शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा ‘कचरा’

By admin | Updated: May 6, 2017 02:24 IST

प्रशासकीय अनास्थेमुळे देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका पिछाडीवर गेली

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : प्रशासकीय अनास्थेमुळे देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका पिछाडीवर गेली आहे. याबाबत आरोग्य विभागातील अधिका-यांच्या अकार्यक्षमतेचा कचरा साफ करण्याची आवश्यकता आहे, अशी नाराजी शहरातील विविध पक्षीय नेत्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या यादीतील टॉप टेनमध्ये शहराचा देशात नववा क्रमांक आणि राज्यात पहिला क्रमांक आला होता. त्यामुळे स्वच्छतेबाबतच्या पिंपरी-चिंचवड पॅटर्नचा अभ्यास इतर शहरांनी केला होता. या वर्षीच्या निकालात पिंपरी-चिंचवड पिछाडीवर गेले आहे. देशात ७२ वा आणि राज्यात पिंपरीचा पाचवा क्रमांक आला आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भाजपाचे पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ भारत स्पर्धेत शहराला कमी गुण मिळाले ही निश्चितच क्लेषदायी बाब आहे. हे मूल्यांकन झाले ते राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाचे आहे. त्यांनी लक्ष न दिल्यानेच शहराला अपयश आले आहे.’’ स्वच्छतेच्या बाबतीत थेट ७२व्या क्रमांकावर घसरण झाली, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. याला महापालिका अधिकारीच जबाबदार आहेत. त्यांनी लक्ष दिले नाही म्हणून अपयश आले. त्यांच्यामुळे शहरवासीयांची शरमेने मान खाली गेली आहे. कचऱ्याविषयी ज्या संस्था काम करतात. त्याच बोगस आहे. - नितीन काळजे, महापौर स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडला अपयश का आले, याची कारणे शोधून प्रभावी उपाययोजना केल्या जातील. पिंपरी-चिंचवड हे चांगले शहर असून, तीन गोष्टींवर भर देणार असून, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, वाहतूक व विघटन यावर लक्ष देणार आहे. दोन वर्षांत शहर कचरामुक्ततेसाठी प्रयत्न करेल. - श्रावण हर्डीकर, आयुक्त भाजपाच्या नाकर्तेपणाचे उत्तम उदाहरण आहे. केवळ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार सत्ताधारीही तितकेच जबाबदार आहेत. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि प्रशासनाने याविषयी गांभीर्याने नियोजन केले नाही. परिणामी आपल्याला अपयश आले ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. - संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादीस्वच्छ स्पर्धेसाठी गुणांक झाले कमी स्वच्छ स्पर्धेबाबत लक्ष न दिल्याने गुणांकनात शहर पिछाडीवर गेले आहे. त्यामुळे देशातील टॉप टेनची पंरपरा खंडित झाली आहे. स्वच्छ शहराबाबतच्या स्पर्धेकडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष झाले. परिणामी गतवर्षींच्या गुणांमध्ये घट झाली. आरोग्य विभागाडेकही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.- राहुल कलाटे, शहरप्रमुख, शिवसेना महापालिकेत भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर पहिली भेट शहरवासीयांना दिली आहे. स्वच्छ भारतमध्ये शहराचा कचरा केला. याला सत्ताधारीच जबाबदार आहेत. शहरातील कचरा कमी करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. शहरवासीयांसाठी अच्छे दिन जरी आले नाहीत, तर यापेक्षा बुरे दिन येऊ नयेत, याची दक्षता भारतीय जनता पक्षाने घ्यायला हवी.- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस