शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘माजी’ की ‘माननीय’, ठरवा तुम्हीच!

By admin | Updated: December 8, 2015 00:04 IST

एकदा का नावापुढे पद लागले की, पदाचा कालावधी संपल्यानंतरही पदाशिवाय समाजात मिरविणे अवघड होते. अशीच स्थिती सध्या पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे

मंगेश पांडे, पिंपरी एकदा का नावापुढे पद लागले की, पदाचा कालावधी संपल्यानंतरही पदाशिवाय समाजात मिरविणे अवघड होते. अशीच स्थिती सध्या पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे. माजी होऊन काहींना दोन वर्षे, तर काहींना तब्बल २५ वर्षे उलटली, तरीही अद्याप नावाअगोदर केवळ ‘मा’ असल्याचे फलक नजरेस पडत आहेत. त्यामुळे ‘मा’ म्हणजे माजी आहेत की ‘माननीय’ आहेत, हे न उलगडणारे कोडे आहे. निवडणुकीत निवडून येण्यासाठी आटापिटा केला जातो. निवडून आल्यानंतर पाच वर्षे पद भोगले जाते. यामुळे पदाची एकप्रकारे सवयच लागलेली असते. मानपान, कार्यकर्त्यांचा गराडा, प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदेश सोडणे यांमुळे पाच वर्षे उलटल्यानंतरही पदापासून दूर जावेसे वाटत नाही. राजकीय पदाचा कालावधी संपल्याने सभागृहात बसता येत नाही. शिवाय अधिकार गेले असले, तरीही किमान आपल्या नावात तरी पद असावे, अशी भाबडी अपेक्षा असते. त्यामुळेच माजी झाले, तरी केवळ ‘मा’ असाच उल्लेख केला जातो. रस्त्यावर ठिकठिकाणी, तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर मोठमोठे फलक उभारलेले असतात. ‘मा. ........’ यांच्या निवासस्थानकाकडे, असा उल्लेख केला जातो. संबंधितांच्या नावाअगोदर लावण्यात येणारे ‘माननीय’ आहे की ‘माजी’ हे ज्याला समजेल, त्याने समजून घ्यायचे, अशी स्थिती आहे. हे चित्र पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र दिसत आहे. शहरात महापालिका असल्याने महापौर, उपमहापौर, नगरसेवक, स्वीकृत सदस्य असे पदाधिकारी आहेत. गत पंचवार्षिकला १०५, तर या पंचवार्षिकला १२८ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, अद्यापही गत पंचवार्षिकच्या ढीगभर ‘माजीं’नी फलक हटविलेले नाहीत. शिवाय, जे फलक आहेत, त्यावरील नावापुढेही ‘मा’ असाच उल्लेख पाहायला मिळत आहे. यासह शहराच्या हद्दीत दोन खासदार आणि तीन आमदार आहेत. यातील मागील पंचवार्षिकला असलेले एक खासदार पुन्हा निवडून आले आहेत, तर दुसरे खासदार पराभूत झाले. मात्र, हे खासदार माजी असा उल्लेख न करता ‘प्रथम खासदार’ असा उल्लेख करतात. यासह निवासस्थानाजवळील फलकावरही माजीऐवजी ‘मा’ असा उल्लेख केलेला आहे. तर, गेल्या पंचवार्षिकमधील तीन आमदारांपैकी दोन पराभूत झाले, तर एक पुन्हा निवडून आले. ‘माजी’ यांच्या नावाअगोदर अजूनही ‘मा. आमदार’ असेच झळकत आहे. यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद अद्यापपर्यंत २३ जणांनी भूषविले. यापैकी पाच माजी महापौरांचे निधन झाले आहे, तर सध्याच्या १७ माजी महापौरांपैकी ९० टक्के ‘माजीं’च्या निवासस्थानासमोर उभारण्यात आलेल्या फलकांवरील नावासमोर ‘मा’ असाच उल्लेख आहे. कुठे रस्त्यावर, तर कुठे पदपथावर, असे फलक उभारलेले असतात. यासाठी महापालिकेची परवानगी आहे की नाही, याकडेही लक्ष दिले जात नाही. दुर्दैव म्हणजे याबाबत कोणाकडून तक्रारही केली जात नाही.