शहरं
Join us  
Trending Stories
1
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
2
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
3
कॅनडा सोडायची वेळ आली? १० लाख भारतीयांचे 'लीगल स्टेटस' धोक्यात; जंगलात टेंट लावून राहण्याची आली वेळ!
4
कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत
5
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
7
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
8
पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
9
संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक
10
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
11
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
12
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
13
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
15
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
16
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
17
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
18
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
19
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
20
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचा आरपीआय पक्ष वाढविण्यात कमी पडलो : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:04 IST

रामदास आठवले : शिवसेना-भाजपा युती होण्यासाठी प्रयत्न करणार

पिंपरी : भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) हा विशिष्ट समाजापुरता मर्यादित न ठेवता, इतर समाजघटकाला बरोबर घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संघटन बांधायचे होते. रिडालोसच्या माध्यमातून विविध घटकांना एकत्रित बांधण्याचा मीसुद्धा प्रयत्न केला. तो असफल झाला. डॉ. आंबेडकरांचा आरपीआय वाढविण्यात कमी पडलो, अशी कबुली देऊन माझ्या सभांना मोठी गर्दी व्हायची. परंतु त्याचे मतांमध्ये कधी परिवर्तन झाले नाही. त्यामुळे राष्टÑीय लोकशाही आघाडीबरोबर राहण्याकरिता भाजपाशी संलग्नता ठेवण्याची भूमिका स्वीकारली, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

पिंपरी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणानंतर दलित चळवळीतील कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाले. त्याचा आरपीआयवर कितपत परिणाम झाला. याबाबत आठवले म्हणाले, भारत बंदचे श्रेय प्रकाश आंबेडकरांना मिळाले, वास्तविक पाहता, मंत्री या नात्याने बंदची हाक मी देऊ शकलो असतो. परंतु चळवळीतील एका नेत्याने बंदचे आवाहन केले, मी कार्यकर्त्यांना बंदच्या काळात संयम पाळण्याचे आवाहन केले. आरपीआयचे कार्यकर्ते कोठेही गेलेले नाहीत, ८० टक्के कार्यकर्ते अद्यापही माझ्याबरोबर आहेत. वंचित विकास आघाडीला फारसे यश मिळेल असे वाटत नाही.

आठवले म्हणाले, ‘‘पुढील काळातही भाजपाच सत्तेवर येईल. युतीबाबत भाजपा आणि सेनेत मतभेद सुरू आहेत. मात्र आगामी काळातयुती महत्त्वाची असून, शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी स्वत: पुढाकार घेणार आहे. लोकसभेच्या पूर्वीच्या जागा होत्या, तशाच पद्धतीने जागावाटपाचे नियोजन व्हावे, यादृष्टीने चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या कोट्यातील मुंबईच्या जागेवर मला संधी मिळाली होती, त्यामुळे या वेळी जागा वाटपात काही बदल होण्याची शक्यता आहे.’’कायदा संमत झाल्यामुळे मराठा आरक्षण मिळणारचआर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही आपली पहिल्यापासूनची भूमिका आहे. कायदा संमत झाला तरी न्यायालयात टिकणार नाही, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले आहे. कायदा संमत होऊनही आरक्षण टिकणार नसेल तर त्यांनी हे आरक्षण कसे टिकेल याचा पर्याय द्यावा, असे आठवले म्हणाले.राम मंदिराच्या मुद्यावर ते म्हणाले, राम मंदिर व्हावे, याबद्दल दुमत नाही. परंतु न्यायालयाने हिंदू आणि मुस्लिम समाजाला तेथील जागेची वाटणी करण्याबाबतचा निर्णय दिला आहे. त्यानुसार कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, असा निर्णय घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. यवतमाळ येथील साहित्य संमेलनासाठी साहित्यिक नयनतारा सेहगल यांना निमंत्रण नाकारले, याबद्दल आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले