शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

गुंजवणीचे काम बंद पाडण्याचा इशारा

By admin | Updated: March 7, 2016 01:15 IST

वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणग्रस्तांवर अन्याय झाला असून, संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणग्रस्तांवर अन्याय झाला असून, संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे. आठ दिवसांच्या आत बैठकीचे आयोजन नाही झाले, तर तालुक्यातील सर्व पक्षांचे कार्यकर्ते व धरणग्रस्त शुक्रवार, दि. ११ रोजी धरणाचे काम बंद पाडणार, असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.याबाबत शुक्रवारी बैठक शिवगोरक्ष मंगल सभागृहात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि धरणग्रस्त यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी धरणग्रस्त आक्रमक झाले आहेत. गुंजवणी धरणग्रस्तांवर अन्याय होत असल्याचा सुर या बैठकीत निघाला असून, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याबाबत धरणग्रस्त नाराजी व्यक्त करीत आहेत. पुरंदरला पाणी नेता, तर पुरंदरला धरणग्रस्तांसाठी जमिनी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.अगोदर गुंजवणी धरणाचे पाणी वेल्हे तालुक्यात फिरवा, मगच इतरांना दिले जाईल. वेल्हे तालुक्यातील वाजेघर, वांगणी, सोंडे, निगडे, बोरावळे आदी भागांत सर्वत्र गुंजवणी धरणाचे पाणी फिरले पाहिजे. मगच इतरांना पाणी द्या. गुंजवणी धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सांडव्याचे कामसुद्धा अंतिम टप्प्यातच आहे. या वर्षी गुंजवणी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की जर वेल्ह्यात जोरदार पाऊस झाला, तर गुंजवणी धरण क्षेत्रात भोसलेवाडी,कोदापूर व परिसरातील गावे पाण्यात जाणार आहेत.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. येत्या आठ दिवसांत महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे आणि संबंधित खात्याचे सर्व अधिकारी यांच्यासोबत बैठक घ्यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली.आठ दिवसांच्या आत बैठकीचे आयोजन नाही झाले, तर तालुक्यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते व धरणग्रस्त शुक्रवार, दि. ११ रोजी धरणाचे काम बंद पाडणार, असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन धरणग्रस्तांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना दिले आहे. या वेळी तालुक्यातील जनता व सर्व पक्षातील कार्यकर्ते-लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन धरणग्रस्तांनी केले आहे. या वेळी सभापती सविता वाडघरे, जिल्हा परिषद सदस्या वसुधा नलावडे, शंकर भुरुक, संदीप नगिने, गणपत देवगिरीकर, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक भगवान पासलकर, शिवाजी कडू, नवनाथ राऊत, सचिन कोकाटे, सुनील कोकाटे, रघुनाथ राऊत, दत्तात्रय गेठले, प्रमोद कोकाटे, चंद्रकांत देशपांडे, दीपक देवगिरीकर, संपत मरळ, भिकाजी देवगिरीकर, सखाराम कातुर्डे आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.