शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यात जिद्द असणे महत्त्वाचे : विद्यासागर

By admin | Updated: January 23, 2017 02:53 IST

तंत्रज्ञानामुळे आज जग पुढे चालले आहे. शहरी भागाची मक्तेदारी मोडीत काढून ग्रामीण भागातील विद्यार्थी आज सर्व क्षेत्रांत मोठे

रावेत : तंत्रज्ञानामुळे आज जग पुढे चालले आहे. शहरी भागाची मक्तेदारी मोडीत काढून ग्रामीण भागातील विद्यार्थी आज सर्व क्षेत्रांत मोठे यश मिळवत आहेत. माणसाच्या आयुष्यात जिद्द असणे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील सोसायटीचे, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान व डॉ. डी. वाय. पाटील संगणक महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम ते बोलत होते. ते म्हणाले, कोणताही विषय आपणास समजला असे तेव्हाच समजावे जेव्हा तो आपण इतरांना समजावून सांगू माणसाच्या आयुष्यात प्रज्ञा, शील, करुणा, स्वातंत्र्य, समता, बंधूता या मूल्यांची जपणूक होणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञान विज्ञान व क्षमता या प्रत्येक पायरीवर आपल्या देशाची तरुणाई विश्वासाने पाऊल टाकत आहे. प्रत्येकाने आयुष्यात माझ्यासाठी नव्हे, तर इतरांसाठी या विचाराने चालल्यास संपूर्ण जग एका कुटुंबासारखे होईल असेही त्यांनी नमूद केले.या वेळी डॉ. रवींद्र जायभाये, प्राचार्य डॉ. मोहन वामन, प्राचार्य डॉ. रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. स्नेहल अग्निहोत्री हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख प्रा. मुकेश तिवारी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. विजय गाडे, प्रा. गणेश फुंदे, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक किशोर पाटील, सहायक कुलसचिव ज्ञानेश्वर सावंत, प्रा.राजेश भगत व इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद बोडखे, प्रा. स्वप्ना वाडकर यांनी केले, तर आभार प्रा. मुकेश तिवारी यांनी मानले. (वार्ताहर)