शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मन स्थिर ठेवल्यास औषधांची गरज नाही - विलास जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:15 IST

८० टक्के समस्या मनातून येतात, तर मानसिक विचारातून आजार उत्पन्न होतात, त्यासाठी आपले मन स्थिर ठेवावे म्हणजे तुम्हाला औषधांची गरज लागणार नाही.

हनुमंत देवकर चाकण : “८० टक्के समस्या मनातून येतात, तर मानसिक विचारातून आजार उत्पन्न होतात, त्यासाठी आपले मन स्थिर ठेवावे म्हणजे तुम्हाला औषधांची गरज लागणार नाही. ध्यानामुळे ताण, चिंता, नैराश्य आणि वेदना कमी करण्यास मदत होते”, असे प्रतिपादन व्याख्याते विलास जैन यांनी केले. चाकण रोटरी क्लब आयोजित शेठ धनराजजी सांकला स्मृती व्याख्यानमालेत “ध्यान साधना, सक्षम जीवनशैली का राज” या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले,“आपल्या मुलांची इतर मुलांशी कधीही तुलना करू नका, म्हणजे तुमचा ताण कमी होईल. ध्यान हा आयुष्य जगण्याचा मार्ग आहे, ध्यान हे आपल्या रोजच्या जीवनशैलीचा एक भाग झाला पाहिजे, म्हणजे तो जीवनाचा एक मार्ग होईल, त्यामुळे मनाची स्थिरता निर्माण होईल. मन स्थिर नसेल तर चिडचिड होते व भावनिक स्थिरता नसेल तर ८० टक्के समस्या तेथून सुरु होतात, म्हणून आपले ध्यान, मन स्थिर ठेवावे.”यावेळी प्रमुख पाहुणे व व्याख्याते विलास जैन,रोटरी क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सातव, सचिव अतुल वाव्हळ, व्याख्यानमाला समितीचे चेअरमन सुहास गोरे, माजी अध्यक्ष नितीन पाटील, मोतीलाल सांकला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यनमालेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्योजक नितीन पाटील, अध्यक्ष माऊली सातव व नगरसेवक प्रकाश भुजबळ यांच्या हस्ते चाकण येथील दिव्यांग मुलगा कल्पेश भुजबळ यास तीनचाकी सायकल प्रदान करण्यात आली.यावेळी भगवान घोडेकर, विनय भुजबळ, दीपक करपे, महेश कांडगे, डॉ. शिवाजी एंडाईत, रमेश बोथरा, संभाजी सोनवणे, सुनील शहा, प्रवीण मुथा, प्रसाद हुलावळे, सुशीला सातव आदी मान्यवर उपस्थित होते.