शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाची लागण

By admin | Updated: May 11, 2017 04:30 IST

पवना नदीचे निर्मळ स्वरूप उर्से, बेबडओहोळ औद्योगिक परिसर आणि सोमाटणे, उर्से, परंदवडी, धामणे, बेबडओहोळसह वाढती

लोकमत न्यूज नेटवर्कउर्से : पवना नदीचे निर्मळ स्वरूप उर्से, बेबडओहोळ औद्योगिक परिसर आणि सोमाटणे, उर्से, परंदवडी, धामणे, बेबडओहोळसह वाढती वस्ती असलेल्या भागात बदलत आहे. गेल्या पाच वर्षांत पवना नदीलगत गावातील लोकसंख्या वाढत असल्याने गावातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीला येऊन मिळत आहे. त्यामुळे आज पवना नदी संवर्धनाची गरज वाढू लागली आहे. सडवली ते शिरगाव दरम्यान नदीचा प्रवास उर्से औद्योगिक परिसर, सोमाटणे येथील नागरी भागातून जातो. त्यामुळे नदीप्रदूषण हळूहळू वाढताना दिसते. सडवली गावाची लोकसंख्या सातशेच्या जवळपास आहे. तेथे ७०० एकर शेतीचे जमिनीचे क्षेत्र असून, बागायत क्षेत्र १५० एकरापर्यंत आहे. उर्वरित ५५० एकरात प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. नदी, विहिरीवरून गावात पाणीपुरवठा केला जातो. सांडपाणी नदीला जात नसले, तरी गावातील ४०० ते ५०० जनावरे नदीवरच धुतली जातात, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. फिल्टर प्लॅण्ट जरी नसला, तरी नुकतीच गावात पाणीपुरवठा योजना नळाद्वारे केली आहे. पुढे नदीकाठालगतच्या आढे गावाची लोकसंख्या ८००च्या जवळपास आहे. गावात ५०० जनावरे असून, ती नदीवर धुतली जातात. गावातील सांडपाणी नदीला न सोडता शेतात सोडले जाते. जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नदीप्रवाह प्रदूषित होत नाही. कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आढे गावातील नदीवर बांधले पाहिजेत, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली. उर्से हे पवनमावळातील जास्त लोकसंख्या असलेले व झपाट्याने वाढणारे गाव आहे. औद्योगिक परिसर असल्याने गावात महिंद्रा हिनोदय, फिनोलेक्स केबल, जयहिंद व इतर मोठ्या कंपन्या आहेत. मोठे वर्कशॉप आहेत. गावातील लोकसंख्या आठ हजारच्या आसपास असल्याने ओढ्यामार्गे गावातील सांडपाणी, कंपनीचे पाणी मोठ्या प्रमाणावर नदीला मिळते. त्यावर कसलीही प्रक्रिया केली जात नाही. येथूनच पवनेच्या प्रदूषणाला सुरुवात होते. या पाण्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. बेबडओहळ नदीकाठी असल्याने गावातील सांडपाणी, गटारीचे पाणी थेट नदीत मिसळते. त्यामुळे उर्से व बेबडओहोळ गावाजवळ प्रदूषण वाढलेले दिसते. पाण्याचा रंगही बदललेला जाणवतो. पुढे या पाण्याचा फटका बसतो धामणे गावाला. धामणेजवळील परंदवडी गावाची वाढणारी वस्तीही नदी प्रदूषित करण्यास हातभार लावते. गेल्या तीन वर्षांत गावात वाढलेली बांधकामे, शैक्षणिक संस्था यामुळे लोकसंख्या तीन हजारांवर झाली आहे. सांडपाणी, गटारींचे पाणी ओढ्यामार्गे नदीला मिळते. गावाला उत्पन्न कमी असल्याने फिल्टरेशनसाठी योजना करता येत नाही. परंदवडीसह उर्से, बेबडओहोळ गावांनी प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना न केल्याने हा प्रश्न गंभीर झाला आहे. सडवली, ओझर्डे, आढे, उर्से, बेबडओहोळ , धामणे, परंदवडी येथे सात किमी अंतरावर सर्वाधिक प्रदूषण आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. नदीवर जलपर्णी नाही. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.