शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

डास मारण्याची ‘बॅट’ आयुक्तांना भेट, अस्वच्छ नदीपात्रामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 03:12 IST

गटारांची कामे अर्धवटच राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अतुल शितोळे आणि राजेंद्र जगताप यांच्यासह परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत डास मारण्याची बॅट भेट देण्यात आली.

पिंपळे गुरव - सांगवी-पिंपळे गुरव भागात नदीतील पाण्यात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. महापालिकेकडून मुळा आणि पवना नद्यांची साफसफाई होत नाही. त्याचबरोबर गटारांची कामे अर्धवटच राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अतुल शितोळे आणि राजेंद्र जगताप यांच्यासह परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत डास मारण्याची बॅट भेट देण्यात आली.आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगवी-पिंपळे गुरव परिसरात मुळा आणि पवना नदी आहे. या नदीची साफसफाई होत नाही. त्याचबरोबर गटारांची अर्धवट कामे यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मलेरियासारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. याला महापालिकेचा आरोग्य विभाग जबाबदार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविले आहे. लाखो रुपये जाहिराती, फलकबाजी, पत्रकबाजी यासाठी खर्च केले आहेत. प्रत्यक्षात मात्र स्वच्छता झालेली नाही. मुळा आणि पवना नदीमध्ये आजही कारखान्याचे रासायनिक पाणी, त्याचबरोबर भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण न झाल्याने मैला आणि सांडपाणी थेट पवना नदीत सोडण्यात येत आहे. रासायनिक पाणी आणि मैलामिश्रित पाण्यामुळे अनेक वेळा मासे मेल्याचेही आढळून आले आहे. नदीतील जीवनसृष्टी यामुळे नामशेष होण्याचा मार्गावर आहे. कासट पेपर मिल आणि पद्मजी पेपर मिलचे पाणीही नदीत सोडले जाते. यामुळे मोठे प्रदूषण निर्माण होत आहे.नदीसुधार प्रकल्पाचे पुढे काय झाले माहिती नाही; मात्र आता नदीसुधार प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान हे स्वप्न आहे. आपण स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास पंतप्रधानांचे स्वप्न कागदावरच राहील. त्यामुळे आपण स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहा आणि गटाराची कामे पूर्ण करून नदी स्वच्छ करण्याचे कार्य हाती घ्या, असे निवेदनात म्हटले आहे.दरम्यान शहरातील इतर भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. प्रशासनाने दक्षता घेण्याची गरज आहे.महापालिका प्रशासने याचा गांभीर्याने विचार केला नाही, म्हणून आज हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सांगवी आणि पिंपळे गुरव ही दोन्ही गावे नदीकाठी आहेत. संपूर्ण शहराची घाण या ठिकाणी येत असल्याने चंद्रमणीनगर, एस. टी. कॉलनी या भागात नदीतील पाण्यात दुर्गं धी पसरलेली आहे. शिवाय डासांचे साम्राज्य वाढल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुरीकरण आणि रासायनिक पावडर वापरली जाते. मात्र सांगवी-पिंपळे गुरव परिसरात याचा कधीच वापर केला जात नाही. मग हा कागदोपत्री खर्च दाखविला जातो का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या