शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीतून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:43 IST

सांगवी परिसरात उघड्यावरच खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. अशा बेकायदा व्यवसायातून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे.

सांगवी : सांगवी परिसरात उघड्यावरच खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. अशा बेकायदा व्यवसायातून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. ग्राहकांच्या आरोग्यास बाधा पोहचू नये म्हणून कोणत्याही प्रकारची खबरदारी काही विक्रेत्यांकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.सांगवी परिसरात जवळपास सर्वच ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांसह काही मोठी हॉटेलही स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. सांगवी परिसरात शंभर ते दीडशे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. खाद्यपदार्थ विक्री करताना पुरेशी काळजी घेण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. खाद्यपदार्थ झाकून ठेवणे, जाळी ठेवणे, पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवणे इत्यादी बाबतीत विक्रेते दुर्लक्ष करताना दिसून येतात. सांगवीतील काटेपुरम चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, साई चौक, कृष्णा चौक आदी भागांत सकाळी आणि सायंकाळी खाद्यपदार्थ विक्रेते व ग्राहकांची गर्दी असते. याच भागात हॉटेल्सही आहेत. हातगाडीवाले रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करताना दिसून येत आहेत. यातील काही व्यावसायिकच स्वच्छता पाळत असल्याचे दिसून येते. खाद्यपदार्थ झाकून ठेवतात. सांगवी परिसरातील ८० टक्के खाद्यपदार्थ स्वच्छतेची व बनवण्यासाठी विक्रेते दुर्लक्ष करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे चित्र आहे.सांगवी आणि परिसरातील अनेक खाद्यपदार्थ विक्रेते आणि हातगाडीवाले हात स्वच्छ न धुता खाद्यपदार्थांची हाताळणी करतात. बहुतांश व्यावसायिक चायनीज खाद्यपदार्थांसाठी स्वच्छ भांडी किंवा दर्जेदार साहित्य वापरत नाहीत, असे दिसून येत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. शासन आदेश असतानाही हातगाडी आणि हॉटेलमध्ये पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवले जात नसल्याचे दिसून येते.अनेक ठिकाणी प्लॅस्टिक कॅन तर काही ठिकाणी जुने प्लॅस्टिक ड्रममधूनच ग्राहकांसाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. चहा विक्रेते कप धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करीत नाहीत.महापालिका आणि अन्न औषध प्रशासन विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. ग्राहकांच्या आरोग्यास बाधा होईल अशा पद्धतीने खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आणि व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहकआणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढले आजारसांगवीतील साई चौकात संध्याकाळी अनेक हातगाडीवाले वडापाव तसेच चायनीज इत्यादी खाद्यपदार्थांची विक्री करतात. मात्र येथील खाद्यपदार्थ देताना प्राथमिक स्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन होताना दिसून येते. मात्र प्रशासन या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येते. महापालिका प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या यंत्रणांकडून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न सामान्य ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड