शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती बळींची प्रतीक्षा?

By admin | Updated: July 20, 2015 04:06 IST

पावसाळ्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. रविवारी दुपारी दोन मोटारींवर दरड कोसळून दोन जण

विशाल विकारी , लोणावळा पावसाळ्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. रविवारी दुपारी दोन मोटारींवर दरड कोसळून दोन जण ठार झाले आहेत. या घटनेनंतर महामार्ग सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महामार्गाची देखभाल करणारी खासगी कंपनी, रस्ते विकास महामंडळ आणि राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाच्या असंवेदनशून्य कारभारामुळे आणखी किती निरपराध लोकाचे जीव जाणार, असा खरा प्रश्न आहे. जाळीतून दगड आले खाली आडोशी बोगद्याकडे जाणाऱ्या मार्गावरील डोंगराला काही भागात दगड जाळीत पडले आहेत, तर काही ठिकाणांना अद्याप जाळ्या लावलेल्या नाहीत़ रविवारी दुपारी जिथे दरड कोसळली, तिथे धोकादायक ठिकाणास सुरक्षा जाळी होती. मात्र, ही जाळी तोडून दरड पडली. जाळ्या कुचकामी झाल्या आहेत. या संदर्भात ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे पुन्हा दुर्घटना घडली.तब्बल ३३ तास तीनही लेन बंद २२ जूनला सकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने द्रुतगती महामार्गाच्या मुंबईकडे जाणाऱ्या तीनही लेन तब्बल ३३ तास बंद होत्या़ पाऊस सुरू झाला आहे. पुन्हा या भागात जोरदार पावसात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे़जाळ्या धोकादायक खंडाळा ते खोपोली दरम्यानच्या डोंगर भागाला सुरक्षा रोप लावले आहेत. मात्र ते आता मोठ्या प्रमाणात गंजले आहेत. काही ठिकाणी डोंगराला लावलेले बोल्ट सैल झाले आहेत़, तर अनेक दगड या रोपमध्ये आले आहेत. खंडाळा बोगद्याच्या तोंडाजवळ ज्या ठिकाणी २२ जूनला दरड कोसळली होती, तिच्याच शेजारी पुन्हा काही दगड खाली आले आहेत़ सुरक्षा कठडे आणि जाळ्या धोकादायक आहेत. शेकडोंनी गमावला जीवमहामार्गावर कामशेतजवळील काही भाग व खंडाळा ते खोपोली दरम्यानचा संपूर्ण परिसर हा डोंगराळ भाग आहे़ मोठे डोंगर फ ोडून महामार्गाची निर्मिती चौदा वर्षांपूर्वी केली. २००५, २००८, २०११ व २०१३ मध्ये घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. त्यात शेकडो निरपराधांचे जीव गेले आहेत. त्याशिवाय वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागला आहे.