शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीतून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:43 IST

सांगवी परिसरात उघड्यावरच खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. अशा बेकायदा व्यवसायातून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे.

सांगवी : सांगवी परिसरात उघड्यावरच खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. अशा बेकायदा व्यवसायातून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. ग्राहकांच्या आरोग्यास बाधा पोहचू नये म्हणून कोणत्याही प्रकारची खबरदारी काही विक्रेत्यांकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.सांगवी परिसरात जवळपास सर्वच ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांसह काही मोठी हॉटेलही स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. सांगवी परिसरात शंभर ते दीडशे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. खाद्यपदार्थ विक्री करताना पुरेशी काळजी घेण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. खाद्यपदार्थ झाकून ठेवणे, जाळी ठेवणे, पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवणे इत्यादी बाबतीत विक्रेते दुर्लक्ष करताना दिसून येतात. सांगवीतील काटेपुरम चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, साई चौक, कृष्णा चौक आदी भागांत सकाळी आणि सायंकाळी खाद्यपदार्थ विक्रेते व ग्राहकांची गर्दी असते. याच भागात हॉटेल्सही आहेत. हातगाडीवाले रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करताना दिसून येत आहेत. यातील काही व्यावसायिकच स्वच्छता पाळत असल्याचे दिसून येते. खाद्यपदार्थ झाकून ठेवतात. सांगवी परिसरातील ८० टक्के खाद्यपदार्थ स्वच्छतेची व बनवण्यासाठी विक्रेते दुर्लक्ष करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे चित्र आहे.सांगवी आणि परिसरातील अनेक खाद्यपदार्थ विक्रेते आणि हातगाडीवाले हात स्वच्छ न धुता खाद्यपदार्थांची हाताळणी करतात. बहुतांश व्यावसायिक चायनीज खाद्यपदार्थांसाठी स्वच्छ भांडी किंवा दर्जेदार साहित्य वापरत नाहीत, असे दिसून येत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. शासन आदेश असतानाही हातगाडी आणि हॉटेलमध्ये पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवले जात नसल्याचे दिसून येते.अनेक ठिकाणी प्लॅस्टिक कॅन तर काही ठिकाणी जुने प्लॅस्टिक ड्रममधूनच ग्राहकांसाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. चहा विक्रेते कप धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करीत नाहीत.महापालिका आणि अन्न औषध प्रशासन विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. ग्राहकांच्या आरोग्यास बाधा होईल अशा पद्धतीने खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आणि व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहकआणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढले आजारसांगवीतील साई चौकात संध्याकाळी अनेक हातगाडीवाले वडापाव तसेच चायनीज इत्यादी खाद्यपदार्थांची विक्री करतात. मात्र येथील खाद्यपदार्थ देताना प्राथमिक स्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन होताना दिसून येते. मात्र प्रशासन या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येते. महापालिका प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या यंत्रणांकडून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न सामान्य ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड