शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

सोशल मीडियावर सर्रास वाङ्मयचौर्य

By admin | Updated: July 17, 2017 04:12 IST

प्रत्येकामध्ये लेखक, कवी किंवा साहित्यिक दडलेला असतो. कोणाला छान कविता, कथा सुचते तर कोणी एखाद्या घटनेचे छान विश्लेषण करते...

प्रज्ञा-केळकर-सिंग। लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रत्येकामध्ये लेखक, कवी किंवा साहित्यिक दडलेला असतो. कोणाला छान कविता, कथा सुचते तर कोणी एखाद्या घटनेचे छान विश्लेषण करते... आपले लेखन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडले जाते ते सोशल मीडियाचे माध्यम. एखादा रसिक आपली कविता, लेखन आवडीने शेअर करतो, तेव्हा आपल्याला आनंदच होतो...मात्र, एखादे वेळी आपलेच लेखन तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने सोशल मीडियावर दृष्टीस पडते, तेव्हा मोठा धक्का बसतो. आजकाल सोशल मीडियावर वाङ्मयचौर्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. आपण कॉपीराईट कायद्याचा भंग करत आहोत, हे या ‘वाङ्मयचोरां’च्या ध्यानीमनीही नसते. अशा परिस्थितीत मूळ लेखकाला कॉपीराईट कायद्याचा भंग झाल्याची रीतसर तक्रार करता येऊ शकते. मात्र, जनजागृतीअभावी अशा प्रकारे तक्रारी नोंदवल्या जाण्याचे प्रकार केवळ १०-२० टक्केच आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे सोशल मीडिया... आपले विचार, लेखन, विश्लेषण सोशल मीडियावर व्यक्त करुन त्यातून चर्चा, मार्गदर्शन आणि विचारमंथन घडावे, यादृष्टीने अनेक उदयोन्मुख लेखक सोशल मीडियावर सक्रिय असतात. एखाद्याचा विशिष्ट विषयामध्ये हातखंडा असतो. कोणाला सामाजिक, राजकीय परिस्थितीवर उत्तम भाष्य करता येते, तर कोणाचा ललित लेखनात हातखंडा असतो. प्रत्येकाला आपले पुस्तक किंवा लिखाण प्रकाशित करणे जमेलच असे नाही. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ब्लॉग आदींच्या माध्यमातून लिखाणाला नवे धुमारे फुटत असतात. बरेचदा, एखादी व्यक्ती मूळ लेखकाची परवानगी न घेता हे लिखाण त्याच्या वॉलवरुन कॉपी करून स्वत:च्या वॉलवर, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अथवा एखाद्या प्रकल्पामध्ये पेस्ट करुन वाहवा मिळवते. येनकेनप्रकारेण, आपल्या लेखनाची चोरी होत असल्याचे मूळ लेखकाच्या निदर्शनास आल्यानंतर धक्का बसतो, चिडचिड आणि मनस्ताप पदरी पडतो. बरेचदा मूळ लेखक कॉपी, पेस्ट केलेल्या लेखनाचे स्क्रीन शॉट काढून ते शेअर करुन असे प्रकार उघडकीस आणताना दिसत आहेत. त्यामुळे वाङ्मयचौर्याला अल्प प्रमाणात आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, याबाबत अधिक जागरूकता आणि सावधगिरी बाळगून रीतसर तक्रार नोंदवता येऊ शकते. कायद्याच्या चौकटीतून अशा प्रकारांना आळा घालता येतो, असे मत आयटी कायद्याच्या जाणकार वकील अ‍ॅड. वैशाली भागवत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. प्रत्यक्ष लेखनाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक लेखनालाही साहित्याचा दर्जा आपोआप प्राप्त होतो. कोणत्याही प्रकारची नोंदणी न करताही या लेखनाला स्वामित्वहक्क प्राप्त होतो. यामध्ये लेखनाचा, भाषांतराचा, नवनिर्मितीचा समावेश होतो. त्यामुळेच सोशल मीडियावरील लेखन अथवा आशयाला कॉपी राईट आणि आयटी कायदा लागू होतो. मूळ लेखनाची कोणीही चोरी केल्यास, लेखकाचे नाव बदलून स्वत:च्या नावाने पोस्ट केल्यास, डाऊनलोड केल्यास अथवा हे लेखन कोणत्याही प्रकारे जसेच्या तसे वापरल्यास कॉपीराईट कायद्याच्या ६३ (ब) कलामांतर्गत आणि आयटी कायद्याच्या ४३ब (ब) या कलमांतर्गत गुन्हा अथवा तक्रार नोंदवली जाऊ शकते. बरेचदा एखादी कथा अथवा लेखन जसेच्या तसे न उचलता त्यातील ठरावीक भाग उचलण्याचे प्रकार घडतात. एखाद्या लेखकाचे लेखन स्वत:च्या नावाने व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवले जाते. अशा परिस्थितीतही कायद्याचा भंग होतो. मात्र, फारसे नेटिझन्स याबाबत तक्रार दाखल करण्याबाबत उत्सुकता दाखवत नाहीत. माझ्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागेल, कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील, पैसे आणि वेळ खर्च होईल, अशी यामागची मानसिकता असते. मात्र, तरुणांनी याबाबत जागरूकता बाळगणे गरजेचे असल्याचे मत अ‍ॅड. वैशाली भागवत यांनी व्यक्त केले.