शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याबाबत कागदी घोडे

By admin | Updated: January 25, 2017 01:48 IST

येथील पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पत्रव्यवहार करून

देहूगाव : येथील पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पत्रव्यवहार करून पाठपुरावा करीत असून, ही योजना येथून पुढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने चालविणार नसल्याचे कळविले होते. या पत्रावर देहूगाव ग्रामपंचायतीने व ग्रामसभेने आक्षेप नोंदवित काही मुद्दे उपस्थित करून ही पाणीपुरवठा योजना आहे तशी ताब्यात घेण्यास असमर्थता दाखविली होती, असे असूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथील नागरिक केवळ पाणीपट्टी वसुलीसाठी सहकार्य करीत नसल्याच्या ठपका ठेवून ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला दुरूस्ती व देखभालीसाठी परवडत नसल्याचे कारण देत हस्तांतरण करून घेण्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रपंच करीत आहे.यावर देहूगाव ग्रामपंचायतीने पुन्हा आक्षेप घेत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाही, तोपर्यंत योजनेचे हस्तांतरण करणेत येणार नसल्याचे आणि नवीन पाणी पुरवठा योजना देहूसाठी योग्य व पुरेशी असेल, तरच नवीन पाणी योजनेसह सर्व पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्याबाबत विशेष ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांचा निर्णय घेण्यात येईल, याबाबत आपणास कळविण्यात येईल, तोपर्यंत ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेच चालवावी, असे निवेदनाद्वारे कळविले आहे. देहूगावला १९६७ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्याच्या पाणी पुरवठा योजनेची क्षमता १.७५ दशलक्ष लिटर असून गावचा विकास होत असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच या परिसरातील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठा अनियमित होऊ शकतो म्हणत हा मुद्दा फेटाळला आहे. मीटरद्वारे पाणीपुरवठा करणेबाबत जीवन प्राधिकरण म्हणते की, ही पाणीपुरवठा योजनेत मीटर बसविण्याचे प्रयोजन नव्हते तर सर्व ग्राहकांना ठोस पाणी पुरवठा करावा असे प्रयोजन होते. त्यामुळे ही योजना हस्तांतरण प्रक्रियेकरीता हा मुद्दा योग्य वाटत नसल्याचे स्पष्ट करीत ग्रामपंचायतीने उपस्थित केलेले सर्व आक्षेप फेटाळले आहेत. (वार्ताहर)