शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाची लागण

By admin | Updated: May 11, 2017 04:30 IST

पवना नदीचे निर्मळ स्वरूप उर्से, बेबडओहोळ औद्योगिक परिसर आणि सोमाटणे, उर्से, परंदवडी, धामणे, बेबडओहोळसह वाढती

लोकमत न्यूज नेटवर्कउर्से : पवना नदीचे निर्मळ स्वरूप उर्से, बेबडओहोळ औद्योगिक परिसर आणि सोमाटणे, उर्से, परंदवडी, धामणे, बेबडओहोळसह वाढती वस्ती असलेल्या भागात बदलत आहे. गेल्या पाच वर्षांत पवना नदीलगत गावातील लोकसंख्या वाढत असल्याने गावातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीला येऊन मिळत आहे. त्यामुळे आज पवना नदी संवर्धनाची गरज वाढू लागली आहे. सडवली ते शिरगाव दरम्यान नदीचा प्रवास उर्से औद्योगिक परिसर, सोमाटणे येथील नागरी भागातून जातो. त्यामुळे नदीप्रदूषण हळूहळू वाढताना दिसते. सडवली गावाची लोकसंख्या सातशेच्या जवळपास आहे. तेथे ७०० एकर शेतीचे जमिनीचे क्षेत्र असून, बागायत क्षेत्र १५० एकरापर्यंत आहे. उर्वरित ५५० एकरात प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. नदी, विहिरीवरून गावात पाणीपुरवठा केला जातो. सांडपाणी नदीला जात नसले, तरी गावातील ४०० ते ५०० जनावरे नदीवरच धुतली जातात, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. फिल्टर प्लॅण्ट जरी नसला, तरी नुकतीच गावात पाणीपुरवठा योजना नळाद्वारे केली आहे. पुढे नदीकाठालगतच्या आढे गावाची लोकसंख्या ८००च्या जवळपास आहे. गावात ५०० जनावरे असून, ती नदीवर धुतली जातात. गावातील सांडपाणी नदीला न सोडता शेतात सोडले जाते. जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नदीप्रवाह प्रदूषित होत नाही. कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आढे गावातील नदीवर बांधले पाहिजेत, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली. उर्से हे पवनमावळातील जास्त लोकसंख्या असलेले व झपाट्याने वाढणारे गाव आहे. औद्योगिक परिसर असल्याने गावात महिंद्रा हिनोदय, फिनोलेक्स केबल, जयहिंद व इतर मोठ्या कंपन्या आहेत. मोठे वर्कशॉप आहेत. गावातील लोकसंख्या आठ हजारच्या आसपास असल्याने ओढ्यामार्गे गावातील सांडपाणी, कंपनीचे पाणी मोठ्या प्रमाणावर नदीला मिळते. त्यावर कसलीही प्रक्रिया केली जात नाही. येथूनच पवनेच्या प्रदूषणाला सुरुवात होते. या पाण्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. बेबडओहळ नदीकाठी असल्याने गावातील सांडपाणी, गटारीचे पाणी थेट नदीत मिसळते. त्यामुळे उर्से व बेबडओहोळ गावाजवळ प्रदूषण वाढलेले दिसते. पाण्याचा रंगही बदललेला जाणवतो. पुढे या पाण्याचा फटका बसतो धामणे गावाला. धामणेजवळील परंदवडी गावाची वाढणारी वस्तीही नदी प्रदूषित करण्यास हातभार लावते. गेल्या तीन वर्षांत गावात वाढलेली बांधकामे, शैक्षणिक संस्था यामुळे लोकसंख्या तीन हजारांवर झाली आहे. सांडपाणी, गटारींचे पाणी ओढ्यामार्गे नदीला मिळते. गावाला उत्पन्न कमी असल्याने फिल्टरेशनसाठी योजना करता येत नाही. परंदवडीसह उर्से, बेबडओहोळ गावांनी प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना न केल्याने हा प्रश्न गंभीर झाला आहे. सडवली, ओझर्डे, आढे, उर्से, बेबडओहोळ , धामणे, परंदवडी येथे सात किमी अंतरावर सर्वाधिक प्रदूषण आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. नदीवर जलपर्णी नाही. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.