शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

गुंजवणीचे काम बंद पाडण्याचा इशारा

By admin | Updated: March 7, 2016 01:15 IST

वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणग्रस्तांवर अन्याय झाला असून, संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणग्रस्तांवर अन्याय झाला असून, संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे. आठ दिवसांच्या आत बैठकीचे आयोजन नाही झाले, तर तालुक्यातील सर्व पक्षांचे कार्यकर्ते व धरणग्रस्त शुक्रवार, दि. ११ रोजी धरणाचे काम बंद पाडणार, असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.याबाबत शुक्रवारी बैठक शिवगोरक्ष मंगल सभागृहात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि धरणग्रस्त यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी धरणग्रस्त आक्रमक झाले आहेत. गुंजवणी धरणग्रस्तांवर अन्याय होत असल्याचा सुर या बैठकीत निघाला असून, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याबाबत धरणग्रस्त नाराजी व्यक्त करीत आहेत. पुरंदरला पाणी नेता, तर पुरंदरला धरणग्रस्तांसाठी जमिनी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.अगोदर गुंजवणी धरणाचे पाणी वेल्हे तालुक्यात फिरवा, मगच इतरांना दिले जाईल. वेल्हे तालुक्यातील वाजेघर, वांगणी, सोंडे, निगडे, बोरावळे आदी भागांत सर्वत्र गुंजवणी धरणाचे पाणी फिरले पाहिजे. मगच इतरांना पाणी द्या. गुंजवणी धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सांडव्याचे कामसुद्धा अंतिम टप्प्यातच आहे. या वर्षी गुंजवणी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की जर वेल्ह्यात जोरदार पाऊस झाला, तर गुंजवणी धरण क्षेत्रात भोसलेवाडी,कोदापूर व परिसरातील गावे पाण्यात जाणार आहेत.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. येत्या आठ दिवसांत महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे आणि संबंधित खात्याचे सर्व अधिकारी यांच्यासोबत बैठक घ्यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली.आठ दिवसांच्या आत बैठकीचे आयोजन नाही झाले, तर तालुक्यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते व धरणग्रस्त शुक्रवार, दि. ११ रोजी धरणाचे काम बंद पाडणार, असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन धरणग्रस्तांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना दिले आहे. या वेळी तालुक्यातील जनता व सर्व पक्षातील कार्यकर्ते-लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन धरणग्रस्तांनी केले आहे. या वेळी सभापती सविता वाडघरे, जिल्हा परिषद सदस्या वसुधा नलावडे, शंकर भुरुक, संदीप नगिने, गणपत देवगिरीकर, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक भगवान पासलकर, शिवाजी कडू, नवनाथ राऊत, सचिन कोकाटे, सुनील कोकाटे, रघुनाथ राऊत, दत्तात्रय गेठले, प्रमोद कोकाटे, चंद्रकांत देशपांडे, दीपक देवगिरीकर, संपत मरळ, भिकाजी देवगिरीकर, सखाराम कातुर्डे आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.