शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

...अखेर जनाई उपसातून पाणी सोडले!

By admin | Updated: April 22, 2015 05:31 IST

जनाई उपसा जलसिंचन योजनेतून सोमवारपासून (दि. २०) परिसरातील गावांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी

सुपे : जनाई उपसा जलसिंचन योजनेतून सोमवारपासून (दि. २०) परिसरातील गावांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती जनाई योजनेचे उपअभियंता आर. एन. सालगुडे यांनी दिली.सुपे (ता. बारामती) तलावातंर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडण्यात येत आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची मागील दोन महिन्यांपासून पाणी सोडण्याची मागणी होती. तसेच, येथील शेतकऱ्यांनी आगाऊ पाणीपट्टीची रक्कम पाटबंधारे विभागाकडे सुपूर्त केली होती. त्यानुसार या तलावात पाणी सोडण्यात येत आहे. सुपे तलावात पाणीसाठा राहिला नसल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार होते. येथील शासकीय विहिरींच्या पाण्याची पातळी खोलवर गेली होती.येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवत होत्या. त्यामुळे येथे दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येत होते. येथील शासकीय विहिरींनाजच्या ओढ्याद्वारे पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आर. के. चांदगुडे यांनी दिली.सध्या वरवंड तलावात ७० ते ८० क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे त्याच दाबाने पुढे उपसा करण्यात येत आहे. (वार्ताहर)