शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पाणीपुरवठ्याबाबत कागदी घोडे

By admin | Updated: January 25, 2017 01:48 IST

येथील पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पत्रव्यवहार करून

देहूगाव : येथील पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पत्रव्यवहार करून पाठपुरावा करीत असून, ही योजना येथून पुढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने चालविणार नसल्याचे कळविले होते. या पत्रावर देहूगाव ग्रामपंचायतीने व ग्रामसभेने आक्षेप नोंदवित काही मुद्दे उपस्थित करून ही पाणीपुरवठा योजना आहे तशी ताब्यात घेण्यास असमर्थता दाखविली होती, असे असूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथील नागरिक केवळ पाणीपट्टी वसुलीसाठी सहकार्य करीत नसल्याच्या ठपका ठेवून ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला दुरूस्ती व देखभालीसाठी परवडत नसल्याचे कारण देत हस्तांतरण करून घेण्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रपंच करीत आहे.यावर देहूगाव ग्रामपंचायतीने पुन्हा आक्षेप घेत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाही, तोपर्यंत योजनेचे हस्तांतरण करणेत येणार नसल्याचे आणि नवीन पाणी पुरवठा योजना देहूसाठी योग्य व पुरेशी असेल, तरच नवीन पाणी योजनेसह सर्व पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्याबाबत विशेष ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांचा निर्णय घेण्यात येईल, याबाबत आपणास कळविण्यात येईल, तोपर्यंत ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेच चालवावी, असे निवेदनाद्वारे कळविले आहे. देहूगावला १९६७ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्याच्या पाणी पुरवठा योजनेची क्षमता १.७५ दशलक्ष लिटर असून गावचा विकास होत असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच या परिसरातील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठा अनियमित होऊ शकतो म्हणत हा मुद्दा फेटाळला आहे. मीटरद्वारे पाणीपुरवठा करणेबाबत जीवन प्राधिकरण म्हणते की, ही पाणीपुरवठा योजनेत मीटर बसविण्याचे प्रयोजन नव्हते तर सर्व ग्राहकांना ठोस पाणी पुरवठा करावा असे प्रयोजन होते. त्यामुळे ही योजना हस्तांतरण प्रक्रियेकरीता हा मुद्दा योग्य वाटत नसल्याचे स्पष्ट करीत ग्रामपंचायतीने उपस्थित केलेले सर्व आक्षेप फेटाळले आहेत. (वार्ताहर)