शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

ऐन सणासुदीत डाळी कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:03 IST

गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला असताना डाळी आणि कडधान्यांच्या किमती कडाडल्या आहेत.

पिंपरी : गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला असताना डाळी आणि कडधान्यांच्या किमती कडाडल्या आहेत. चणा, वाटाणा, मूग, हरबरा डाळ व मसूरच्या भावात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.श्रावण महिन्यात अनेक सणांची रेलचेल असते. त्यामुळे डाळींना मागणी वाढली आहे. त्यातच आयातीवर घालण्यात आलेली तात्पुरती बंदी यांमुळे घाऊक बाजारात कडधान्य व डाळींच्या भावात सुमारे पाच ते अठरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातच बाजारात मालाचा तुटवडा निर्माण होताच काही व्यापाºयांकडून डाळींची साठेबाजी करून नफेखोरी करण्याचे प्रकारही सर्रास सुरू आहेत. याचाही प्रतिकूल परिणाम डाळींच्या किमतीवर पाहायला मिळत आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून सणासुदीमुळे कडधान्य व डाळीला मोठी मागणी वाढली आहे. तसेच आयातीत डाळींवर बंदी घालण्यात आली. परिणामी आठवडाभरातच डाळी व कडधान्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात ५३०० ते ५५०० रुपये प्रति क्विंटल भावाने विकली जाणारी तूरडाळ आज ६६०० ते ७१०० रुपये क्विंटल इतकी झाली आहे. मूगडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ, चणाडाळ यांच्या भावातही क्विंटलमागे पाचशे ते सातशे रुपयांनी वाढ झाली आहे. डाळींप्रमाणेच कडधान्यांच्या भावातही वाढ झाली आहे. ५५०० ते ५७०० रुपये क्विंटल भावाने मिळणाºया मुगाचा दर सध्या ६६०० ते ६७०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. त्याचप्रमाणे चणा, वाटाणा, मसूर, घेवडा, हुलगा, चवळी आदींच्या भावातही क्विंटलमागे दोनशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे.>व्यापाºयांकडून साठेबाजीवास्तविक बाजारात मुबलक प्रमाणात माल असताना भाववाढ करण्याचे काहीही कारण नाही. मात्र, व्यापारी हवामान, आवक आणि मागणी याचा अंदाज घेऊन मोठ्या प्रमाणात साठेबाजी करतात. त्यामुळे मागणी वाढताच चढ्या भावाने मालाची विक्री करून मोठ्या प्रमाणात नफा कमवता येतो. व्यापाºयांच्या अशा कुटनीतीमुळे सामान्य नागरिकांना मात्र सणवार साजरे करताना काही प्रमाणात का होईना, हात आखडता घ्यावा लागत आहे. अन्न आणि औैषध प्रशासनाने अशाप्रकारे नफेखोरी करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.