शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

स्मशानभूमीची वाट बनली बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:35 IST

दापोडी येथील नदीच्या काठावर सुसज्ज स्मशानभूमी बांधून त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्मशानभूमीची दुरवस्था होत आहे.

पिंपरी : दापोडी येथील नदीच्या काठावर सुसज्ज स्मशानभूमी बांधून त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्मशानभूमीची दुरवस्था होत आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला भंगाराची दुकाने उभारण्यात आली आहे. मोठमोठ्या पत्र्यांच्या शेड उभारून भंगाराचा व्यवसाय सुरू आहे; मात्र त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चिंचोळा होत आहे.स्मशानभूमीच्या आवारात नवीन दहनशेड व निवाराशेड काही वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. सर्व सोर्इंनी युक्त अशी स्मशानभूमीची बांधणी करण्यात आली आहे. मात्र सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने अल्पावधीतच स्मशानभूमीची दुरवस्था झाली. येथील कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. त्याला आधार म्हणून कार्यालयाच्या आतून पत्रा लावला आहे.दहनशेडजवळ मातीचा ढीग टाकला आहे. पावसाच्या पाण्यामुळे ती माती वाहत जाऊन चिखल होत आहे. शेडवर लावलेले विजेचे दिवे नाहीसे झाले आहेत. त्या ठिकाणी फक्त दिव्यांचे साठे शिल्लक आहेत. परिसरामधील पेव्हिंग ब्लॉकमध्ये अंतर असल्यामुळे त्यावर गवत उगवले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाºया नातेवाइकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.स्मशानभूमीच्या सुरक्षा भिंतीबाहेर मोठ्या प्रमाणावर कचºयाचे ढीग साचले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या भंगाराच्या दुकानवाल्यांनी अनेक निरुपयोगी कचºयाचे ढीग तेथे लावले आहेत. भंगाराचे मोठमोठे गठ्ठे करून रस्त्याच्या कडेला ठेवले जातात. भंगारात ज्या वस्तूंची विक्री होणार नाही अशा वस्तू रस्त्यावर फेकल्या जातात. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाºया नातेवाइकांना त्यामधून वाट काढावी लागते.सुसज्ज स्मशानभूमी बांधूनही वाट बिकट झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची एक टाकी येथे बांधण्यात आली आहे. मात्र त्या टाकीला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. टाकी एकच असल्याने नातेवाइकांना ताटकळत उभे राहावे लागते.>शेडचे बांधकाम चांगले झाले आहे, मात्र येथील स्वच्छता व रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने बघितले पाहिजे. या ठिकाणी अवैध मार्गाने गोदामे उभी राहत आहेत. त्याकडे लक्ष देऊन त्यावर कारवाई केली पाहिजे अन्यथा काही दिवसांनी स्मशानभूमीमध्ये येण्यासाठी रस्ताच राहणार नाही.- सुधाकर शिंदे, स्थानिक रहिवासी>प्रशासनाकडून कमतरतास्मशानभूमी हा माणसांच्या जीवनातील संवेदनशील भाग आहे. तेथे येणारे नातेवाईक कसलीही मोठी अपेक्षा ठेवून येत नाही, तर किमान मूलभूत ज्या सोईसुविधा आहेत, त्या उपलब्ध असाव्यात अशी त्यांची इच्छा असते. मात्र, प्रशासन नेमके त्याच ठिकाणी कमी पडत आहे.