शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीतून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:43 IST

सांगवी परिसरात उघड्यावरच खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. अशा बेकायदा व्यवसायातून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे.

सांगवी : सांगवी परिसरात उघड्यावरच खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. अशा बेकायदा व्यवसायातून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. ग्राहकांच्या आरोग्यास बाधा पोहचू नये म्हणून कोणत्याही प्रकारची खबरदारी काही विक्रेत्यांकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.सांगवी परिसरात जवळपास सर्वच ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांसह काही मोठी हॉटेलही स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. सांगवी परिसरात शंभर ते दीडशे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. खाद्यपदार्थ विक्री करताना पुरेशी काळजी घेण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. खाद्यपदार्थ झाकून ठेवणे, जाळी ठेवणे, पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवणे इत्यादी बाबतीत विक्रेते दुर्लक्ष करताना दिसून येतात. सांगवीतील काटेपुरम चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, साई चौक, कृष्णा चौक आदी भागांत सकाळी आणि सायंकाळी खाद्यपदार्थ विक्रेते व ग्राहकांची गर्दी असते. याच भागात हॉटेल्सही आहेत. हातगाडीवाले रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करताना दिसून येत आहेत. यातील काही व्यावसायिकच स्वच्छता पाळत असल्याचे दिसून येते. खाद्यपदार्थ झाकून ठेवतात. सांगवी परिसरातील ८० टक्के खाद्यपदार्थ स्वच्छतेची व बनवण्यासाठी विक्रेते दुर्लक्ष करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे चित्र आहे.सांगवी आणि परिसरातील अनेक खाद्यपदार्थ विक्रेते आणि हातगाडीवाले हात स्वच्छ न धुता खाद्यपदार्थांची हाताळणी करतात. बहुतांश व्यावसायिक चायनीज खाद्यपदार्थांसाठी स्वच्छ भांडी किंवा दर्जेदार साहित्य वापरत नाहीत, असे दिसून येत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. शासन आदेश असतानाही हातगाडी आणि हॉटेलमध्ये पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवले जात नसल्याचे दिसून येते.अनेक ठिकाणी प्लॅस्टिक कॅन तर काही ठिकाणी जुने प्लॅस्टिक ड्रममधूनच ग्राहकांसाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. चहा विक्रेते कप धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करीत नाहीत.महापालिका आणि अन्न औषध प्रशासन विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. ग्राहकांच्या आरोग्यास बाधा होईल अशा पद्धतीने खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आणि व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहकआणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढले आजारसांगवीतील साई चौकात संध्याकाळी अनेक हातगाडीवाले वडापाव तसेच चायनीज इत्यादी खाद्यपदार्थांची विक्री करतात. मात्र येथील खाद्यपदार्थ देताना प्राथमिक स्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन होताना दिसून येते. मात्र प्रशासन या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येते. महापालिका प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या यंत्रणांकडून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न सामान्य ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड