शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

By admin | Updated: May 15, 2016 00:32 IST

हॉटेलांमध्ये टेबलावर भरलेले पाण्याचे जग ठेवण्यापेक्षा बाटल्या ठेवल्यास आवश्यक तेवढेच पाणी ग्राहक घेतील. साध्या नळांऐवजी पुश कॉक लावून पाणीबचत करता येईल.

पिंपरी : हॉटेलांमध्ये टेबलावर भरलेले पाण्याचे जग ठेवण्यापेक्षा बाटल्या ठेवल्यास आवश्यक तेवढेच पाणी ग्राहक घेतील. साध्या नळांऐवजी पुश कॉक लावून पाणीबचत करता येईल. मोठ्या हॉटेलांमध्ये वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करून पाण्याच्या पुनर्वापरास प्राधान्य द्यावे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे. लोकमतच्या जलमित्र अभियान या स्तुत्य उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार हॉटेल असोसिएशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत काटकसरीने पाणी वापरणे महत्त्वाचे असून, पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘लोकमत’ने जलमित्र अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा भाग म्हणून लोकमत पिंपरी-चिंचवड कार्यालयात हॉटेल व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा घेण्यात आली.या परिचर्चेत पिंपरी-चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, सेक्रेटरी गणेश कुदळे, उपाध्यक्ष सुमित बाबर या पदाधिकाऱ्यांसह शंकर चक्रबर्ती, अब्दुल खान, वैभव चाबुकस्वार आदी उपस्थित होते. या वेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे म्हणाले, गार्डन रेस्टॉरंटमध्ये महापालिकेचे पिण्याचे पाणी वापरण्याऐवजी बोरवेलचे पाणी वापरास प्राधान्य देता येईल. जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर होईल. हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेचे सुमारे एक हजार सदस्य आहेत. त्यांना पाणी बचत अभियानाबद्दल सोशल मीडियावरून किंवा एसएमएसद्वारे पाठविण्याचे नियोजन आहे. संघटनेच्या वतीने हॉटेल व्यावसायिकांमध्ये पाणी बचतीबाबत जागृती करण्यात येईल. हॉटेलच्या प्रत्येक टेबलावर स्टॅन्डी ठेवता येतील. त्याद्वारे ग्राहकांना पाणीबचतीचा संदेश देता येऊ शकतो. दररोज हॉटेल बंद झाल्यानंतर ते धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. त्याऐवजी जर मॉपिंग केले, तर पाण्याची बचत होईल, असे सुमित बाबर यांनी सुचविले.लोकमतचे हे अभियान स्तुत्य असून, वर्षभर हे अभियान राबविण्यास हरकत नाही. मनुष्यप्राण्यांबरोबर प्राणी व पक्ष्यांनाही पाण्याची गरज भासते, हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी पाणी तसेच खाद्य ठेवण्याची सोय करावी. उपाययोजना कराव्यात, असे अब्दुल खान यांनी सांगितले. आवश्यक तेवढेच पाणी उपलब्ध होईल, अशा पद्धतीने नळाच्या पाण्याचा प्रवाह ठेवण्याची व्यवस्था केली, तर गरजेपुरते पाणी वापरले जाईल, असे शंकर चक्रवर्ती यांनी नमूद केले.(प्रतिनिधी) हॉटेलमधील चमचा, ग्लास, ताटे हे धुण्यासाठी खूप पाणी लागते. पाण्याऐवजी कोरडे कापड वापरल्यास पाणीबचत करणे शक्य होईल. ग्लासमध्ये उरलेले पाणी जमा करून साफसफाईसाठी वापरले जाऊ शकते, अशी सूचना वैभव चाबुकस्वार यांनी केली. महापालिका शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करत आहे. हा पाणीपुरवठा चार तास केला जातो. त्यामुळे पाण्याचा साठा करण्याकडे कल वाढतो. दोन दिवसांनी पाणी आल्यावर आधीचे पाणी ओतून देतात व पुन्हा पाणी भरतात. यामुळे पाण्याची नासाडी होते. दिवसाआड चार तासऐवजी रोज एक तास पाणीपुरवठा करावी, असे अध्यक्ष पद्मनाथ शेट्टी यांनी सुचविले.रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. नळकोंडाळे दुरुस्ती, गळती असेल, तर नळ बदलणे, असे उपक्रम राबवले जातात. यापुढे लोकमतच्या जलमित्र अभियानासाठी पूरक असे काम करण्यासाठी पुढाकार घेणार आहे, अशी ग्वाही गणेश कुदळे यांनी दिली.