शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
6
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
7
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
8
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
9
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
10
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
11
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
12
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
13
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
14
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
15
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
16
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
18
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
19
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
20
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल

मन स्थिर ठेवल्यास औषधांची गरज नाही - विलास जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:15 IST

८० टक्के समस्या मनातून येतात, तर मानसिक विचारातून आजार उत्पन्न होतात, त्यासाठी आपले मन स्थिर ठेवावे म्हणजे तुम्हाला औषधांची गरज लागणार नाही.

हनुमंत देवकर चाकण : “८० टक्के समस्या मनातून येतात, तर मानसिक विचारातून आजार उत्पन्न होतात, त्यासाठी आपले मन स्थिर ठेवावे म्हणजे तुम्हाला औषधांची गरज लागणार नाही. ध्यानामुळे ताण, चिंता, नैराश्य आणि वेदना कमी करण्यास मदत होते”, असे प्रतिपादन व्याख्याते विलास जैन यांनी केले. चाकण रोटरी क्लब आयोजित शेठ धनराजजी सांकला स्मृती व्याख्यानमालेत “ध्यान साधना, सक्षम जीवनशैली का राज” या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले,“आपल्या मुलांची इतर मुलांशी कधीही तुलना करू नका, म्हणजे तुमचा ताण कमी होईल. ध्यान हा आयुष्य जगण्याचा मार्ग आहे, ध्यान हे आपल्या रोजच्या जीवनशैलीचा एक भाग झाला पाहिजे, म्हणजे तो जीवनाचा एक मार्ग होईल, त्यामुळे मनाची स्थिरता निर्माण होईल. मन स्थिर नसेल तर चिडचिड होते व भावनिक स्थिरता नसेल तर ८० टक्के समस्या तेथून सुरु होतात, म्हणून आपले ध्यान, मन स्थिर ठेवावे.”यावेळी प्रमुख पाहुणे व व्याख्याते विलास जैन,रोटरी क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सातव, सचिव अतुल वाव्हळ, व्याख्यानमाला समितीचे चेअरमन सुहास गोरे, माजी अध्यक्ष नितीन पाटील, मोतीलाल सांकला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यनमालेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्योजक नितीन पाटील, अध्यक्ष माऊली सातव व नगरसेवक प्रकाश भुजबळ यांच्या हस्ते चाकण येथील दिव्यांग मुलगा कल्पेश भुजबळ यास तीनचाकी सायकल प्रदान करण्यात आली.यावेळी भगवान घोडेकर, विनय भुजबळ, दीपक करपे, महेश कांडगे, डॉ. शिवाजी एंडाईत, रमेश बोथरा, संभाजी सोनवणे, सुनील शहा, प्रवीण मुथा, प्रसाद हुलावळे, सुशीला सातव आदी मान्यवर उपस्थित होते.