शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

बाबासाहेबांचा आरपीआय पक्ष वाढविण्यात कमी पडलो : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:04 IST

रामदास आठवले : शिवसेना-भाजपा युती होण्यासाठी प्रयत्न करणार

पिंपरी : भारतीय रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) हा विशिष्ट समाजापुरता मर्यादित न ठेवता, इतर समाजघटकाला बरोबर घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संघटन बांधायचे होते. रिडालोसच्या माध्यमातून विविध घटकांना एकत्रित बांधण्याचा मीसुद्धा प्रयत्न केला. तो असफल झाला. डॉ. आंबेडकरांचा आरपीआय वाढविण्यात कमी पडलो, अशी कबुली देऊन माझ्या सभांना मोठी गर्दी व्हायची. परंतु त्याचे मतांमध्ये कधी परिवर्तन झाले नाही. त्यामुळे राष्टÑीय लोकशाही आघाडीबरोबर राहण्याकरिता भाजपाशी संलग्नता ठेवण्याची भूमिका स्वीकारली, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

पिंपरी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणानंतर दलित चळवळीतील कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाले. त्याचा आरपीआयवर कितपत परिणाम झाला. याबाबत आठवले म्हणाले, भारत बंदचे श्रेय प्रकाश आंबेडकरांना मिळाले, वास्तविक पाहता, मंत्री या नात्याने बंदची हाक मी देऊ शकलो असतो. परंतु चळवळीतील एका नेत्याने बंदचे आवाहन केले, मी कार्यकर्त्यांना बंदच्या काळात संयम पाळण्याचे आवाहन केले. आरपीआयचे कार्यकर्ते कोठेही गेलेले नाहीत, ८० टक्के कार्यकर्ते अद्यापही माझ्याबरोबर आहेत. वंचित विकास आघाडीला फारसे यश मिळेल असे वाटत नाही.

आठवले म्हणाले, ‘‘पुढील काळातही भाजपाच सत्तेवर येईल. युतीबाबत भाजपा आणि सेनेत मतभेद सुरू आहेत. मात्र आगामी काळातयुती महत्त्वाची असून, शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी स्वत: पुढाकार घेणार आहे. लोकसभेच्या पूर्वीच्या जागा होत्या, तशाच पद्धतीने जागावाटपाचे नियोजन व्हावे, यादृष्टीने चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या कोट्यातील मुंबईच्या जागेवर मला संधी मिळाली होती, त्यामुळे या वेळी जागा वाटपात काही बदल होण्याची शक्यता आहे.’’कायदा संमत झाल्यामुळे मराठा आरक्षण मिळणारचआर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही आपली पहिल्यापासूनची भूमिका आहे. कायदा संमत झाला तरी न्यायालयात टिकणार नाही, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले आहे. कायदा संमत होऊनही आरक्षण टिकणार नसेल तर त्यांनी हे आरक्षण कसे टिकेल याचा पर्याय द्यावा, असे आठवले म्हणाले.राम मंदिराच्या मुद्यावर ते म्हणाले, राम मंदिर व्हावे, याबद्दल दुमत नाही. परंतु न्यायालयाने हिंदू आणि मुस्लिम समाजाला तेथील जागेची वाटणी करण्याबाबतचा निर्णय दिला आहे. त्यानुसार कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, असा निर्णय घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. यवतमाळ येथील साहित्य संमेलनासाठी साहित्यिक नयनतारा सेहगल यांना निमंत्रण नाकारले, याबद्दल आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले