शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास

By admin | Updated: March 20, 2017 04:17 IST

मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात होणारा त्रास कमी करण्यासाठी तळेगावचे उपनगराध्यक्ष

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा  काळात होणारा त्रास कमी करण्यासाठी तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या पुढाकाराने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुक्यातील ५५ गावांतील तब्बल ६०० विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. अशा प्रकारचा हा राज्यात राबविला गेलेला पहिलाच उपक्रम आहे.मावळ तालुका हा डोंगर-दऱ्या व धरणांनी व्यापलेला आहे. त्यामुळे अनेक गावे अजूनही दुर्गम आहेत. दळणवळणाची पुरेशी साधने नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी काही किलोमीटरची पायपीट करावी लागते. दहावीची परीक्षा केंद्रे तर वडगाव मावळ, कामशेत किंवा पवनानगर अशा मोठ्या गावांमध्ये असतात. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी दररोज कित्येक किलोमीटर प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. तालुक्याच्या टोकाला असलेली गावे तर परीक्षा केंद्रापासून तब्बल ४० किलोमीटर अंतरावर आहेत. परीक्षेच्या काळात दीड ते दोन तासाचा प्रवास म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खरोखरच दिव्य असते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बहुतांश पालकांकडे स्वत:ची वाहने नाहीत. विद्यार्थ्यांना एसटी बसवर विसंबून राहावे लागते. गावापासून मुख्य रस्त्यापर्यंत चालत यायचे आणि एसटी बसची वाट बघायची. बस आल्यानंतर शहरात जायचे. तेथून पायपीट करत परीक्षा केंद्रापर्यंत पोहायचे. ज्यांना शक्य असेल त्यांनी परीक्षा केंद्र असलेल्या गावातील मंदिर, समाज मंदिरात, वसतिगृहात किंवा नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या घरी परीक्षेच्या काळापुरता आश्रय घ्यायचा, एवढाच पर्याय त्यांच्यापुढे होता.विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्याचा निर्णय तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी घेतला. त्यांच्या पुढाकारने स्थापन झालेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तालुका पिंजून काढला. त्यात ५५गावातील विद्यार्थ्यांना मोफत वाहनव्यवस्थेची गरज असल्याचे आढळून आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत आणि परीक्षा झाल्यानंतर परत घरापर्यंत सोडविण्याची जबाबदारीे प्रतिष्ठानने उचलली. त्यासाठी त्या-त्या परिसरातील ६० चारचाकी वाहने भाड्याने घेण्यात आली. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी परीक्षा .केंद्रावर पोहचविणे आणि सुरक्षितपणे परत घरी पोहचविण्यात येत असल्याने पालकवर्गही निश्चिंत झाला आहे. प्रवासात दररोज वाया जाणारे तीन ते चार तास वाचू लागल्याने विद्याथीर्ही खूष आहेत. त्यामुळे यावेळी मावळातील निकालाचा टक्काही वाढण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)