शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांमध्ये नोंदणी करून मतदार व्हा

By admin | Updated: August 31, 2016 01:04 IST

महापालिका निवडणूकीसाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी तीन विधानसभा मतदार संघाचा भाग येतो. तसेच मुळशी तालुक्याचाही काही भाग या शहरात येतो.

मतदार नोंदणीबद्दल सांगा.- महापालिका निवडणूकीसाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी तीन विधानसभा मतदार संघाचा भाग येतो. तसेच मुळशी तालुक्याचाही काही भाग या शहरात येतो. निरंतर मतदार नोंदणीचे काम सुरू असते. मात्र, महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने मतदार नोंदणीसाठी सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ जानेवारी २०१६ रोजी १८ वर्ष पूर्ण होणाऱ्यांना यादीत समाविष्ट केले जाणार आहे. तसेच मतदार यादीत नावे समाविष्ठ करण्यासाठी शहरातील १६ महाविद्यालयांमध्ये समन्वयकांची नियुक्ती केली आहे. २०१२ च्या निवडणूकीमध्ये ११ लाख ५२ हजार मतदार होते. मात्र, मतदार याद्यांची दुरूस्ती मोहीमेमुळे मतदार संख्या कमी झाली आहे. मतदारांची संख्या घटली आहे?-गेल्या महापालिका निवडणूकीत साडेअकरा लाख मतदार होते. मात्र, मतदार याद्यांची दुरूस्ती करण्यात आली. दुबार, स्थलांतरित , मृत व्यक्तीची नावे तपासली. याद्या दुरूस्त केल्या. त्यातून चिंचवडमधून ८० हजार ७०१, पिंपरीतून ८४ हजार ९४३, भोसरीतून ४२ हजार ७४२ मतदार वगळण्यात आले. सुमारे सव्वा दोन लाख मतदार वगळल्याने आता ती संख्या १० लाख ६८ हजार ३७१ वर आली आहे. १६ जानेवारी २०१६ रोजी अपडेट केलेल्या याद्यांमुळे शहरातील मतदार संख्या ११ लाख ३ हजार ३७२ झाली आहे. जानेवारीपासून आणि आत्तापर्यंत आणि येत्या दोन महिन्यात नवीन मतदार नोंदणी होणार आहे. त्यामुळे साडेतेरा लाखापर्यंत मतदार होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे मतदार संख्या घटलेली नाही.प्रभाग रचनेबद्दल सांगा?-महापालिका निवडणूक ही २०११ च्या जनगणेनुसार होणार असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. शहरात ३१०२ जनगणनेचे प्रगणक गट होते. हेच गट गुगल अर्थच्या नकाशावर बसवून प्रारूप प्रभाग रचना तयार केली जाणार आहे.प्रारूप प्रभाग रचना तयार करून संबंधित प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहिर होईल, त्यानंतर आरक्षणांची सोडत काढण्यात येणार आहे. मतदार याद्यांचे शुद्धीकरण हेही काम एका बाजूला सुरू राहणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी महापालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होणार आहे.मतदार केंद्र आणि नियोजन काय?-महापालिकेची होणारी निवडणूक चारसदस्यीय पद्धतीने असल्याने ३२ प्रभाग असणार आहेत.एका मतदारास अनेक मते देण्यासाठी लागणारा वेळ याचा विचार करता, एका मतदान केंद्रास ७०० मतदार जोडल्यास मतदार प्रक्रिया सुरळीत होईल, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रस्तावित केले आहे. बहुसदस्यीय पद्धतीमुळे एका मतदान केंद्रावरील मतदार संख्या कमी केल्यामुळे शहरातील एकुण मतदार केंद्रामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे १९५० मतदान केंद्र तयार करावी लागणार आहेत. त्याचे नियोजन केले असून कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले आहे. अभियानाबद्दल सांगा?-मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार जागृती अभियान राबविले आहे. नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाणीबीलांसोबत सुमारे सहा लाख पत्रके वाटण्यात आली. तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांत मतदार साह्यता केंद्र सुरू केले आहे. महाविद्यालयांमध्येही मतदार नोंदणीची सुविधा केली आहे. - शब्दांकन : विश्वास मोरे