शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

केंद्रामुळे शेतकरी अडचणीत : सुळे

By admin | Updated: October 11, 2014 06:55 IST

ल्या चार महिन्यांपासून केंद्रात आलेल्या मोदी सरकारच्या अनेक निर्णयांमुळे शेतकरी अडचणीत आले

शिरूर : गेल्या चार महिन्यांपासून केंद्रात आलेल्या मोदी सरकारच्या अनेक निर्णयांमुळे शेतकरी अडचणीत आले असून, ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी नकारात्मक विचारणा करणाऱ्यांनी आपल्या लगत असणाऱ्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये येऊन पाहावे, असे प्रतिपादन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले. शिरूर येथील पाचकंदीलचौक भागात राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. अशोक पवार यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. या वेळी बोलताना त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार तसेच भाजपा-शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर त्यांनी तुफानी हल्ला चढविला. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या बद्दल भाजपा व शिवसेना यांच्यामध्ये चाललेल्या वाक्युद्धाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, छत्रपती ही प्रॉपर्टी नाही तो एक विचार आहे. त्यांची एक आदर्श राज्यप्रणाली होती. मात्र, केवळ मतांसाठी आणि खंडणीसाठी महाराजांच्या नावाचा वापर करणाऱ्यांनी महाराज समजून घेतले. पाहिजे. महाराष्ट्रात येऊन अमित शहासारख्या व्यक्ती महाराष्ट्राच्या असुरक्षितेबद्दल बोलतात. मात्र त्यांनी गुजरातमध्ये काय चाललेय, तेथे महिला किती सुरक्षित आहेत, याचा विचार करावा. भाजपा-शिवसेनेला केंद्रात एकत्र सत्ता चालते, मुंबई-ठाण्यामधील महानगरपालिकेत युती चालते. मग, विधानसभेच्या निवडणुकीतच नेमके काय झाले? माझ्या मते खंडणीच्या वाटणीवरूनच त्यांची युती तुटली असावी. गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्या दूरदर्शीपणामुळे महाराष्ट्राचा चौफेर विकास झाला असताना, मोदी विकासाच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. शिरूर-हवेलीचे आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी आपल्या कार्यपद्धतीने शिरूर शहराचा तसेच संपूर्ण मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे. आणखी विकासकामांसाठी अशोक पवार यांना पुन्हा एकदा संधी द्यावी. यावेळी विकास लवांडे, लोचन शिवले, पांडुरंग थोरात, सुनीता काळेवार, शेखर पाचुंदकर यांचीही भाषणे झाली. पोपटराव गावडे, प्रदीप कंद, सिद्धार्थ कदम, सुनीता कालेवार, उज्ज्वला बरमेचा, वर्षा शिवले, राजेंद्र कोरेकर, संतोष भंडारी, वसंत कोरेकर, जालिंदर कामठे, नितीन पवार, राजेश खराडे, जगदाळे आदी उपस्थित होते. जाकीर पठाण यांनी स्वागत, तर संतोष भंडारी यांनी आभार मानले.