शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा ‘कचरा’

By admin | Updated: May 6, 2017 02:24 IST

प्रशासकीय अनास्थेमुळे देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका पिछाडीवर गेली

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : प्रशासकीय अनास्थेमुळे देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका पिछाडीवर गेली आहे. याबाबत आरोग्य विभागातील अधिका-यांच्या अकार्यक्षमतेचा कचरा साफ करण्याची आवश्यकता आहे, अशी नाराजी शहरातील विविध पक्षीय नेत्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या यादीतील टॉप टेनमध्ये शहराचा देशात नववा क्रमांक आणि राज्यात पहिला क्रमांक आला होता. त्यामुळे स्वच्छतेबाबतच्या पिंपरी-चिंचवड पॅटर्नचा अभ्यास इतर शहरांनी केला होता. या वर्षीच्या निकालात पिंपरी-चिंचवड पिछाडीवर गेले आहे. देशात ७२ वा आणि राज्यात पिंपरीचा पाचवा क्रमांक आला आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भाजपाचे पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ भारत स्पर्धेत शहराला कमी गुण मिळाले ही निश्चितच क्लेषदायी बाब आहे. हे मूल्यांकन झाले ते राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाचे आहे. त्यांनी लक्ष न दिल्यानेच शहराला अपयश आले आहे.’’ स्वच्छतेच्या बाबतीत थेट ७२व्या क्रमांकावर घसरण झाली, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. याला महापालिका अधिकारीच जबाबदार आहेत. त्यांनी लक्ष दिले नाही म्हणून अपयश आले. त्यांच्यामुळे शहरवासीयांची शरमेने मान खाली गेली आहे. कचऱ्याविषयी ज्या संस्था काम करतात. त्याच बोगस आहे. - नितीन काळजे, महापौर स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडला अपयश का आले, याची कारणे शोधून प्रभावी उपाययोजना केल्या जातील. पिंपरी-चिंचवड हे चांगले शहर असून, तीन गोष्टींवर भर देणार असून, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, वाहतूक व विघटन यावर लक्ष देणार आहे. दोन वर्षांत शहर कचरामुक्ततेसाठी प्रयत्न करेल. - श्रावण हर्डीकर, आयुक्त भाजपाच्या नाकर्तेपणाचे उत्तम उदाहरण आहे. केवळ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार सत्ताधारीही तितकेच जबाबदार आहेत. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि प्रशासनाने याविषयी गांभीर्याने नियोजन केले नाही. परिणामी आपल्याला अपयश आले ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. - संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादीस्वच्छ स्पर्धेसाठी गुणांक झाले कमी स्वच्छ स्पर्धेबाबत लक्ष न दिल्याने गुणांकनात शहर पिछाडीवर गेले आहे. त्यामुळे देशातील टॉप टेनची पंरपरा खंडित झाली आहे. स्वच्छ शहराबाबतच्या स्पर्धेकडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष झाले. परिणामी गतवर्षींच्या गुणांमध्ये घट झाली. आरोग्य विभागाडेकही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.- राहुल कलाटे, शहरप्रमुख, शिवसेना महापालिकेत भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर पहिली भेट शहरवासीयांना दिली आहे. स्वच्छ भारतमध्ये शहराचा कचरा केला. याला सत्ताधारीच जबाबदार आहेत. शहरातील कचरा कमी करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. शहरवासीयांसाठी अच्छे दिन जरी आले नाहीत, तर यापेक्षा बुरे दिन येऊ नयेत, याची दक्षता भारतीय जनता पक्षाने घ्यायला हवी.- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस