शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पाणी न मिळाल्यास कालवा फोडणार

By admin | Updated: August 18, 2014 23:21 IST

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्टय़ात पावसाने ओढ दिली आहे. तसेच, 42, 43 व 46 वितरिकेस सुमारे तीन महिन्यांपासून पाणी सोडलेले नाही.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्टय़ात पावसाने ओढ दिली आहे. तसेच, 42, 43 व 46 वितरिकेस सुमारे तीन महिन्यांपासून पाणी सोडलेले नाही. त्यामुळे परिसरातील शेतामधील पिके धोक्यात आली आहेत. पेरणी व उसाच्या लागवडीही खोळंबल्या आहेत. त्यामुळे कालवा फोडून पाणी घेण्याचा इशारा शेतक:यांनी दिला आहे.
अक्षरश शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्याच्याच डोळ्यांतून पाऊस पडण्याची वेळ आल्याने या पट्टय़ातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या संतप्त शेतक:यांनी पाटबंधारे खात्याकडे वारंवार मागणी करूनही ‘टेल टू हेड्’या न्यायाने पाणी सोडण्याचे आश्वासन त्यांना दिले जाते. त्याप्रमाणो ‘टेल हेड’ संभाळीतमध्ये असणा:या 42, 43 व 46 या वितरिकेस पाणी सोडले जात नाही. त्यामुळे या शेतक:यांची शेतपिके धोक्यात आली आहेत. शेतकरीवर्ग संतप्त झाला आहे.  
येथील शेतकरी एक आठवडय़ाची मुदत देत मंगळवार्पयत पाणी सोडण्याची वाट पाहणार आहे. पाणी न सोडल्यास या वितरिकेचे सर्व लाभार्थी शेतकरी ‘नीरा डावा कालवा’ फोडून पाणी घेणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिल्याची माहिती गणोश फडतरे यांनी दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, 42 ते 46 वितरिकेवरील शेतकरी बारामाही पाण्याचे लाभार्थी असताना मे महिन्यात यांना पाणी सोडले होते. पण त्या वेळीही काही शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले होते. नीरा डाव्या कालव्याला गेले. 15 दिवसांपासून पाणी आले आहे. मात्र, येथील वितरिकेस मागणी करून देखील पाणी सोडले नाही, त्यामुळे उभी पिके जळून चालली आहेत.
निवेदनाच्या प्रती सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या सर्व कार्यालयांस, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना दिल्या आहेत. या निवेदनावर गणोश फडतरे, वसंत पवार, विठ्ठल मुळीक, सर्जेराव काळे, विजय कळसाईत, केशव जामदार, अण्णा सूर्यवंशी, चंद्रकांत निंबाळकर, सूर्यकांत खरात, अॅड. हेमंत नरूटे, अनिल पवार, बाबासाहेब वाघमोडे, विजय निंबाळकर यांच्यासह 42, 43 व 46 वरील लाभार्थी शेतक:यांच्या स्वाक्ष:या आहेत. (वार्ताहर)
 
शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठीही कमालीची प्रतीक्षा 
वालचंदनगर रणगाव रत्नपुरी जंक्शन नऊदारे शिरसटवाडी या भागातील शेतपिके धोक्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठीही कमालीची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकंदरीत पाटपाण्याचा प्रश्न खूपच गंभीर झाला आहे. पाटबंधारे विभागास बारामाही पाणीपट्टी भरणा:या शेतक:यांवर हा घोर अन्याय झाल्याने तो संतप्त झाला आहे. तरी या 42, 43 व 46 वितरिकेस मंगळवार्पयत 19 ऑगस्ट 2क्14 र्पयत पाणी सोडावे अन्यथा नीरा डावा कालवा फोडून पाणी घेणार असल्याचा इशारा पाटबंधारे विभागास दिला आहे.