबवली जात नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड